शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

आजोबांचा राजकीय वारसा चालवताय ईश्वरलाल जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:25 IST

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना समाजकारणाची परंपरा लाभली

चंद्रशेखर जोशीमाजी खासदार ईश्वरलाल जैन यांना समाजकारणाची परंपरा लाभली ती त्यांचे आजोबा राजमल लखीचंद ललवाणी (जैन) यांच्याकडून. या संदर्भात माहिती देताना ईश्वरलाल जैन म्हणाले, आजोबा राजमल लखीचंद जैन यांना समाज कार्याची मोठी आवड होती. व्यवसाय करत असताना दीनदुबळ्यांना मदत करण्यात ते नेहमी पुढे असत. त्यांच्या समाज कार्याची दखलही त्याकाळी घेतली गेली. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्टÑातील सात जिल्ह्यातून ते खासदार म्हणून लोकसभेत गेले होते. स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर होता. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यानंतर काही काळ आमदारही होते (जामनेर पूर्व खान्देश). जळगाव जिल्ह्यात फैजपूर येथे १९३६ मध्ये कॉँग्रेसचे पहिले ग्रामीण राष्टÑीय अधिवेशन झाले होते. या काळात त्यांच्यावर खजिनदारपदाची जबाबदारी होती. ईश्वरलाल जैन यांचे वडिल शंकरलाल हे राजकारणापासून अलिप्त होते. मात्र आजोबांचा राजकीय वारसा चालविला तो ईश्वरलाल जैन यांनी. त्यांचे वैशिष्टय म्हणजे १९७८ च्या कॉँग्रेसविरोधी लाटेतही ते जळगाव जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी ते कॉँग्रेसचे एकमेव आमदार होते. पुन्हा १९८० मध्ये ते जामनेर मतदार संघातून विधानसभेवर गेले. राज्याच्या अंदाजपत्रकीय समितीचे ते काही काळ अध्यक्ष होते. यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष, अनेक सामाजिक अन् सहकारी संस्थांचे आश्रयदाते असा त्यांचा लौकीक आहे. कॉँग्रेसमधून एक गट बाहेर पडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्टÑवादी कॉँग्रेसची स्थापना झाली. यावेळी ईश्वलाल जैन हे पवार यांच्या बरोबरच राहीले. पक्षाचे कोषाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष अशा पदांवर त्यांनी काम केले. पक्षाबाबची निष्टा लक्षात घेऊन राष्टÑीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी जैन यांना राज्यसभेवर पाठविले. राज्यसभेचे सदस्य असताना त्यांच्याकडे संरक्षण, अर्थविषयक सल्लागार समिती तसेच वाणिज्यविषयक स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली.२०१० मध्ये ते जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून आले. राजकीय जिवनात वडिलांच्या कार्याची छाप पडली असली तरी आपले राजकीय गुरू सुरेशदादा जैन असल्याचे ते सांगतात. विधान परिषदेत गेल्यावर शेतकरी व युवकांच्या विकासाचा प्रश्न त्यांनी हाती घेतला.युवकांसाठी विविध मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिर आणि कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मनिष जैन यांनी जाणून घेतल्या. खान्देशात कापूस, केळी अमाप पिकते. पण त्यावर येथे प्रक्रिया उद्योग नाहीत. ही परिस्थिती बदलावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी भव्य अशी कापूस परिषद घेतली. या परिषदेत मुख्यमंत्र्यांनी खान्देशात कापूस संशोधन केंद्राची घोषणा केली होती.वाढते कार्य लक्षात घेऊन मनिष जैन यांना राष्टÑवादी कॉँग्रेसकडून रावेर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले. यानंतरच्या कालखंडात त्यांनी व्यवसायात लक्ष केंद्रीत केले आहे. ते म्हणतात पुन्हा राजकारणात येईल मात्र पण व्यवसायाला पूर्वीचे दिवस प्राप्त करून दिल्यानंतरच आणि ते दिवसही लवकर येतील असा त्यांना आत्मविश्वास आहे.वारसा मनिष जैन यांच्याकडेवडिलांच्या सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याची छाप मनिष जैन यांच्यावर पडली. सुवर्ण व्यवसायात शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे पदार्पण झाले. मात्र तेथचे न थांबता नवे ज्ञान व तंत्रज्ञान आणि दागिण्यातील फॅशनचा बदलता ट्रेंड लक्षात घेत त्यांनी आधुनिकतेचा अंगिकार या व्यवसायात केला.

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव