शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाचा उपक्रम वर्षभरापासून मंत्रालयाच्या खुंटावर! पाणीपुरवठा विभागाची बेफिकीरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 14:08 IST

गतकाळात सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा खर्च करुनही लागवड जमिनीच्या दहा टक्केदेखील क्षेत्र प्रत्यक्षात ओलीत करण्यात यश आलेले नाही, असेच वास्तव काही जाणकारांनी उघड केले आहे.

- कुंदन पाटील

जळगाव : सिंचनासाठी केंद्रीय पातळीवर नियोजन झाले. बैठका झाल्या. सिंचनातून विकास साध्य करण्यासाठी काही करारही झाले. त्यानुसार अन्य राज्यात विविध कामांना प्रारंभही झाला. मात्र महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागात बेफिकीरीचे पाणी साचले. म्हणूनच सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्वकांक्षी ठरणाऱ्या या उपक्रमाला मंत्रालयातच टांगून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

गतकाळात सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा खर्च करुनही लागवड जमिनीच्या दहा टक्केदेखील क्षेत्र प्रत्यक्षात ओलीत करण्यात यश आलेले नाही, असेच वास्तव काही जाणकारांनी उघड केले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जैन संघटनेबरोबर ‘मिशन अमृत सरोवर’ योजनेचा शुभारंभ करण्यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे पाणीपुरवठा विभाग मात्र ‘जल जीवन मिशन’ योजनेला बुस्टर देण्यासाठी सोयीने विसरताहेत. यासंदर्भात भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही बोलण्यास असमर्थता दाखविली असताना दि.२४ रोजी येणारा जागतिक जलसंपत्ती दिन नेमका कसा साजरा करायचा, असा प्रश्नच विविध सामाजिक संस्थांना पडला आहे.

वर्षभरानंतरही करार कागदावर७ जुलै २०२२ रोजी नवी दिल्लीत केंद्रीय जनशक्ती व ग्रामविकास मंत्रालयाच्या पुढाकारातून बैठक झाली. विविध जबाबदाऱ्या निश्चीत करुन सामजस्य करारही घडवून आणला. त्यावर ग्रामविकास मंत्रालयाचे संचालक धर्मवीर झा, विभाग अधिकारी आर.एस.डागर, जैन संघटनेचे सीईओ विशाल पानसे, पाणी व्यवस्थापन विभागाचे संचालक नीलेश करकरे यांच्या स्वाक्षऱ्याही झाल्या. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागानेही बैठक घेतली. करारानुसार मसुदा ठरला.‘मिशन अमृत सरोवर’ योजनेंतर्गत जबाबदाऱ्याही निश्चीत झाल्या. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही या विभागाचे प्रधान सचीव संजीव जैस्वाल यांच्या स्वाक्षरीसाठी उपक्रमाचे घोडे अडून बसले. तर मंत्री गुलाबराव पाटील व्यस्त असल्याचे सातत्याने दाखले देण्यात आले. कर्नाटक, झारखंड, राजस्थानसह अन्य राज्यात करारानुसार कामाला सुरुवात झाली आहे. 

चार जिल्ह्यात जनजागृती‘नीती आयोग’ व ‘भारतीय जैन संघटना’ यांच्यातील करारानुसार वाशिम, नंदुरबार, उस्मानाबाद व गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे काम सुरु आहे. यासंदर्भात  दि.१७ डिसेंबर २०२२ रोजी उदयपूर (राजस्थान) येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी मार्गदर्शनही केले. केंद्रीय पातळीवर सिंचनासाठी यंत्रणा तत्पर असतानाही राज्यात मात्र पाणी कुठे मुरतेय, असा प्रश्न जाणकारांना पडला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव