शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

जळगावात वाढत्या थंडीसह रुग्णालयांमध्येही वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:48 IST

लहान मुलांसह मोठ्यांना सर्दी, खोकला, तापाची लागण

जळगाव : डिसेंबर महिन्याला सुरुवात झाल्यापासून जळगावकरांना थंडी जाणवू लागली असून गेल्या काही दिवसांपासून पारा अधिकच घसरल्याने सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांनी शहरवासीयांना ग्रासले आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्येही गर्दी होऊ लागली असून उबदार कपडे घालण्यासह आहाराची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.आरोग्यासाठी हितवर्धक असलेल्या हिवाळ््याला सुरुवात झाली असून आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या या ऋतूमध्ये काळजी घेतली नाही तर आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होतात. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने नोव्हेंबर महिन्यात फारसी थंडी जाणवली नाही. त्यामुळे दिवसा उष्ण व रात्री थंड अशा वातावरणामुळे अनेकांना व्हायरल फिव्हरचा त्रास झाला. त्यातून शहरवासीय सावरत नाही तोच अचानक तापमानात घट झाल्याने त्याचाही परिणाम जाणवू लागला आहे.हिवाळा सुरू झाल्यावर तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण वाढते़ या दिवसात योग्य काळजी न घेतल्यास प्रारंभी सर्दी, खोकला होतो आणि नंतर ताप येतो़ हिवाळ््याच्या दिवसांमध्ये दवाखान्यात येणाऱ्या ५० टक्के रूग्णांना सर्दी, खोकल्याचा अधिक त्रास असतो़ औषधोपचाराने हा आजार बरा होतो़ मात्र त्या व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो़ त्यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत़ हा अशक्तपणा घालविण्यासाठी योग्य वेळ झोप, ताजे अन्न खाण्याची गरज आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नागरिकांना सर्दी, खोकल्याच्या बरोबरीनेच अंगदुखीचा त्रास जाणवत आहे़उबदार कपड्यांना मागणीशहरातील कोर्ट चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील जी.एस. ग्राऊंडचा एक भाग थंडीपासून संरक्षणासाठीच्या उबदार कपडे विक्रेत्यांना काही काळासाठी देण्यात आला आहे. या चौकात उबदार कपडे विक्रेत्यांमध्ये दरवर्षी येणाºया तिबेटीयन विक्रेत्यांची दुकाने अधिक आहे. स्वेटर, टोपी, मफलर, कान टोपीपासून हातमोजे व अन्य कपडे या ठिकाणी विक्रीसाठी विविध प्रकारात उपलब्ध आहेत. यावर्षी १० ते २० टक्के किंमती वाढल्या असल्याचे विक्रेते सांगतात. थंडी वाढल्याने आता या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.अशी घ्या काळजी- बाहेर पडताना उबदार कपडे घाला- घरी असतानाही सुती कपडे घाला़-गरम, ताजे पदार्थ खावेत़-स्वच्छ पाणी प्यावे, मच्छरदानी वापरा़-घराच्या आजूबाजूला अस्वच्छता पसरू देवू नका़-थंड पदार्थ खाणे टाळा-डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेवू नका़वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकला व काही प्रमामात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. योग्य काळजी घेतल्यास हे आजारा टाळता येतात. त्यासाठी उबदार कपडे वापरण्यासह आहाराबाबतही काळजी घेणे आवश्यक आहे.- डॉ. डी.आर. जयकर, जनरल प्रॅक्टीशनर

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव