शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वाढत जाणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे जिल्ह्यातील पर्यावरणाचा होतोय ऱ्हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

जळगाव- जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत जात असून, यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहे. ...

जळगाव- जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत जात असून, यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहे. वाढत जाणारे शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे नद्या-नाले व हवेतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे.

जिल्ह्यात एकूण ४ साखर कारखाने, १ औष्णिक प्रकल्प व इतर लहान मोठे प्रकल्प आहेत. यासह जळगाव शहरासह तालुक्याच्या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात केमिकल व इतर कंपन्या वाढत आहे. यामुळे हवेतील प्रदूषण यासह नद्यांमधील प्रदूषणदेखील वाढत जात आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील जैवविविधतेवर होताना दिसून येत आहे.

जळगाव शहरात धूलिकणांचे प्रमाण वाढले

जळगाव शहरात अमृत अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे धूलिकण यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षात जळगाव शहरातील धूलिकणांचे प्रमाण हे ३० टक्क्यांनी वाढले आहे. २०१७ मध्ये शहरातील वातावरणात धूलिकणांचे प्रमाण हे ५५ ते ६० टक्के इतके होते. आज ते प्रमाण ९० ते ९५ टक्के इतके झाले आहे. तसेच वातावरणात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण देखील वाढत जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम जाणवत आहेत. जळगाव शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गिरणा व तापी नद्याही झाल्या प्रदूषित

जळगाव जिल्ह्यात गिरणा व तापी या दोन नद्या प्रमुख असून या दोन नद्यांच्या काठी जिल्ह्यातील ७० टक्के सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. मात्र, जळगाव शहरातील ७० टक्के सांडपाणी हे गिरणात सोडले जात असल्याने ही नदी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. यासह जळगाव शहरातील एमआयडीसीचे सर्व दूषित पाणी हे तापी नदीत सोडले जाते. यामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये या दोन्ही नद्यांमधील जलचरांवर देखील मोठा परिणाम झाला आहे. जलचर अभ्यासक राहुल सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील तापी व गिरणा नदीमधील अनेक मासे त्याच्या जेनेटिक्स बदल होत आहेत. तसेच अनेक दुर्लभ प्रजाती नष्ट होत जात आहे.

कोट..

जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण व शहरीकरण होत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावरदेखील होत आहे. जळगाव शहरात एका योजनेमुळे धूलिकणांचे संख्येत वाढ झाली आहे, तर प्रदूषणाचे प्रमाण देखील वाढले आहे.

- डॉ. नीलेश गोरे, हवामान तज्ज्ञ