शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

अधिकृत वीज कनेक्शन घेण्यास घरकुलातील लाभार्थीच अनुत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:46 AM

जामनेरात प्राथमिक सुविधा नसताना पालिकेने घरकुले वाटप केल्याचा आरोप

जामनेर, दि.जळगाव : पालिकेने बांधलेल्या घरकुलातील लाभार्र्थींचे वीज कनेक्शन अनधिकृत असले तरी दोन दिवसात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देण्याच्या अटीवर सोमवारी रात्री काही भागाचा पुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र मंगळवारी फक्त ४३ लाभार्र्थींनी नवीन मीटर मागणीचे अर्ज सादर केल्याची माहिती मिळाली.स्थानिक नगरसेवक प्रत्येक लाभार्थीस भेटून त्यांना अधिकृत वीज कनेक्शन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देत होते. एकलव्य नगर भागातील ४० व जवळच्या दुसऱ्या घरकुलातील फक्त तीन लाभार्र्थींनी नवीन कनेक्शनसाठी अर्ज सादर केले.अनधिकृतपणे घेतलेल्या विजेच्या जीर्ण वायरमधून झालेल्या वीजपुरवठ्याचा धक्का बसल्याने सोमवारी दोन गुरे दगावली होती. या घटनेनंतर वीज वितरण कंपनी व पालिका प्रशासन सतर्क झाले.दरम्यान, या घटनेबाबत काँग्रेसचे कार्यकर्ते अशपाक पटेल यांनी सांगितले की, घरकुलातील लाभार्थ्यांना नियमित व अधिकृत वीजपुरवठा करण्याबाबत शहर विभागातील कनिष्ठ अभियंत्याशी गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पालिकेने घरकुलांचे वाटप करण्यापूर्वी त्या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांची पूर्तता करणे गरजेचे होते. तसे न करता घाईघाईने लाभार्र्थींना घरकुलांचे वाटप केले. आजही येथे बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झालेले नाही. घरकुलातील लाभार्र्थींना अधिकृत वीज कनेक्शन मिळण्यासाठी पालिकेने कार्यवाही करणे गरजेचे आहे.पालिकेने आयएचएसडीपी योजनेंतर्गत घोडेपीरनगर व एकलव्यनगर भागातील घरकुलातील लाभार्र्थींनी मागणी केल्यास त्यांना या जागेत त्यांच्या नावावर स्वखर्चाने वीजपुरवठा देण्यास पालिकेची हरकत नाही, मात्र प्रत्येक अर्जासोबत पालिकेने त्यांना दिलेल्या ताबापावतीची झेरॉक्सप्रत घेण्यात यावी, असे पत्र वीज वितरण कंपनीस दिल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली.जामनेर शहरातील घरकुलांमध्ये राहणाºया लाभार्र्थींनी अधिकृत विजेचे कनेक्शन मागणीचे अर्ज सादर करणे अपेक्षित होते, मात्र आज फक्त ४३ अर्जच आले. नागरिकांनी तातडीने वीज जोडणी करून घ्यावी.-सतीश राजपूत, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण कंपनी, जामनेरजामनेर पालिकेने बांधलेल्या घरकुलात कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. केवळ ठेकेदाराला वाचविण्यासाठी प्रशासनाने घाईगर्दीत गोरगरीब लाभार्र्थींना वाटप केले. याचा त्यावेळेस पालिकेच्या सभेत विरोध केला होता. घोडेपीरनगरजवळ बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले पाहिजे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ज्या ठिकाणी विजेच्या धक्क्याने गुरे दगावली, तो मुंबई-नागपूर राज्यमार्ग असून, या रस्त्याने दिवसभर वाहतुक सुरू असते. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षाने घटना घडली. सुदैवाने अनर्थ टळला, प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. -जावेद ईक्बाल रशीद, माजी उपनगराध्यक्ष, जामनेर