शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

बुडालेल्यास २२ तासानंतर काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:21 IST

रामदेववाडी शिवारातील घटना : नळांना पाणी आले नाही म्हणून आंघोळीला गेला अन् जीव गमावला

जळगाव : चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावाशेजारीच असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेलेल्या चेतन साहेबराव राठोड (१८) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रामदेववाडी, ता.जळगाव येथे घडली आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता बुडालेल्या या तरुणाचा मृतदेह तब्बल २२ तासांनी म्हणजे रविवारी सकाळी ७ वाजता हाती लागला. मृतदेह शोधण्यासाठी महापालिकेचे पथक त्याशिवाय रामदेववाडी, शिरसोली, पाथरी, म्हसावद व गालापूर येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदेववाडीसह परिसरातील वावडदा, वडली, जळके येथे बाराही महिने पाणी टंचाई असते. उन्हाळ्यात तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई जाणवते. रामदेववाडी येथे चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावातील तरुण तलावात आंघोळीसाठी जातात. शनिवारी चेतन, नवल पांडूरंग राठोड व सागर धनराज राठोड असे तिघं जण तलावात आंघोळीसाठी गेले. नवल व सागर तलावाकाठी मोबाईलवर टिकटॉक व्हिडीओ तयारी करीत असताना चेतन आंघोळीसाठी उतरला. पोहता येत नसल्याने तो खोल खड्डयात गेला अन् जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करायला लागला. हा प्रकार पाहून सागर व नवल दोघं जण मदतीला धावले, त्याशिवाय तलावाच्या दुसºया काठावर मासेमारी करीत असलेलेल हौसीलाल भोई हे देखील धावून आले. मात्र तलाव खोल व गाळ खूप प्रमाणात असल्याने चेतन हाती लागला नाही. त्यांनी हा प्रकार लागलीच गावात कळविला.पट्टीच्या पोहणाऱ्यांनी घेतला दिवसभर शोधचेतन पाण्यात बुडाल्याची माहिती रामदेववाडी व वावडदा गावात पसरल्यानंतर गावकºयांनी धाव घेऊन तलावात शोध कार्य राबविले. वावडदा येथील रवींद्र त्र्यंबक पाटील (कापडणे) यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देऊन मनपाचे पथकही मागविले. उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन देशमुख व संदीप पाटील यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून मदत मागविली. त्याशिवाय परिसरातील पट्टीच्या पोहणाºयांना पाचारण करण्यात आले. दिवसभरात ५० च्याव तरुणांनी तलावात चेतनचा शोध घेतला, मात्र काहीही उपयोग झाला नाही. रात्री उशिरा शोध मोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर रविवारी सकाळी चेतनचे नातेवाईक नानाभाऊ जेरी चव्हाण (रा.तळवण तांडा, ता.भडगाव) यांनी परत तलावात उडी घेऊन शोध मोहीम राबविली असता सात वाजता चेतनचे डोक त्यांच्या हाताला लागले. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. शनिवारी सकाळी ९ ते रविवारी सकाळी ७ असे २२ तास शोध कार्य चालले.कर्ता तरुण गेल्याने कुटुंबासमोर संकटचेतन हा कुटुंबातील कर्ता पुरुष होता. वडील साहेबराव हरी राठोड, आई द्वारकाबाई, व लहान भाऊ नितीन शेती व मजुरी करतात. कौटुंबिक व आर्थिक परिस्थित अत्यंत हलाकीची आहे. बहिण चैताली समाधान चव्हाण विवाहित आहे. चेतनच्या मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. रवींद्र पाटील व म्हसावदचे पोलीस कर्मचारी सचिन देशमुख यांना सकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सचिन मुंडे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.चेतन बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या शोध कार्यासाठी पंचक्रोशीतील पट्टीचे पोहणारे तसेच मनपाचे पथक बोलावले. दिवसभर व रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबविली. नळांना पाणी न आल्याने चेतन आंघोळीसाठी तलावात गेला होता. पाणी पुरवठा होत नसल्याने अनेक तरुण येथे आंघोळीसाठी जातात. कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे.-रवींद्र त्र्यंबक पाटील (कापडणे), सामाजिक कार्यकर्ते, वावडदा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव