शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दप्तराचे ओझे कमी करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:55 IST

अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करणार

ठळक मुद्दे शाळेच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर परीक्षा खासगी शाळेत घेतल्या जातात, मात्र या परीक्षांची वाढती फी पालकांची डोकेदुखी ठरत आहे.शासनाने  अवांतर परीक्षांवर बंदी आणली आहे तरी खासगी शाळेत याचे जोम माजलेले दिसून येत आहे.

चाळीसगाव, जि.जळगाव : शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी इयत्ता व विद्यार्थ्यांच्या वजननिहाय दप्तराचे वजन किती असावे, याचे निकष ठरविले आहेत. याबाबत मुख्याध्यापकांना दप्तराचे ओझे तपासण्याचे निर्देश दिले असून, तसा अहवाल प्रत्येक शाळेने गटशिक्षण अधिकाºयांना द्यावयाचा आहे. याबाबत नियमांचा भंग करणाºया शाळेवर कारवाई केली जाणार आहे.मागील काही वर्षात विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तरांचे ओझे विद्यार्थी वाहून नेत होते. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत होता. याबाबत वैद्यकीय अधिकाºयांनीही जास्त वजनाच्या दप्तराचा विद्यार्थ्यांच्या शरीरातील विविध अवयवांवर वाईट परिणाम होतो, असा निर्वाळा दिला होता.त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय वजन व शाळेमध्ये आवश्यक साहित्याचे वजन निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के दप्तराचे वजन अपेक्षित आहे. आवश्यक साहित्याचे वजन, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, सर्व साहित्य ठेवण्याची बॅग इत्यादींचा त्यात समावेश आहे. प्रत्येक मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर तसा अहवाल गटशिक्षणाधिकाºयांना सादर करावयाचा आहे. याबाबत संबंधित शाळांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. लहान मुलांना दप्तरांच्या ओझ्यामुळे चालता येत नाही. दररोज वजन वाहून नेल्यामुळे हाडांचे, मणक्यांचे व पाठदुखींचे अनेक गंभीर आजार जडले आहेत. शाळेत दर दिवशी किमान पुस्तके व साहित्यांचा वापर करावा, अशी पालकांची मागणी होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. शासनाने ही परिस्थिती बदलविण्याकरिता ठोस कार्यवाही केली आहे. याबाबत शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आकस्म्सिक तपासणी मोहीम राबविण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन असे असावेवर्ग वजनइयत्ता १ ली - १७८५ ग्रॅमइयत्ता २ री - १८८० ग्रॅमइयत्ता ३ री - २४०० ग्रॅमइयत्ता ४ थी - २६८५ ग्रॅमइयत्ता ५ वी - ३१२५ ग्रॅमइयत्ता ६ वी - ३१४१ ग्रॅमइयत्ता ७ वी - ३३५६ ग्रॅमइयत्ता ८ वी - ३४२५ ग्रॅमपुस्तके, वह्या कंपासपेटी यांचे वजनाचा समावेश करण्यात आला आहे. यात पहिलीच्या विद्यार्थ्यांना तीन पुस्तके दप्तरात असावी, असे शासनाचे निर्देश आहेत.खासगी शाळा नियमांच्या पलीकडेजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काही उपाय योजना करण्यात आल्या महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार ‘दप्तर विरहित दिवस’ म्हणून पाळला जात असल्याची माहिती आहे. सन २०१७ मध्ये याबाबत परिपत्रकदेखील काढले. मात्र बºयाच खासगी शाळा या नियमाची अंमलबजावणी करताना दिसून येत नाही व खासगी शाळेतील बºयाच मुख्याध्यापकांना याबाबत माहिती नसल्याची बाब उघड होत आहे.विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे जास्त असल्याने हाडाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हात-पायांना कमजोरी येऊ शकते. तसेच मानेला व खाद्यांला त्रास होऊ शकतोे. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष दखल घ्यावी.-डॉ.विनोद कोतकरसचिव, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी, चाळीसगावजिल्हा परिषद शाळांतील अनेक शिक्षकांकडून हा उपक्रम राबविला जात आहे . यासाठी सन २०१७ मध्ये परिपत्रकदेखील काढले. यावर्षी शाळांचा आढावा घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देवू. खासगी शाळांनाही त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे.-बी. जे.पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प., जळगाव 

टॅग्स :SchoolशाळाChalisgaonचाळीसगाव