शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणारा सातमाळ्यातील अंतूरचा किल्ला भग्नावस्थेकडे

By admin | Updated: April 20, 2017 15:46 IST

यादवांच्या वैभवाची साक्ष देणारा तसेच युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणार अंतुरचा किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची भग्नावस्थेकडे वाटचाल सुरु आहे.

 ऑनलाईन लोकमत विशेष /संजय बी.सोनार  

नगरदेवळा ता.पाचोरा,दि.20 - निसर्गसौंदर्याने नटलेल्या सातमाळ्याच्या पर्वत रांगेत मोगल सत्तेचे जकातीचे ठाणे व नंतर यादवांच्या वैभवाची साक्ष देणारा तसेच युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणार अंतुरचा किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची भग्नावस्थेकडे वाटचाल सुरु आहे. 
अंतूर किल्ला हा निजामशाहीच्या भरभराटीच्या काळात हे जकातीचे ठाणे होते. त्यानंतर देवगिरीच्या कृष्ण देवराव यादवांच्या कार्यकाळातील हा किल्ला अनेक पराक्रमांचा साक्षीदार आहे. मात्र आता किल्ल्याच्या आतील व बाहेरील ऐतिहासिक वास्तू भग्न झाली आहे. मध्यंतरी पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या अनेक भग्न वास्तुंची खांबांची भिंतींच्या डागडूजीचे प्रय} सुरू केले होते मात्र गेल्या दोन वर्षापासून ते कामही बंद आहे.
उत्तर व दक्षिण विभागांना जोडणारा किल्ला
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात येत असलेला अंतूर किल्ल्याचा संपूर्ण पायाभूत इतिहास उपलब्ध नसला तरी निजामशाहीतील काळात उत्तर व दक्षिण विभागास जोडणारा तत्कालीन एकमेव रस्ता होता. तो रस्ता सातमाळ्याचा खडक फोडून कोरून तयार करण्यात आला होता. संपूर्ण सातमाळ्याच्या घनदाट अरण्याने व द:याखो:यांनी व्याप्त या एकमेव मार्गावर आवजावक करणा:यांकडून जकात वसूल करणे, चोर मार्गाने जाणा:यांकडून दंड वसुल करणे, यासोबतच शत्रूला रोखून वचक बसवणे, या सर्व दृष्टीने हे ठाणे अत्यंत उपयोगी ठरत होते. त्यामुळे निजामांनंतर यादवांनी रस्ता तयार करतांना निघालेल्या दगडांचाच वापर करूण अत्यंत खुबीने व स्वस्तात या किल्ल्याची उभारणी केली आहे.
काय आहे किल्ल्याचे महत्त्व
हा किल्ला उत्तरेकडून गिरीदुर्ग तर दक्षिणेकडून भूदुर्ग वर्गिकरणात येतो. समुद्र सपाटीपासून 2700फुट उंचीवर असलेला हा किल्ला गाठण्यासाठी नागदमार्गे नागापुर पयर्ंत 22 कि.मी.जावे लागते. तेथून गोपेवाडी कोलापूर असे सहा किलोमीटर अंतर कापून किल्ल्यावर पायी जाण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. उत्तरेकडून खालून नागद व नगरदेवळा येथून दस्तापुर मार्गाने 17 कि.मी. अंतर असून वर पायी जाण्यासाठी तीन ते चार तास लागतात.
किल्ल्याला बुरुजांची तटबंदी
किल्ल्यात जातांना पहिल्याच दक्षिणाभिमुख दरवाजातून आत डाव्या बाजूस चौकी आहे तर पायवाटेच्या वरच्या बाजूस बुरूजमाळ असून यातील एक तिहेरी बुरूज आहे. पुढे असलेल्या पुर्वाभिमुख भक्कम मांडणीच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेले बुरूज चौकोनी आहेत. दरवाजाच्या कमानित शत्रूवर मारा करण्यासाठी खाचा ठेवल्या आहेत तर दोन्ही बाजूस कमल पुष्पांसह पारशी भाषेतील शिलालेखही आढळतात. पुढे आतीलबाजूस संपूर्ण काळ्या खडकातील जिवंत गोड पाण्याचा झरा आहे. 
तलावाच्या काठावर मशिद उभारणी
तलावाच्या बाजूलाच असलेल्या मैदानातील मोठय़ा तलावाच्या काठावरच निजामशाहितील मशिद आहे. तलावाच्या समोरील उंच चौरश्यावर प्रचंड मोठे शस्नगार असून सरदारांच्या भात्यातील सर्व शस्र तेथे ठेवत असल्याचे तेथील मांडणीवरून दिसते. तसेच एका बुरूजावरून बाह्य टेहाळणी सह किल्ल्याच्या आतील संपूर्ण परिसराचे निरीक्षण करता येते. 
50 फुटांचा खंदक खोदून तयार केला मार्ग
 सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्याच्या मुख्य बुरूजाच्या समोरच्या पठाराचे अंतर 50 फुटांचे आहे. या किल्ल्यास शत्रू आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी 50 फुटांचा खंदक खोदुन डोंगरापासून वेगळा करण्यात आला आहे. या किल्ल्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्टय़ म्हणजे उत्तरेकडील खालच्या बाजूकडून पाहिल्यावर घनदाट वृक्षांनी वेढलेल्या डोंगरावर खडकांच्या वेष्टीत कडा भासतात. मात्र आतील टेहाळणी बुरूजांवरून खान्देशचा विस्तीर्ण पठारी प्रदेशावर लक्ष ठेवण्याबरोबरच शत्रूला वरूनच नेस्तनाबूत करता येत असल्याचे मांडणी वरून दिसते. दक्षिण बाजूकडून त्याच्या अगदी जवळ गेल्यानंतरही येथे भव्य किल्ला असल्याचे लक्षात येत नाही. यावरून किल्ल्याचे युद्धशास्रीय महत्व भौगोलीक व राजकीय महत्व लक्षात  येते.