शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

जळगावात डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनांकडे सपशेल दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:27 IST

फवारणी होईना

ठळक मुद्देदिवसागणिक वाढतेय रुग्ण संख्याडेंग्यू नियंत्रणासाठी ७२ कर्मचारी

जळगाव : शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दररोज आहे. जिल्हाधिकारी, महापौरांचे बंधू, उपमहापौर यांना डेंग्यू झाल्यानंतरही आरोग्य यंत्रणेला जाग येत नसल्याचे चित्र शहरात आहे. पाच लाख लोकसंख्येच्या शहरासाठी केवळ ७२ कर्मचाऱ्यांवर डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी आहे. तसेच धूर फवारणीसाठीदेखील केवळ १४ मशीन असल्याने शहरातील बहुतांश भागात फवारणी होतच नसल्याचे चित्र आहे.शहरात गेल्या दोन महिन्यापासून डेंग्यू व इतर आजारांनी मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यातच पावसामुळे घराशेजारी तसेच इतरत्र साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. सध्यादेखील दररोज तीन ते चार डेंग्यूचे रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खाजगी रुग्णालयांमध्ये लहान मुलांसह महिला, तरूण, वृद्ध यांना डेंग्यूची लागण असून असे जवळपास ४०च्यावर डेंग्यूचे रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली.प्रचंड अस्वच्छताशहरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढिग साचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल परिसरात तर प्रचंड घाण झाली आहे. कचºयाचे ढीग साचले आहेत. याबाबत तक्रार करुनही उपयोग होत नाही.फवारणी नाहीडेंग्यूच्या नियंत्रणासाठी मनपाच्या पथकात २४ कायम कर्मचारी असून ७२ इतर कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र कायम कर्मचाºयांपैकी दररोज सरासरी २० कर्मचारी तर इतर ७२ पैकी ५२ कर्मचारी कामावर असतात. प्रत्यक्षात २०० मजुरांची आवश्यकता असताना केवळ ७२ कर्मचाºयांवर डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी मनपाने दिली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या सोबतच १६ पैकी केवळ १४ धूर फवारणी मशीन सुरू असून एवढ्या मोठ्या शहरासाठी त्या कमी पडत असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी शहरातील दहा भागांची पाहणी केली असता एकाही भागात फवारणी झाली नव्हती.शहरात जागोजागी कचºयाचे ढीगशहरात डेंग्यूसह विविध आजार पसरत असतानाही शहरातील साफसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. जिल्हा क्रीडा संकुल परिसरासह अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले असून त्यामुळे डासांची संख्याही वाढत आहे. जिल्हाधिकारी, महापौरांचे बंधू, उपमहापौर यांना डेंग्यू झाल्यानंतरही मनपाने यातून काही धडा घेतला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे फवारणी होत नसताना किमान साफसफाई तरी व्हावी अशी मागणी होत आहे.ज्या भागात डेंग्यूची तक्रार येत आहे अथवा सूचना मिळत आहे त्या भागात नियमित फवारणी, अ‍ॅबेटिंग केले जात आहे.- एस.व्ही. पांडे, जीवशास्त्रज्ञ, आरोग्य विभाग, मनपा.डेंग्यूच्या नियंत्रणासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. यासाठी एक दिवस कोरडा दिवस पाळला पाहिजे. डासांची उत्पत्ती असणाºया ठिकाणी थोडे रॉकेल अथवा डिझेल टाकावे, पाणी व द्रव पदार्थाचे जास्त सेवन करावे.- डॉ. हेमंत पाटील, बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव