जामन्या गाडऱ्याला पाझर तलावाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST2021-05-26T04:17:45+5:302021-05-26T04:17:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील नवसंजीवनी योजनेतील २३ गावांच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतला असून, ...

जामन्या गाडऱ्याला पाझर तलावाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील नवसंजीवनी योजनेतील २३ गावांच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतला असून, त्यातील जामन्या गाडऱ्या ता.यावल येथे पाझर तलावाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले आहे. नवसंजीवनी योजनेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात मंगळवारी पार पडली.
या बैठकीला यावलच्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी. जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, आणि इतर सदस्य उपस्थित होते.
नव संजीवनी योजनेत यावल, चोपडा आणि रावेर या तीन तालुक्यांतील २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये पावसाळ्याच्या आधी रस्ते, अन्नधान्याचा पुरवठा यांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या, तसेच या गावांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील औषधपुरवठाही सुरळीत असावा, अशा सूचना दिल्या.
पावसाळ्याच्या आधीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक पार पडली, तसेच पुढील बैठक ८ जून रोजी होणार आहे. जिल्ह्यातील या तीन तालुक्यांतील २३ आदिवासी पाडे आणि गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या काळात येथील नागरिकांना बऱ्याचदा असुविधेचा सामना करावा लागतो. त्यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी ही आढावा बैठक घेतली.