शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनांकडे सपशेल दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:27 IST

फवारणी होईना

ठळक मुद्देदिवसागणिक वाढतेय रुग्ण संख्याडेंग्यू नियंत्रणासाठी ७२ कर्मचारी

जळगाव : शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दररोज आहे. जिल्हाधिकारी, महापौरांचे बंधू, उपमहापौर यांना डेंग्यू झाल्यानंतरही आरोग्य यंत्रणेला जाग येत नसल्याचे चित्र शहरात आहे. पाच लाख लोकसंख्येच्या शहरासाठी केवळ ७२ कर्मचाऱ्यांवर डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी आहे. तसेच धूर फवारणीसाठीदेखील केवळ १४ मशीन असल्याने शहरातील बहुतांश भागात फवारणी होतच नसल्याचे चित्र आहे.शहरात गेल्या दोन महिन्यापासून डेंग्यू व इतर आजारांनी मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यातच पावसामुळे घराशेजारी तसेच इतरत्र साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. सध्यादेखील दररोज तीन ते चार डेंग्यूचे रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खाजगी रुग्णालयांमध्ये लहान मुलांसह महिला, तरूण, वृद्ध यांना डेंग्यूची लागण असून असे जवळपास ४०च्यावर डेंग्यूचे रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली.प्रचंड अस्वच्छताशहरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढिग साचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल परिसरात तर प्रचंड घाण झाली आहे. कचºयाचे ढीग साचले आहेत. याबाबत तक्रार करुनही उपयोग होत नाही.फवारणी नाहीडेंग्यूच्या नियंत्रणासाठी मनपाच्या पथकात २४ कायम कर्मचारी असून ७२ इतर कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र कायम कर्मचाºयांपैकी दररोज सरासरी २० कर्मचारी तर इतर ७२ पैकी ५२ कर्मचारी कामावर असतात. प्रत्यक्षात २०० मजुरांची आवश्यकता असताना केवळ ७२ कर्मचाºयांवर डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी मनपाने दिली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या सोबतच १६ पैकी केवळ १४ धूर फवारणी मशीन सुरू असून एवढ्या मोठ्या शहरासाठी त्या कमी पडत असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी शहरातील दहा भागांची पाहणी केली असता एकाही भागात फवारणी झाली नव्हती.शहरात जागोजागी कचºयाचे ढीगशहरात डेंग्यूसह विविध आजार पसरत असतानाही शहरातील साफसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. जिल्हा क्रीडा संकुल परिसरासह अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले असून त्यामुळे डासांची संख्याही वाढत आहे. जिल्हाधिकारी, महापौरांचे बंधू, उपमहापौर यांना डेंग्यू झाल्यानंतरही मनपाने यातून काही धडा घेतला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे फवारणी होत नसताना किमान साफसफाई तरी व्हावी अशी मागणी होत आहे.ज्या भागात डेंग्यूची तक्रार येत आहे अथवा सूचना मिळत आहे त्या भागात नियमित फवारणी, अ‍ॅबेटिंग केले जात आहे.- एस.व्ही. पांडे, जीवशास्त्रज्ञ, आरोग्य विभाग, मनपा.डेंग्यूच्या नियंत्रणासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. यासाठी एक दिवस कोरडा दिवस पाळला पाहिजे. डासांची उत्पत्ती असणाºया ठिकाणी थोडे रॉकेल अथवा डिझेल टाकावे, पाणी व द्रव पदार्थाचे जास्त सेवन करावे.- डॉ. हेमंत पाटील, बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव