शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांना खो देण्याचा अनिष्ट पायंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 11:36 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलून सत्ता प्रशासनामार्फत हाती ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या सत्ताधारी नेत्यांकडून निवडणुकांना खो; परिषदेच्या आंदोलनाने घरचा अहेर

मिलिंद कुलकर्णीकाँग्रेसच्या राजवटीत ८० च्या दशकात तब्बल ११ वर्षे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. जळगावात के.डी.आबा पाटील या मातब्बर नेत्याकडे अध्यक्षपद दीर्घकाळ राहिले. परंतु, राजीव गांधी हे पंतप्रधान झाल्यानंतर पंचायत राज व्यवस्था आली आणि दर पाच वर्षांनी नियमित निवडणुका होऊ लागल्या.मात्र भाजप सरकारने प्रथमच अनिष्ट पायंडा पाडत नागपूर, नंदुरबार, धुळे, अकोला व वाशिम जि.प.च्या निवडणुका आणि राज्यातील जि.प.अध्यक्ष व पं.स.सभापतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. ग्रामीण नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे.लोकशाही व्यवस्थेत लोकांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींना मोठे महत्त्व असते. आणीबाणीच्या काळात लोकशाही धोक्यात आली, नागरिकांच्या अधिकारांचा संकोच झाला. त्याविरोधात जनआंदोलन झाले. सत्ता परिवर्तन झाले. हा इतिहास कोणत्याही राजकीय पक्षाने विसरता कामा नये. विशेषत: ज्यांनी हुकुमशाहीला विरोध केला, आणीबाणीविरोधात १८ महिन्यांचा कारावास भोगला त्यांनी तर अजिबात विस्मरण होऊ देऊ नये.परंतु, दुर्देव असे की, राज्यातील भाजप सरकारच लोकशाहीविरोधी निर्णय घेताना दिसत आहे. त्यासाठी सबब मात्र प्रशासकीय दाखविली जात आहे. सत्ता आपल्या हाती रहावी,यासाठी हा खटाटोप असल्याने लोकशाहीच्यादृष्टीने हा चिंतेचा विषय ठरावा.नंदुरबार आणि धुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांची पंचवार्षिक मुदत गेल्या वर्षीच संपली. आरक्षणाच्या मुद्यावरुन काही नागरिक न्यायालयात गेल्याने विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली. न्यायालयाने तातडीने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेतील लोकनियुक्त पदाधिकारी बरखास्त झाले आणि प्रशासक नियुक्त झाले. आता राज्य शासनाने प्रशासकीय सबब दाखवत निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. प्रशासनाच्या म्हणजे पर्यायाने सरकारच्या ताब्यात या जिल्हा परिषदांची सत्ता निवडणुका न घेता गेली आहे. ही एकप्र्रकारे लोकशाहीची थट्टा आहे.असाच प्रकार महाविद्यालयीन निवडणुकांबाबत झाला आहे. नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी गेल्याच वर्षी झालेली असताना संभ्रम असल्याचे कारण देत निवडणुका घेतल्या नव्हत्या. यंदा महाविद्यालयीन व विद्यापीठीय निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा झाल्या. आणि आता या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री हे विद्यार्थी चळवळीतून समाजकारण व राजकारणात आले. त्यांच्याकडून ही अपेक्षा निश्चितच नव्हती. परंतु, सत्ता हाती आली की, कोणाविषयी हमी देणे अवघड झालेले आहे. भाजप, संघ परिवारातील अ.भा.वि.प. या विद्यार्थी संघटनेने स्वकीयांविरुध्द आंदोलन करुन या कृतीचा निषेध केला आहे. हा घरचा अहेर तरी सत्ताधीशांच्या लक्षात येतो का हे आता बघायचे.ग्रामीण भागाच्या विकासासाठी तेथील नेतृत्व पुढे यायला हवे, नवा भारत घडविण्यासाठी युवकांच्या हाती कमान यायला हवी, अशी कंठाळी भाषणे सर्व व्यासपीठांवरुन नेतेमंडळी देत असतात, पण अधिकारांचे हनन करण्यात हीच मंडळी अग्रभागी राहत असल्याचा अनुभव दोन प्रसंगांमधून आला आहे. लोकशाहीच्यादृष्टीने हा अनिष्ट पायंडा आहे.मतदानाऐवजी गुणवत्तेनुसार महाविद्यालयीन निवडणुका गेली काही वर्षे सुरु आहेत. नवीन विद्यापीठ कायदा भाजप सरकारने आणल्यानंतर गेल्यावर्षी विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. तेव्हा त्या झाल्या नाही, यंदा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, प्रशिक्षण कार्यशाळा झाल्या आणि अचानक राज्य सरकारने या निवडणुकादेखील पुढे ढकलल्या. विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या नेतृत्वाकडून हा निर्णय होणे हे खरे म्हणजे धक्कादायक म्हणावे लागेल.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव