शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाढत जाणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे जिल्ह्यातील पर्यावरणाचा होतोय ऱ्हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

जळगाव- जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत जात असून, यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहे. ...

जळगाव- जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत जात असून, यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहे. वाढत जाणारे शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे नद्या-नाले व हवेतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे.

जिल्ह्यात एकूण ४ साखर कारखाने, १ औष्णिक प्रकल्प व इतर लहान मोठे प्रकल्प आहेत. यासह जळगाव शहरासह तालुक्याच्या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात केमिकल व इतर कंपन्या वाढत आहे. यामुळे हवेतील प्रदूषण यासह नद्यांमधील प्रदूषणदेखील वाढत जात आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील जैवविविधतेवर होताना दिसून येत आहे.

जळगाव शहरात धूलिकणांचे प्रमाण वाढले

जळगाव शहरात अमृत अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे धूलिकण यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षात जळगाव शहरातील धूलिकणांचे प्रमाण हे ३० टक्क्यांनी वाढले आहे. २०१७ मध्ये शहरातील वातावरणात धूलिकणांचे प्रमाण हे ५५ ते ६० टक्के इतके होते. आज ते प्रमाण ९० ते ९५ टक्के इतके झाले आहे. तसेच वातावरणात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण देखील वाढत जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम जाणवत आहेत. जळगाव शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गिरणा व तापी नद्याही झाल्या प्रदूषित

जळगाव जिल्ह्यात गिरणा व तापी या दोन नद्या प्रमुख असून या दोन नद्यांच्या काठी जिल्ह्यातील ७० टक्के सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. मात्र, जळगाव शहरातील ७० टक्के सांडपाणी हे गिरणात सोडले जात असल्याने ही नदी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. यासह जळगाव शहरातील एमआयडीसीचे सर्व दूषित पाणी हे तापी नदीत सोडले जाते. यामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये या दोन्ही नद्यांमधील जलचरांवर देखील मोठा परिणाम झाला आहे. जलचर अभ्यासक राहुल सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील तापी व गिरणा नदीमधील अनेक मासे त्याच्या जेनेटिक्स बदल होत आहेत. तसेच अनेक दुर्लभ प्रजाती नष्ट होत जात आहे.

कोट..

जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण व शहरीकरण होत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावरदेखील होत आहे. जळगाव शहरात एका योजनेमुळे धूलिकणांचे संख्येत वाढ झाली आहे, तर प्रदूषणाचे प्रमाण देखील वाढले आहे.

- डॉ. नीलेश गोरे, हवामान तज्ज्ञ