शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक आरोग्य सेवेचे महत्त्व अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 00:01 IST

गैरसोयी, दुर्लक्ष तरीही गरीब, गरजूंसाठी सरकारी दवाखाने उपयुक्त, महाआरोग्य शिबिरे घेऊन काय साधले हा लाखमोलाचा प्रश्न, आरोग्य सेवेच्या इमारती उभ्या राहिल्या; सुविधांकडे मात्र पाठ

मिलिंद कुलकर्णी

कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेचे महत्त्व अबाधित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शहरांमधील बहुसंख्य मोठमोठी खाजगी रुग्णालये कोरोनाच्या आपत्ती काळात कुलूपबंद झालेली असताना सार्वजनिक आरोग्य सेवा सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना आधार वाटत आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या काही अडचणी, प्रश्न असतील, परंतु, संकटसमयी ही मंडळी मागे हटली, हे सामान्य जनांना जाणवल्याशिवाय राहिले नाही.
सार्वजनिक सेवांचे महत्त्व अशा प्रसंगी पटते. मग ती आरोग्य सेवा असो की, एस.टी., रेल्वे, टेलिफोन सेवा असो...या सामान्यांच्या हक्काच्या सेवा आहेत. त्यामुळे जनक्षोभाच्या पहिल्या बळी याच सार्वजनिक सेवा ठरतात, हे देखील तेवढेच वास्तव आहे. या सेवांमध्ये खाजगीकरण आल्यानंतर लोक ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ या पध्दतीप्रमाणे तिकडे वळले तरी सार्वजनिक सेवांचे महत्त्व कमी झालेले नाही.
शहरी व ग्रामीण भागात असुविधा, दुर्लक्ष यांचा सामना करीत सार्वजनिक आरोग्य सेवा आजही कार्यरत आहेत. कोरोनाविरुध्दच्या लढाईत योगदान देत आहे.
याउलट महाआरोग्य शिबिरे, आरोग्यदूत यांचा मध्यंतरीच्या काळात मोठा सुळसुळाट झाला होता. मुंबई-पुण्याचे डॉक्टर तालुकापातळीवर येऊन एक-दोन दिवसांत हजारो रुग्णांची तपासणी करुन गेले. नंतर त्यांची मुंबई, पुण्याला शिफारस केली गेली. पुढे काय झाले, हे कधीच कुणाला कळले नाही. इव्हेंट मोठा झाला. मुख्यमंत्री, मंत्री आले. कौतुक करुन गेले. फाऊंडेशन, प्रतिष्ठानांच्या स्वमालकीच्या इमारती झाल्या. आरोग्यदूत चारचाकी वाहनांमधून फिरु लागले. काहींना पुरस्कृत केले गेले. ही भौतिक प्रगती होत असताना सार्वजनिक आरोग्य सेवेकडे मात्र पुरते दुर्लक्ष झाले. अत्याधुनिक यंत्रसामुग्री येऊनही ती वर्षभर पडून राहू लागली. व्हेंटीलेटर अपूर्ण आहेत. महिन्याभरानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा उपाय असलेले किट मिळतात. कोरोना कक्ष गलिच्छ जागेत सुरु होतो. हे कसले लक्षण आहे? वर्षभर या रुग्णालयांमध्ये वावरणारे सामाजिक कार्यकर्ते, आरोग्यदूत मोक्याच्या प्रसंगी मात्र गायब आहेत.
खासदार आणि आमदार निधीचा विनियोग हा देखील खरे तर संशोधनाचा विषय आहे. व्यायामशाळा, हायमस्ट लॅम्प, समाजमंदिर, स्पर्धा परीक्षांची पुस्तके या गोष्टींवर सर्वाधिक निधी खर्च होत असताना सार्वजनिक आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी किती निधीची तरतूद केली गेली, हेही एकदा तपासून पहायला हवे. आता केंद्र सरकारने खासदार निधीतून एक कोटी रुपये वर्ग करुन घेतले, ते एक बरे झाले. किमान कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य सेवेकडे लक्ष तरी दिले जाईल. त्यांचे बळकटीकरण तरी होईल.
खान्देशात गेल्या पाच वर्षांत महाआरोग्य शिबिरांचे भव्य आयोजन केले गेले. लाखो लोकांनी त्याचा लाभ घेतल्याचा दावा केला गेला. मात्र सार्वजनिक आरोग्य सेवेचे वास्तव चित्र ‘कोरोना’मुळे समोर आले. इव्हेंटचा बुडबुडा फुटला.
वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य
रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पालिका रुग्णालये ही गोरगरीब जनतेच्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. परंतु, या रुग्णालयांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोन्ही यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले. व्हेंटीलेटर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपाय या गोष्टींचा अभाव जाणवत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव