शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणारा सातमाळ्यातील अंतूरचा किल्ला भग्नावस्थेकडे

By admin | Updated: April 20, 2017 15:46 IST

यादवांच्या वैभवाची साक्ष देणारा तसेच युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणार अंतुरचा किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची भग्नावस्थेकडे वाटचाल सुरु आहे.

 ऑनलाईन लोकमत विशेष /संजय बी.सोनार  

नगरदेवळा ता.पाचोरा,दि.20 - निसर्गसौंदर्याने नटलेल्या सातमाळ्याच्या पर्वत रांगेत मोगल सत्तेचे जकातीचे ठाणे व नंतर यादवांच्या वैभवाची साक्ष देणारा तसेच युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणार अंतुरचा किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची भग्नावस्थेकडे वाटचाल सुरु आहे. 
अंतूर किल्ला हा निजामशाहीच्या भरभराटीच्या काळात हे जकातीचे ठाणे होते. त्यानंतर देवगिरीच्या कृष्ण देवराव यादवांच्या कार्यकाळातील हा किल्ला अनेक पराक्रमांचा साक्षीदार आहे. मात्र आता किल्ल्याच्या आतील व बाहेरील ऐतिहासिक वास्तू भग्न झाली आहे. मध्यंतरी पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या अनेक भग्न वास्तुंची खांबांची भिंतींच्या डागडूजीचे प्रय} सुरू केले होते मात्र गेल्या दोन वर्षापासून ते कामही बंद आहे.
उत्तर व दक्षिण विभागांना जोडणारा किल्ला
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात येत असलेला अंतूर किल्ल्याचा संपूर्ण पायाभूत इतिहास उपलब्ध नसला तरी निजामशाहीतील काळात उत्तर व दक्षिण विभागास जोडणारा तत्कालीन एकमेव रस्ता होता. तो रस्ता सातमाळ्याचा खडक फोडून कोरून तयार करण्यात आला होता. संपूर्ण सातमाळ्याच्या घनदाट अरण्याने व द:याखो:यांनी व्याप्त या एकमेव मार्गावर आवजावक करणा:यांकडून जकात वसूल करणे, चोर मार्गाने जाणा:यांकडून दंड वसुल करणे, यासोबतच शत्रूला रोखून वचक बसवणे, या सर्व दृष्टीने हे ठाणे अत्यंत उपयोगी ठरत होते. त्यामुळे निजामांनंतर यादवांनी रस्ता तयार करतांना निघालेल्या दगडांचाच वापर करूण अत्यंत खुबीने व स्वस्तात या किल्ल्याची उभारणी केली आहे.
काय आहे किल्ल्याचे महत्त्व
हा किल्ला उत्तरेकडून गिरीदुर्ग तर दक्षिणेकडून भूदुर्ग वर्गिकरणात येतो. समुद्र सपाटीपासून 2700फुट उंचीवर असलेला हा किल्ला गाठण्यासाठी नागदमार्गे नागापुर पयर्ंत 22 कि.मी.जावे लागते. तेथून गोपेवाडी कोलापूर असे सहा किलोमीटर अंतर कापून किल्ल्यावर पायी जाण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. उत्तरेकडून खालून नागद व नगरदेवळा येथून दस्तापुर मार्गाने 17 कि.मी. अंतर असून वर पायी जाण्यासाठी तीन ते चार तास लागतात.
किल्ल्याला बुरुजांची तटबंदी
किल्ल्यात जातांना पहिल्याच दक्षिणाभिमुख दरवाजातून आत डाव्या बाजूस चौकी आहे तर पायवाटेच्या वरच्या बाजूस बुरूजमाळ असून यातील एक तिहेरी बुरूज आहे. पुढे असलेल्या पुर्वाभिमुख भक्कम मांडणीच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेले बुरूज चौकोनी आहेत. दरवाजाच्या कमानित शत्रूवर मारा करण्यासाठी खाचा ठेवल्या आहेत तर दोन्ही बाजूस कमल पुष्पांसह पारशी भाषेतील शिलालेखही आढळतात. पुढे आतीलबाजूस संपूर्ण काळ्या खडकातील जिवंत गोड पाण्याचा झरा आहे. 
तलावाच्या काठावर मशिद उभारणी
तलावाच्या बाजूलाच असलेल्या मैदानातील मोठय़ा तलावाच्या काठावरच निजामशाहितील मशिद आहे. तलावाच्या समोरील उंच चौरश्यावर प्रचंड मोठे शस्नगार असून सरदारांच्या भात्यातील सर्व शस्र तेथे ठेवत असल्याचे तेथील मांडणीवरून दिसते. तसेच एका बुरूजावरून बाह्य टेहाळणी सह किल्ल्याच्या आतील संपूर्ण परिसराचे निरीक्षण करता येते. 
50 फुटांचा खंदक खोदून तयार केला मार्ग
 सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्याच्या मुख्य बुरूजाच्या समोरच्या पठाराचे अंतर 50 फुटांचे आहे. या किल्ल्यास शत्रू आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी 50 फुटांचा खंदक खोदुन डोंगरापासून वेगळा करण्यात आला आहे. या किल्ल्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्टय़ म्हणजे उत्तरेकडील खालच्या बाजूकडून पाहिल्यावर घनदाट वृक्षांनी वेढलेल्या डोंगरावर खडकांच्या वेष्टीत कडा भासतात. मात्र आतील टेहाळणी बुरूजांवरून खान्देशचा विस्तीर्ण पठारी प्रदेशावर लक्ष ठेवण्याबरोबरच शत्रूला वरूनच नेस्तनाबूत करता येत असल्याचे मांडणी वरून दिसते. दक्षिण बाजूकडून त्याच्या अगदी जवळ गेल्यानंतरही येथे भव्य किल्ला असल्याचे लक्षात येत नाही. यावरून किल्ल्याचे युद्धशास्रीय महत्व भौगोलीक व राजकीय महत्व लक्षात  येते.