शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

परिस्थितीनं लिहितं केलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:06 IST

माझी लेखन प्रेरणा

स्वप्नरंजनात कल्पनांच्या भराऱ्या अधिक असतात. मात्र स्वानुभावाच्या भट्टीत जे तावून-सुलाखून येतं; त्या लेखनाचा बाज वेगळा आणि जोरकस असतो. घरात लेखनाची परंपरा नसली तरी, परिस्थितीनं संघर्ष करण्याबरोबरच मन:पटलावर गोंधलेलं कागदावर उतरवण्याचं वळण लावलं. मी लिहित गेलो. समृद्ध होणं मात्र अजूनही सुरुच आहे.चौथीची परीक्षा पास झालो. त्याच वर्षी वडिलांनी चाळीसगाव येथील कापड गिरणीतील कामगाराच्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली. वर्ष होतं १९८४. बसस्थानकात ओरडून वर्तमानपत्र विकण्याचं काम सुरू केलं. पुढे घरोघरी वर्तमानपत्रं टाकण्याचं काम मिळालं. यातूनच पहाटे रेल्वे स्थानकावर जाऊन वर्तमानपत्रांचे गठ्ठे उतरवणं, पुरवण्या टाकणं अशी कामंही सुरू झाली. वर्तमानपत्रांचं आकर्षण निर्माण झालं. वाचनाचा छंदही जडला.कधी-कधी वर्तमानपत्रांच्या दोन-चार पुरवण्या जादा येत. त्या घरी आणून त्यांचं वाचन करू लागलो. शाळा आणि वर्तमानपत्र वाटण्याचं काम. माझ्या आयुष्याची सायकल अशा दोन चाकांवर सुखेनैव फिरत होती. याच दरम्यान चाळीसगावातील शेठ ना.बं. वाचनालयाशी परिचय झाला. महाविद्यालयात गेल्यावर ग्रंथालयाचं मोठं दालन पाहून हरखून गेलो. पुस्तके खुणावू लागली. पूर्ण रविवार 'वाचू आनंदे' असा सत्कारणी लागायचा. कालौघात शिक्षकी पेशात रुजलो. दरदिवशी दोन तास वाचनाचं वेळापत्रकच तयार केलं. हा शिरस्ता आजही कायम आहे. राज्यभरातील आघाडीची वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आणि नियतकालिकांमधून कविता व लेखातून व्यक्त होऊ लागलो. नामवंत दिवाळी अंकांमधून साहित्याची हजेरी लागली. पत्रकारिता क्षेत्राबद्दल आकर्षण होतं. मेहनतीनं आणि सरावानं यातही प्रवेश केला. पत्रकारितेत उमविमध्ये एम.ए. पूर्ण केले. चार काव्यसंग्रहांचं प्रकाशन झालं. मान्यवरांसाठी दिडशेहून अधिक मानपत्रंही लिहिली आहेत. स्मरणिका, गौरवग्रंथांचं संपादन करण्याची संधी मिळाली. पत्रकारितेमुळे लेखनाला आटोपशीर करण्याचा संस्कार मिळाला. लेखन वारी सुरुच असली तरी त्याचं रिंगणही पूर्ण व्हावं, हे ध्येय घेऊनच आयुष्य पादाक्रांत करतोय. आयुष्यात हे ध्येय पूर्ण होईल, अशी आशा आहे.- जिजाबराव वाघ