शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जळगावात डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनांकडे सपशेल दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:27 IST

फवारणी होईना

ठळक मुद्देदिवसागणिक वाढतेय रुग्ण संख्याडेंग्यू नियंत्रणासाठी ७२ कर्मचारी

जळगाव : शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दररोज आहे. जिल्हाधिकारी, महापौरांचे बंधू, उपमहापौर यांना डेंग्यू झाल्यानंतरही आरोग्य यंत्रणेला जाग येत नसल्याचे चित्र शहरात आहे. पाच लाख लोकसंख्येच्या शहरासाठी केवळ ७२ कर्मचाऱ्यांवर डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी आहे. तसेच धूर फवारणीसाठीदेखील केवळ १४ मशीन असल्याने शहरातील बहुतांश भागात फवारणी होतच नसल्याचे चित्र आहे.शहरात गेल्या दोन महिन्यापासून डेंग्यू व इतर आजारांनी मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यातच पावसामुळे घराशेजारी तसेच इतरत्र साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. सध्यादेखील दररोज तीन ते चार डेंग्यूचे रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खाजगी रुग्णालयांमध्ये लहान मुलांसह महिला, तरूण, वृद्ध यांना डेंग्यूची लागण असून असे जवळपास ४०च्यावर डेंग्यूचे रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली.प्रचंड अस्वच्छताशहरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढिग साचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल परिसरात तर प्रचंड घाण झाली आहे. कचºयाचे ढीग साचले आहेत. याबाबत तक्रार करुनही उपयोग होत नाही.फवारणी नाहीडेंग्यूच्या नियंत्रणासाठी मनपाच्या पथकात २४ कायम कर्मचारी असून ७२ इतर कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र कायम कर्मचाºयांपैकी दररोज सरासरी २० कर्मचारी तर इतर ७२ पैकी ५२ कर्मचारी कामावर असतात. प्रत्यक्षात २०० मजुरांची आवश्यकता असताना केवळ ७२ कर्मचाºयांवर डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी मनपाने दिली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या सोबतच १६ पैकी केवळ १४ धूर फवारणी मशीन सुरू असून एवढ्या मोठ्या शहरासाठी त्या कमी पडत असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी शहरातील दहा भागांची पाहणी केली असता एकाही भागात फवारणी झाली नव्हती.शहरात जागोजागी कचºयाचे ढीगशहरात डेंग्यूसह विविध आजार पसरत असतानाही शहरातील साफसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. जिल्हा क्रीडा संकुल परिसरासह अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले असून त्यामुळे डासांची संख्याही वाढत आहे. जिल्हाधिकारी, महापौरांचे बंधू, उपमहापौर यांना डेंग्यू झाल्यानंतरही मनपाने यातून काही धडा घेतला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे फवारणी होत नसताना किमान साफसफाई तरी व्हावी अशी मागणी होत आहे.ज्या भागात डेंग्यूची तक्रार येत आहे अथवा सूचना मिळत आहे त्या भागात नियमित फवारणी, अ‍ॅबेटिंग केले जात आहे.- एस.व्ही. पांडे, जीवशास्त्रज्ञ, आरोग्य विभाग, मनपा.डेंग्यूच्या नियंत्रणासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. यासाठी एक दिवस कोरडा दिवस पाळला पाहिजे. डासांची उत्पत्ती असणाºया ठिकाणी थोडे रॉकेल अथवा डिझेल टाकावे, पाणी व द्रव पदार्थाचे जास्त सेवन करावे.- डॉ. हेमंत पाटील, बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव