शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

आठ गावांच्या पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 2:59 PM

आठ गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

पारोळा : नदीजोड प्रकल्पा अंर्तगत भोंडण अँक्वेडक्ट ते लघुपाटबंधारे तलाव शिरसमनी कालवा तलावच्या पाटचाऱ्यांचे २० टक्के काम रेंगाळले आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते भोंडण शिरसमनी येथील प्रमुख ग्रामस्थ माजी संचालक मनोराज पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले. यावेळी दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आहे त्यात या कामाला निधी ठेवतो, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.  पारोळा येथील कार्यक्रम आटोपून ते पाचोरा येथे कार्यक्रमासाठी जात असताना रस्त्यावर भोंडण गावानजीक त्यांना थांबवून हे निवेदन देण्यात आले. १२ वर्षापासून हे काम रखडलेले आहे. माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी त्यावेळी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविला होता. त्यांनी जामदा डाव्या कालव्याचे काम हाती घेऊन जिल्हा नियोजन अंतर्गत नदीजोड स्वतंत्र हेड निर्माण करून त्यावर निधी ठेवून या पाटचाऱ्यांचे ८० टक्के काम पूर्ण करून घेतले होते. शेतकऱ्यांनी या पाटचाऱ्यांसाठी स्वखुशीने स्वतःच्या शेतजमिनी दिल्या होत्या. या पाटचाऱ्यांना व कालव्याचे काम पूर्ण झाले, तर शिरसमनी, सुधाकर नगर, टिटवी, हनुमंतखेडे, चोरवड, भोंडण, पोपटनगर, टिटवी तांडा अशा आठ गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. तरी या रखडलेल्या कामांना उर्वरित निधी तातडीने द्यावा, अशी मागणी मंत्री पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणParolaपारोळा