शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

पावसाच्या दडीने जळगावच्या बाजारात मुगाच्या आवकवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 10:57 IST

गहू, तांदूळ, डाळीचे भाव स्थिर

ठळक मुद्देडाळींचा दिलासा८ ते १० दिवसात होणार चित्र स्पष्ट

जळगाव : जळगावच्याबाजारपेठेत उडीदाची आवक सुरू झाली असून मुगाच्या आवकवर मात्र पावसाच्या दडीने परिणाम झाला आहे. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच गेल्या २१ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मूग उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढण्यासह बाजारपेठेतही त्याचा परिणाम जाणवणार असल्याचे चिन्ह आहे. दरम्यान, गहू, तांदूळ, डाळ यांची मागणीनुसार पुरेसी आवक असल्याने आठवडाभरापासून त्यांचे भाव स्थिर आहे.सप्टेंबर महिन्यापासून बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू होते. मात्र मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने मुगाच्या शेंग्या भरण्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पिकाच्या उताºयावरही परिणाम होणार आहे. पुढील आठवड्यापासून आवक वाढण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी पावसामुळे होणारा परिणाम बाजारातही जाणवणार असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, चिखली, मेहकर, अकोला या भागातून मुगाची आवक होते. मात्र यंदा अद्यापही दरवर्षाच्या तुलनेत आवक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भावावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे थोड्याफार प्रमाणात उडीदाची आवक सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून थोडीफार नवीन उडीदाची आवक सुरू आहे. जळगावात दररोज २०० क्विंटल उडीदाची आवक सुरू असून मूग मात्र केवळ ५० क्विंटलच्या जवळपास येत आहे.८ ते १० दिवसात होणार चित्र स्पष्टभाद्रपद महिना सुरू होताच उन्हाचाही चटका वाढला असून उडीद-मुगाची आवक वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या उडीदाचा ३५०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल भाव असून मुगाला ३८०० ते ४६०० रुपये भाव मिळत आहे. कर्नाटकमधून येणाºया चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ५००० रुपये प्रती क्विंटलपर्यंत आहेत. मात्र येता ८ ते १० दिवसात आवक व भावाचे खरे चित्र स्पष्ट होईल, असे जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी सांगितले.गहू, तांदूळ स्थिरमागणीनुसार धान्याची आवक सुरू असल्याने धान्य व डाळींचे भाव स्थिर आहेत. १४७ गहू २४०० ते २५०० रुपयांवर स्थिर असून लोकवन गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये, शरबती गहू २५०० ते २६०० रुपये आणि चंदोसीचे भाव ३६०० ते ३८०० रुपयांवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे. तांदुळाचे भावदेखील स्थिर आहेत.डाळींचा दिलासाबाजारात उडीदाची आवक सुरू झाली असून पुढील आठवड्यात ती वाढण्याची शक्यता आहे. मुगाची आवक कमी असली तरी डाळींचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांना तेवढा दिलासा आहे. बाजारपेठेत मुगाची डाळ ६६ ते ७० रुपये प्रती किलोवर स्थिर असून उडीद डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलो, तूरडाळ - ५६ ते ६० आणि हरभरा डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव