शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

आजोबांचा राजकीय वारसा चालवताय ईश्वरलाल जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:25 IST

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना समाजकारणाची परंपरा लाभली

चंद्रशेखर जोशीमाजी खासदार ईश्वरलाल जैन यांना समाजकारणाची परंपरा लाभली ती त्यांचे आजोबा राजमल लखीचंद ललवाणी (जैन) यांच्याकडून. या संदर्भात माहिती देताना ईश्वरलाल जैन म्हणाले, आजोबा राजमल लखीचंद जैन यांना समाज कार्याची मोठी आवड होती. व्यवसाय करत असताना दीनदुबळ्यांना मदत करण्यात ते नेहमी पुढे असत. त्यांच्या समाज कार्याची दखलही त्याकाळी घेतली गेली. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्टÑातील सात जिल्ह्यातून ते खासदार म्हणून लोकसभेत गेले होते. स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर होता. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यानंतर काही काळ आमदारही होते (जामनेर पूर्व खान्देश). जळगाव जिल्ह्यात फैजपूर येथे १९३६ मध्ये कॉँग्रेसचे पहिले ग्रामीण राष्टÑीय अधिवेशन झाले होते. या काळात त्यांच्यावर खजिनदारपदाची जबाबदारी होती. ईश्वरलाल जैन यांचे वडिल शंकरलाल हे राजकारणापासून अलिप्त होते. मात्र आजोबांचा राजकीय वारसा चालविला तो ईश्वरलाल जैन यांनी. त्यांचे वैशिष्टय म्हणजे १९७८ च्या कॉँग्रेसविरोधी लाटेतही ते जळगाव जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी ते कॉँग्रेसचे एकमेव आमदार होते. पुन्हा १९८० मध्ये ते जामनेर मतदार संघातून विधानसभेवर गेले. राज्याच्या अंदाजपत्रकीय समितीचे ते काही काळ अध्यक्ष होते. यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष, अनेक सामाजिक अन् सहकारी संस्थांचे आश्रयदाते असा त्यांचा लौकीक आहे. कॉँग्रेसमधून एक गट बाहेर पडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्टÑवादी कॉँग्रेसची स्थापना झाली. यावेळी ईश्वलाल जैन हे पवार यांच्या बरोबरच राहीले. पक्षाचे कोषाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष अशा पदांवर त्यांनी काम केले. पक्षाबाबची निष्टा लक्षात घेऊन राष्टÑीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी जैन यांना राज्यसभेवर पाठविले. राज्यसभेचे सदस्य असताना त्यांच्याकडे संरक्षण, अर्थविषयक सल्लागार समिती तसेच वाणिज्यविषयक स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली.२०१० मध्ये ते जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून आले. राजकीय जिवनात वडिलांच्या कार्याची छाप पडली असली तरी आपले राजकीय गुरू सुरेशदादा जैन असल्याचे ते सांगतात. विधान परिषदेत गेल्यावर शेतकरी व युवकांच्या विकासाचा प्रश्न त्यांनी हाती घेतला.युवकांसाठी विविध मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिर आणि कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मनिष जैन यांनी जाणून घेतल्या. खान्देशात कापूस, केळी अमाप पिकते. पण त्यावर येथे प्रक्रिया उद्योग नाहीत. ही परिस्थिती बदलावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी भव्य अशी कापूस परिषद घेतली. या परिषदेत मुख्यमंत्र्यांनी खान्देशात कापूस संशोधन केंद्राची घोषणा केली होती.वाढते कार्य लक्षात घेऊन मनिष जैन यांना राष्टÑवादी कॉँग्रेसकडून रावेर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले. यानंतरच्या कालखंडात त्यांनी व्यवसायात लक्ष केंद्रीत केले आहे. ते म्हणतात पुन्हा राजकारणात येईल मात्र पण व्यवसायाला पूर्वीचे दिवस प्राप्त करून दिल्यानंतरच आणि ते दिवसही लवकर येतील असा त्यांना आत्मविश्वास आहे.वारसा मनिष जैन यांच्याकडेवडिलांच्या सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याची छाप मनिष जैन यांच्यावर पडली. सुवर्ण व्यवसायात शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे पदार्पण झाले. मात्र तेथचे न थांबता नवे ज्ञान व तंत्रज्ञान आणि दागिण्यातील फॅशनचा बदलता ट्रेंड लक्षात घेत त्यांनी आधुनिकतेचा अंगिकार या व्यवसायात केला.

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव