शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
4
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
5
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
7
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
8
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
9
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
10
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
11
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
12
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
13
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
14
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
15
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
16
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
17
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
18
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
19
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
20
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
Daily Top 2Weekly Top 5

जीवावर उदार होत रात्री शेतीसाठी सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 18:43 IST

अक्षरशः जिवावर उदार होऊन, जीव मुठीत धरुन शेतकरी रात्री शेतावर जातो खरा पण तो सकाळी घरी येईपर्यंत घरच्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटकापिकांना पाणी देण्यासाठी करावी लागते कसरत
संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव : तालुक्यातील सातही वीज उपकेंद्रातून शेतीसाठी रात्री दहाला आठवड्यात चार व तीन दिवस-रात्री विभागून शेतीसाठी वीजपुरवठा करण्यात येतो. यामुळे प्रत्येक शेतक-यास रात्री सिंचन करणे क्रमप्राप्त ठरते. अक्षरशः जिवावर उदार होऊन, जीव मुठीत धरुन शेतकरी रात्री शेतावर जातो खरा पण तो सकाळी घरी येईपर्यंत घरच्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो. साप-विंचू आदी सरपटणारे प्राणी, बिबट्या, रानडुक्कर, शिकारी कुत्रे यामुळे उभ्या पिकात अंधारी रात्र वै-याचीच ठरते. याचबरोबर विजवाहिनी, ट्रान्सफार्मरवर फॉल्ट होणे, वीजपंप, स्टार्टर, मेनस्वीचवर काम करणे हे सर्व जिवावर उदार होऊनच करावे लागते. नजीकच्या काळात तालुक्यात एखादी अघटित घटना घडली नसली तरी यामागे रात्री सिंचनासाठी जाणा-यांना सर्पदंश, रानडुकराचा हल्ला, वीज शॉक बसणे आदी जिवावर बेतणारे प्रसंग घडले आहेत. यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने विहिरींना फुल्ल पाणी आहे.साहजिकच रब्बी हंगाम तालुक्यात आठ ते दहा हजार हेक्टरवर घेतला जात आहे याशिवाय गिरणाकाठ असल्याने ऊस, केळी, लिंबू, पेरू, मोसंबी बागायतदेखील इतकीच आहे. यातील केळी व लिंबू फळबागायतीला ठिबक संचातुन पाणी दिले जाते. स्वयंचलित यंत्रणा बसविल्याने रात्री ठिबक संच सुरू-बंद या यंत्रणेद्वारे होतात. येथे धोका कमी आहे. मात्र सार्वत्रिक क्षेत्रावर वाफे, सारे, सरी व मोकाट पध्दतीने पाणी दिले जाते.रब्बीत गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांना सिंचनासाठी रात्रीचा दिवस करावाच लागतो. रात्री सिंचनास शेतमजूर मिळत नाही. एकत्र कुटुंब पध्दत बुडाल्याने एकट्या शेतक-यांस शेतावर जाणे भाग पडते. तालुक्यात साधारणपणे आठवड्यातून चार किंवा तीन दिवस रात्री नऊ-दहा वाजता शेतीसाठी वीजपुरवठा सुरू होतो. एवढ्या रात्री उठून दुरवरच्या शेतात जाणे भाग पडते.नदी,नाले,खराब रस्ते हे दिव्य पार करुन वीजपंप सुरू होईल याची श्वाश्वती नसते. सिंचन आटोपण्यासाठी मग बिघाड शोधण्यासाठी ट्रान्सफार्मर, मेनस्विच, वीजपंप यात एवढ्या रात्री बोट घालणे आलेच कारण वायरमन वा वीजतंत्री भलत्या वेळेस नसतो. रब्बी म्हणजे हिवाळा आलाच. गारठणा-या थंडीत पाणी, चिखल यात पाय रोवून उभे रहावे लागते. या दिवसात दव पडत असल्याने उभ्या पिकात शेतकरी आंघोळ घातल्यागत नखाशिखांत भिजतो. अशात सात-आठ तास उभे राहणे आलेच.दिवसाचे त्रांगडेतालुक्यात गिरड, आमडदे, वडजी, लोण, कजगाव, कोळगाव येथे वीज उपकेंद्र आहेत. त्यामानाने तालुक्यात १३२ केव्ही सबस्टेशन नसल्याने तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. पाचोरा, पारोळा व चाळीसगाव या तीन दिशांना असलेल्या तीन तालुक्यातील १३२ केव्ही सबस्टेशनवरवरील वीज उपकेंद्र अवलंबून आहेत. वीजवाहिनीचे अंतर, फॉल्ट, कमी दाब या कारणाने व वरील सर्वच सबस्टेशन ओव्हरलोड असल्याने दिवसा शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळणे रामभरोसे असते. यामुळे रात्रीचे सिंचन शेतक-यांच्या पाचवीलाच पुजले आहे.युद्ध आघाडीवर जाणाऱ्या सैनिकासमच जीणे जंगलाच्या सीमेवर तालुक्याचे असलेले शेतशिवार, गिरणानदीचे कालसर्पासम भासणारे खोरे यामुळे बिबट्या, तडस, लाडंगे, रानडुकरे याशिवाय सिंचनासाठी शेतात फिरताना पावलापरत सर्प, विंचवाची भीती असतेच. वृद्ध आई-वडील वा एकटी-दुकटी महिला, आजारी वा रक्तदाबाचा विकार असलेले शेतकरी रात्री सिंचन करू शकत नाही. घरातील कर्ता पुरुष शेतावर जाणे म्हणजे वरील संकटामुळे युध्दावर लढण्यासाठी जाणा-या सैनिकासमच स्थिती असते. यामुळे सहा तास का असेना दिवसाच पूर्ण दाबाने, सुरळीत वीजपुरवठा शेतीसाठी मिळावयास हवा.-योगेश माळी, शेतकरी सौरऊर्जेवरील वीजउपकेंद्र हाच पर्यायशहरी भागात कारखानदारी, व्यावसायिक यामुळे दिवसा सर्वच विजेची मागणी प्रचंड असते. रात्री ग्रामीण भागात आठनंतर घरगुती व व्यावसायिक वापरात येणारी वीज मागणी घटते त्यामुळे पूर्ण क्षमतेने वीजदाब मिळून वीजपंप सुरळीत चालतात. दिवसा शेतक-यांना वीजपुरवठा द्यावयाचा ठरवल्यास सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मर आदी सर्वच यंत्रणा दुप्पट करावी लागेल. नाही तर सबस्टेशन ओव्हरलोड होऊन सिस्टीम ढेपाळण्याची स्थिती निर्माण होईल. शासनाने मागे जाहीर केल्यानुसार येत्या तीन वर्षात सौरऊर्जेवर आधारीत स्वतंत्र वीजउपकेंद्र झाल्यावरच शेतक-यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होईल, असे महावितरणाच्या एका अधिका-याने यावर आपले मत मांडले.
टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळBhadgaon भडगाव