शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

माता मृत्यू, बालमृत्यूसह तरुणांचेही मृत्यू रोखणे महत्त्वाचे - डॉ. आशीष सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:21 IST

आरोग्यसेवेच्या व्रताने मेळघाटात होतेय क्रांती

विजयकुमार सैतवाल

जळगाव : कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू अशा विविध आजार असलेल्या आदिवासी भागात रुग्णसेवा दिल्यास हे आजार नियंत्रणात येऊ शकतात. यात यश येतही आहे. मात्र या भागात तरुणांच्याही मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने तेदेखील रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा मेळघाटात रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. आशीष सातव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. या भागात आरोग्य सेवा दिल्यास तेथील रहिवाशांना नवसंजीवनी मिळू शकते, असे मतही त्यांनी व्यक्त करून महिलांना आरोग्याचे धडे दिल्याने त्या सुद्धा रुग्णांवर प्राथमिक उपचार करु लागल्या आहेत, असेही डॉ.सातव म्हणाले.इंडियन मेडिकल असोसिएशन जळगावच्या (आयएमए) पदग्रहण सोहळ््यानिमित्त डॉ. सातव हे शहरात आले असता त्यांच्याशी ‘लोकमत’ने चर्चा केली. त्यावेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद...प्रश्न- रुग्णसेवेसाठी आपण मेळघाट का निवडले?उत्तर- तेथील रहिवाशांना आरोग्यसेवेची गरज असताना तेथे ही सेवा मिळणे दुरापास्त होत होते. तेथील मृत्यूचे प्रमाण मन हेलावणारे होते. त्यामुळे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी आपण तेथे रुग्णसेवा देण्याचे निश्चित केले.प्रश्न- यासाठी आपणास कोणाची प्रेरणा मिळाली?उत्तर- माझे आजोबा वसंतराव उंबटकर यांच्यासह महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. अभय बंग, प्रकाश आमटे हे आमचे प्रेरणास्थान आहे.प्रश्न- मेळघाटातील अनुभव कसा आहे?उत्तर- मेळघाटातील लोक चांगले आहेत. तेथील अनुभवही चांगला आहे. तेथे काम कराल तेवढे कमी आहे. अजून कामाची गरज आहे. तेथील कामामुळे एक अनुभव आला, आपण स्थानिक पातळीवरील समस्या स्थानिक पातळीवरच सोडवू शकतो. यासाठी आम्ही तेथे ‘घरोघरी बाळाची काळजी’ हा उपक्रम राबवित असून त्यास तेथील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकारने हा उपक्रम सर्वत्र राबविल्यास आदिवासी भागात मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल.प्रश्न- मेळघाटात आपले कार्य कसे चालते?उत्तर- तेथे आम्ही हॉस्पिटल चालवितो. यामध्ये डोळ््यांचे, लहान मुलांचे वेगवेगळे हॉस्पिटल आहे. शिवाय कुपोषण निर्मूलनासाठी उपचार करण्यावर भर असतो. विशेष म्हणजे आम्ही तेथील महिलांनाच प्रशिक्षण दिले असून त्या उपचारही करु शकतात. तसेच मी व माझी पत्नी पाड्यापाड्यावर जाऊनतपासणीकरतो,तेथेचउपचारकरतो.प्रश्न- मेळघाटात सध्या काय बदल जाणवत आहे ?उत्तर- मेळघाटातील नागरिकांच्या आरोग्यामध्ये मोठी सुधारणा होत आहे. येथील बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी साठवर आले आहे. कुपोषण ६० ते ७० टक्क्याने कमी झाले आहे. मात्र ते आणखी नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. मातामृत्यूचेही प्रमाण कमी झाले आहे. येथील कामामुळे एक विश्वास निर्माण झाला आहे. जे आदिवासी भागात होऊ शकते, ते भारतात कोठेही शक्य आहे. त्यासाठी कामाची गरज आहे. प्रचंड काम बाकी आहे.प्रश्न- मेळघाटातील तरुणांच्या मृत्यूबाबत काय सांगणार?उत्तर- मेळघाटात तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे होते. तेथे व्यसनुमक्तीसाठी प्रयत्न केल्याने व्यसनमुक्ती होऊ लागली आहे. त्यामुळे तरुणांनाही त्याचे महत्त्व पटू लागले व त्यांच्यात जनजागृती होऊन तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण आता ५० टक्क्यावर आले आहे. आरोग्याबद्दल त्यांच्यामध्ये जनजागृती केली जात आहे. हे प्रमाण आणखी कमी होण्यासाठी सरकारचाही पुढाकार आवश्यक आहे.आरोग्याच्या बाबतीत संशोधन आवश्यकआपल्याकडे जे आजार होतात, साथ पसरते त्यापेक्षा वैद्यकीय शिक्षण फार वेगळे असते. त्यामुळे आपल्याकडे कोणत्या उपचाराची आवश्यकता आहे, त्या बाबत संशोधन होणे गरजेचे आहे. सोबतच मेळघाट सारख्या आदिवासी भागात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून डॉक्टरांना तेथे उपचारासाठी प्रोत्साहीत केले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. आशीष सातव यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव