शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

आधारकार्डवर विद्यार्थिनी व वृद्धेच्या ठश्यांची अदलाबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:42 IST

उपजिल्हाधिकाºयांच्या कक्षात केली दुरूस्ती

ठळक मुद्देपालकांनी घेतली प्रशासनाकडे धावप्रशासनाचा पुढाकारआॅपरेटरकडून झालेल्या चुकांचा मनस्ताप नागरिकांना

जळगाव : आधार कार्डावर विद्यार्थिनी आणि वृद्धेच्या बोटांच्या ठशांची अदलाबदल झाल्याची तक्रार येताच जिल्हा प्रशासनाने विद्यार्थिनीचे नुकसान टाळण्यासाठी पुढाकार घेवून लगेच दुरुस्ती केली.आधार कार्ड बनविताना आॅपरेटरकडून झालेल्या चुकांचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे हे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.  प्रत्येक योजना व शासकीय कामकाजात आधार नोंदणी सक्तीची झाली असल्याने आधारकार्डमध्ये काही चूक झालेली असल्यास ते काम खोळंबत आहेत.दरम्यान एका विद्यार्थिनीच्या आधारकार्डसाठी घेतलेले बोटांचे ठसे एका वृद्ध महिलेच्या बोटांच्या ठशांशी अदलाबदल झाल्याने त्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक भवितव्यच अडचणीत आल्याचे प्रकरण समोर आले. अखेर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थिनीचे नुकसान टाळण्यासाठी उपजिल्हाधिकारी कक्षात खास आधारचे युनिट लावून आधारकार्डात दुरूस्ती केली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील सध्या १२वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने २०१३ मध्ये आधार नोंदणी केली होती. त्यावेळी रांगेत तिच्या मागे एक वृद्ध महिला होती. आधार नोंदणी करणाºया आॅपरेटरच्या चुकीमुळे या विद्यार्थिनीच्या बोटांचे ठसे व त्या वृद्धेच्या बोटांचे ठसे यात अदलाबदल झाली. उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील तसेच एनआयसीचे प्रमोद बोरोले यांनी यात लक्ष घालून युआयडीचे विभागीय अधिकारी चहांदे यांना देण्यासाठी पत्रही तयार केले. दरम्यान कुणी अधिकाºयांनी काही तांत्रिक उपाय सुचविल्याने सोमवार, २६ रोजी उपजिल्हाधिकारी भांडे यांच्या दालनात आधार नोंदणीचे युनिट बसवून या विद्यार्थिनीच्या आधारकार्डमध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यात यश न मिळाल्यास युआयडी मुंबई कार्यालयाकडेच धाव घ्यावी लागणार आहे.विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही अडचण सोडविण्यासाठी दाखविलेल्या सहृदयतेचे कौतुक होत आहे.पालकांनी घेतली प्रशासनाकडे धाववृद्ध महिलेला तर आधारची गरज भासली नाही. मात्र सध्या १२वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला मात्र ‘नीट’ परीक्षेच्या नोंदणीसाठी आधारची गरज असल्याने त्याचा वापर करावा लागला. मात्र ठसे बदल असल्याने त्या मुली ऐवजी वृद्धेचे आधारकार्ड येत होते. त्यामुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती निर्माण झाली. याबाबत पालकांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली.