शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST

जळगाव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी ...

जळगाव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबवावा, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी दिले. शिवभोजन केंद्रांवरील कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, अशा सूचनादेखील भुजबळ यांनी दिल्या.

अजिंठा शासकीय विश्रामगृहात भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक बी.जी.जाधव, जिल्हा मार्केटींग अधिकारी एन. डी. मगरे, विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार साहेबराव शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक सी. डी. पालीवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

अफरातफर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

जिल्ह्यातील दिव्यांग, विधवा, परितक्त्या, भूमीहीन शेतमजूर, अल्प भूधारक शेतकरी, दुर्धर आजारग्रस्त, आदिवासी व्यक्ती, ज्यांना कुठलाही आधार नाही असे ६० वर्षावरील वृध्द तसेच दारिद्रय रेषेखालील नागरिकांचा अंत्योदय योजनेत समावेश करुन त्यांना या योजनेतंर्गत धान्याचा लाभ द्यावा. ज्या लाभार्थींनी गेल्या वर्षभरात धान्य घेतलेल नाही त्यांची यादी तयार करावी. तसेच रेशनच्या मालाची अफरातफर होत असल्याचे आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा सूचनादेखील त्यांनी या वेळी दिल्या. तसेच गरजूंना धान्याचा लाभ देण्यासाठी धोरण आखावे, अशा सूचनादेखील त्यांनी यावेळी दिल्या.

गरज लक्षात घेऊन शिवभोजन केंद्र वाढवा

शिवभोजन केंद्रांना नियमितपणे भेट देऊन तेथील तपासणी करावी, गरजू नागरिकांची शिवभोजनची गरज लक्षात घेऊन केंद्र वाढविण्यात यावेत, प्रत्येक केंद्रासाठी इष्टांक एकसारखा राहील याची दक्षता घेण्याच्या सूचनाही भुजबळ यांनी यावेळी दिल्यात.

भरडधान्य नावनोंदणीस मुदतवाढीसाठी पाठपुरावा करणार

भरडधान्य केंद्रावर नावनोंदणीची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत आहेत. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.