शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

पावसाच्या दडीने जळगावच्या बाजारात मुगाच्या आवकवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 10:57 IST

गहू, तांदूळ, डाळीचे भाव स्थिर

ठळक मुद्देडाळींचा दिलासा८ ते १० दिवसात होणार चित्र स्पष्ट

जळगाव : जळगावच्याबाजारपेठेत उडीदाची आवक सुरू झाली असून मुगाच्या आवकवर मात्र पावसाच्या दडीने परिणाम झाला आहे. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच गेल्या २१ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मूग उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढण्यासह बाजारपेठेतही त्याचा परिणाम जाणवणार असल्याचे चिन्ह आहे. दरम्यान, गहू, तांदूळ, डाळ यांची मागणीनुसार पुरेसी आवक असल्याने आठवडाभरापासून त्यांचे भाव स्थिर आहे.सप्टेंबर महिन्यापासून बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू होते. मात्र मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने मुगाच्या शेंग्या भरण्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पिकाच्या उताºयावरही परिणाम होणार आहे. पुढील आठवड्यापासून आवक वाढण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी पावसामुळे होणारा परिणाम बाजारातही जाणवणार असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, चिखली, मेहकर, अकोला या भागातून मुगाची आवक होते. मात्र यंदा अद्यापही दरवर्षाच्या तुलनेत आवक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भावावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे थोड्याफार प्रमाणात उडीदाची आवक सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून थोडीफार नवीन उडीदाची आवक सुरू आहे. जळगावात दररोज २०० क्विंटल उडीदाची आवक सुरू असून मूग मात्र केवळ ५० क्विंटलच्या जवळपास येत आहे.८ ते १० दिवसात होणार चित्र स्पष्टभाद्रपद महिना सुरू होताच उन्हाचाही चटका वाढला असून उडीद-मुगाची आवक वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या उडीदाचा ३५०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल भाव असून मुगाला ३८०० ते ४६०० रुपये भाव मिळत आहे. कर्नाटकमधून येणाºया चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ५००० रुपये प्रती क्विंटलपर्यंत आहेत. मात्र येता ८ ते १० दिवसात आवक व भावाचे खरे चित्र स्पष्ट होईल, असे जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी सांगितले.गहू, तांदूळ स्थिरमागणीनुसार धान्याची आवक सुरू असल्याने धान्य व डाळींचे भाव स्थिर आहेत. १४७ गहू २४०० ते २५०० रुपयांवर स्थिर असून लोकवन गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये, शरबती गहू २५०० ते २६०० रुपये आणि चंदोसीचे भाव ३६०० ते ३८०० रुपयांवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे. तांदुळाचे भावदेखील स्थिर आहेत.डाळींचा दिलासाबाजारात उडीदाची आवक सुरू झाली असून पुढील आठवड्यात ती वाढण्याची शक्यता आहे. मुगाची आवक कमी असली तरी डाळींचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांना तेवढा दिलासा आहे. बाजारपेठेत मुगाची डाळ ६६ ते ७० रुपये प्रती किलोवर स्थिर असून उडीद डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलो, तूरडाळ - ५६ ते ६० आणि हरभरा डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव