शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पावसाच्या दडीने जळगावच्या बाजारात मुगाच्या आवकवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 10:57 IST

गहू, तांदूळ, डाळीचे भाव स्थिर

ठळक मुद्देडाळींचा दिलासा८ ते १० दिवसात होणार चित्र स्पष्ट

जळगाव : जळगावच्याबाजारपेठेत उडीदाची आवक सुरू झाली असून मुगाच्या आवकवर मात्र पावसाच्या दडीने परिणाम झाला आहे. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच गेल्या २१ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मूग उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढण्यासह बाजारपेठेतही त्याचा परिणाम जाणवणार असल्याचे चिन्ह आहे. दरम्यान, गहू, तांदूळ, डाळ यांची मागणीनुसार पुरेसी आवक असल्याने आठवडाभरापासून त्यांचे भाव स्थिर आहे.सप्टेंबर महिन्यापासून बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू होते. मात्र मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने मुगाच्या शेंग्या भरण्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पिकाच्या उताºयावरही परिणाम होणार आहे. पुढील आठवड्यापासून आवक वाढण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी पावसामुळे होणारा परिणाम बाजारातही जाणवणार असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, चिखली, मेहकर, अकोला या भागातून मुगाची आवक होते. मात्र यंदा अद्यापही दरवर्षाच्या तुलनेत आवक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भावावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे थोड्याफार प्रमाणात उडीदाची आवक सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून थोडीफार नवीन उडीदाची आवक सुरू आहे. जळगावात दररोज २०० क्विंटल उडीदाची आवक सुरू असून मूग मात्र केवळ ५० क्विंटलच्या जवळपास येत आहे.८ ते १० दिवसात होणार चित्र स्पष्टभाद्रपद महिना सुरू होताच उन्हाचाही चटका वाढला असून उडीद-मुगाची आवक वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या उडीदाचा ३५०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल भाव असून मुगाला ३८०० ते ४६०० रुपये भाव मिळत आहे. कर्नाटकमधून येणाºया चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ५००० रुपये प्रती क्विंटलपर्यंत आहेत. मात्र येता ८ ते १० दिवसात आवक व भावाचे खरे चित्र स्पष्ट होईल, असे जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी सांगितले.गहू, तांदूळ स्थिरमागणीनुसार धान्याची आवक सुरू असल्याने धान्य व डाळींचे भाव स्थिर आहेत. १४७ गहू २४०० ते २५०० रुपयांवर स्थिर असून लोकवन गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये, शरबती गहू २५०० ते २६०० रुपये आणि चंदोसीचे भाव ३६०० ते ३८०० रुपयांवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे. तांदुळाचे भावदेखील स्थिर आहेत.डाळींचा दिलासाबाजारात उडीदाची आवक सुरू झाली असून पुढील आठवड्यात ती वाढण्याची शक्यता आहे. मुगाची आवक कमी असली तरी डाळींचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांना तेवढा दिलासा आहे. बाजारपेठेत मुगाची डाळ ६६ ते ७० रुपये प्रती किलोवर स्थिर असून उडीद डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलो, तूरडाळ - ५६ ते ६० आणि हरभरा डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव