शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

सिंचनाचा उपक्रम वर्षभरापासून मंत्रालयाच्या खुंटावर! पाणीपुरवठा विभागाची बेफिकीरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 14:08 IST

गतकाळात सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा खर्च करुनही लागवड जमिनीच्या दहा टक्केदेखील क्षेत्र प्रत्यक्षात ओलीत करण्यात यश आलेले नाही, असेच वास्तव काही जाणकारांनी उघड केले आहे.

- कुंदन पाटील

जळगाव : सिंचनासाठी केंद्रीय पातळीवर नियोजन झाले. बैठका झाल्या. सिंचनातून विकास साध्य करण्यासाठी काही करारही झाले. त्यानुसार अन्य राज्यात विविध कामांना प्रारंभही झाला. मात्र महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागात बेफिकीरीचे पाणी साचले. म्हणूनच सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्वकांक्षी ठरणाऱ्या या उपक्रमाला मंत्रालयातच टांगून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

गतकाळात सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा खर्च करुनही लागवड जमिनीच्या दहा टक्केदेखील क्षेत्र प्रत्यक्षात ओलीत करण्यात यश आलेले नाही, असेच वास्तव काही जाणकारांनी उघड केले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जैन संघटनेबरोबर ‘मिशन अमृत सरोवर’ योजनेचा शुभारंभ करण्यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे पाणीपुरवठा विभाग मात्र ‘जल जीवन मिशन’ योजनेला बुस्टर देण्यासाठी सोयीने विसरताहेत. यासंदर्भात भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही बोलण्यास असमर्थता दाखविली असताना दि.२४ रोजी येणारा जागतिक जलसंपत्ती दिन नेमका कसा साजरा करायचा, असा प्रश्नच विविध सामाजिक संस्थांना पडला आहे.

वर्षभरानंतरही करार कागदावर७ जुलै २०२२ रोजी नवी दिल्लीत केंद्रीय जनशक्ती व ग्रामविकास मंत्रालयाच्या पुढाकारातून बैठक झाली. विविध जबाबदाऱ्या निश्चीत करुन सामजस्य करारही घडवून आणला. त्यावर ग्रामविकास मंत्रालयाचे संचालक धर्मवीर झा, विभाग अधिकारी आर.एस.डागर, जैन संघटनेचे सीईओ विशाल पानसे, पाणी व्यवस्थापन विभागाचे संचालक नीलेश करकरे यांच्या स्वाक्षऱ्याही झाल्या. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागानेही बैठक घेतली. करारानुसार मसुदा ठरला.‘मिशन अमृत सरोवर’ योजनेंतर्गत जबाबदाऱ्याही निश्चीत झाल्या. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही या विभागाचे प्रधान सचीव संजीव जैस्वाल यांच्या स्वाक्षरीसाठी उपक्रमाचे घोडे अडून बसले. तर मंत्री गुलाबराव पाटील व्यस्त असल्याचे सातत्याने दाखले देण्यात आले. कर्नाटक, झारखंड, राजस्थानसह अन्य राज्यात करारानुसार कामाला सुरुवात झाली आहे. 

चार जिल्ह्यात जनजागृती‘नीती आयोग’ व ‘भारतीय जैन संघटना’ यांच्यातील करारानुसार वाशिम, नंदुरबार, उस्मानाबाद व गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे काम सुरु आहे. यासंदर्भात  दि.१७ डिसेंबर २०२२ रोजी उदयपूर (राजस्थान) येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी मार्गदर्शनही केले. केंद्रीय पातळीवर सिंचनासाठी यंत्रणा तत्पर असतानाही राज्यात मात्र पाणी कुठे मुरतेय, असा प्रश्न जाणकारांना पडला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव