शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणारा सातमाळ्यातील अंतूरचा किल्ला भग्नावस्थेकडे

By admin | Updated: April 20, 2017 15:46 IST

यादवांच्या वैभवाची साक्ष देणारा तसेच युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणार अंतुरचा किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची भग्नावस्थेकडे वाटचाल सुरु आहे.

 ऑनलाईन लोकमत विशेष /संजय बी.सोनार  

नगरदेवळा ता.पाचोरा,दि.20 - निसर्गसौंदर्याने नटलेल्या सातमाळ्याच्या पर्वत रांगेत मोगल सत्तेचे जकातीचे ठाणे व नंतर यादवांच्या वैभवाची साक्ष देणारा तसेच युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणार अंतुरचा किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची भग्नावस्थेकडे वाटचाल सुरु आहे. 
अंतूर किल्ला हा निजामशाहीच्या भरभराटीच्या काळात हे जकातीचे ठाणे होते. त्यानंतर देवगिरीच्या कृष्ण देवराव यादवांच्या कार्यकाळातील हा किल्ला अनेक पराक्रमांचा साक्षीदार आहे. मात्र आता किल्ल्याच्या आतील व बाहेरील ऐतिहासिक वास्तू भग्न झाली आहे. मध्यंतरी पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या अनेक भग्न वास्तुंची खांबांची भिंतींच्या डागडूजीचे प्रय} सुरू केले होते मात्र गेल्या दोन वर्षापासून ते कामही बंद आहे.
उत्तर व दक्षिण विभागांना जोडणारा किल्ला
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात येत असलेला अंतूर किल्ल्याचा संपूर्ण पायाभूत इतिहास उपलब्ध नसला तरी निजामशाहीतील काळात उत्तर व दक्षिण विभागास जोडणारा तत्कालीन एकमेव रस्ता होता. तो रस्ता सातमाळ्याचा खडक फोडून कोरून तयार करण्यात आला होता. संपूर्ण सातमाळ्याच्या घनदाट अरण्याने व द:याखो:यांनी व्याप्त या एकमेव मार्गावर आवजावक करणा:यांकडून जकात वसूल करणे, चोर मार्गाने जाणा:यांकडून दंड वसुल करणे, यासोबतच शत्रूला रोखून वचक बसवणे, या सर्व दृष्टीने हे ठाणे अत्यंत उपयोगी ठरत होते. त्यामुळे निजामांनंतर यादवांनी रस्ता तयार करतांना निघालेल्या दगडांचाच वापर करूण अत्यंत खुबीने व स्वस्तात या किल्ल्याची उभारणी केली आहे.
काय आहे किल्ल्याचे महत्त्व
हा किल्ला उत्तरेकडून गिरीदुर्ग तर दक्षिणेकडून भूदुर्ग वर्गिकरणात येतो. समुद्र सपाटीपासून 2700फुट उंचीवर असलेला हा किल्ला गाठण्यासाठी नागदमार्गे नागापुर पयर्ंत 22 कि.मी.जावे लागते. तेथून गोपेवाडी कोलापूर असे सहा किलोमीटर अंतर कापून किल्ल्यावर पायी जाण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. उत्तरेकडून खालून नागद व नगरदेवळा येथून दस्तापुर मार्गाने 17 कि.मी. अंतर असून वर पायी जाण्यासाठी तीन ते चार तास लागतात.
किल्ल्याला बुरुजांची तटबंदी
किल्ल्यात जातांना पहिल्याच दक्षिणाभिमुख दरवाजातून आत डाव्या बाजूस चौकी आहे तर पायवाटेच्या वरच्या बाजूस बुरूजमाळ असून यातील एक तिहेरी बुरूज आहे. पुढे असलेल्या पुर्वाभिमुख भक्कम मांडणीच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेले बुरूज चौकोनी आहेत. दरवाजाच्या कमानित शत्रूवर मारा करण्यासाठी खाचा ठेवल्या आहेत तर दोन्ही बाजूस कमल पुष्पांसह पारशी भाषेतील शिलालेखही आढळतात. पुढे आतीलबाजूस संपूर्ण काळ्या खडकातील जिवंत गोड पाण्याचा झरा आहे. 
तलावाच्या काठावर मशिद उभारणी
तलावाच्या बाजूलाच असलेल्या मैदानातील मोठय़ा तलावाच्या काठावरच निजामशाहितील मशिद आहे. तलावाच्या समोरील उंच चौरश्यावर प्रचंड मोठे शस्नगार असून सरदारांच्या भात्यातील सर्व शस्र तेथे ठेवत असल्याचे तेथील मांडणीवरून दिसते. तसेच एका बुरूजावरून बाह्य टेहाळणी सह किल्ल्याच्या आतील संपूर्ण परिसराचे निरीक्षण करता येते. 
50 फुटांचा खंदक खोदून तयार केला मार्ग
 सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्याच्या मुख्य बुरूजाच्या समोरच्या पठाराचे अंतर 50 फुटांचे आहे. या किल्ल्यास शत्रू आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी 50 फुटांचा खंदक खोदुन डोंगरापासून वेगळा करण्यात आला आहे. या किल्ल्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्टय़ म्हणजे उत्तरेकडील खालच्या बाजूकडून पाहिल्यावर घनदाट वृक्षांनी वेढलेल्या डोंगरावर खडकांच्या वेष्टीत कडा भासतात. मात्र आतील टेहाळणी बुरूजांवरून खान्देशचा विस्तीर्ण पठारी प्रदेशावर लक्ष ठेवण्याबरोबरच शत्रूला वरूनच नेस्तनाबूत करता येत असल्याचे मांडणी वरून दिसते. दक्षिण बाजूकडून त्याच्या अगदी जवळ गेल्यानंतरही येथे भव्य किल्ला असल्याचे लक्षात येत नाही. यावरून किल्ल्याचे युद्धशास्रीय महत्व भौगोलीक व राजकीय महत्व लक्षात  येते.