शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

परिस्थितीनं लिहितं केलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:06 IST

माझी लेखन प्रेरणा

स्वप्नरंजनात कल्पनांच्या भराऱ्या अधिक असतात. मात्र स्वानुभावाच्या भट्टीत जे तावून-सुलाखून येतं; त्या लेखनाचा बाज वेगळा आणि जोरकस असतो. घरात लेखनाची परंपरा नसली तरी, परिस्थितीनं संघर्ष करण्याबरोबरच मन:पटलावर गोंधलेलं कागदावर उतरवण्याचं वळण लावलं. मी लिहित गेलो. समृद्ध होणं मात्र अजूनही सुरुच आहे.चौथीची परीक्षा पास झालो. त्याच वर्षी वडिलांनी चाळीसगाव येथील कापड गिरणीतील कामगाराच्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली. वर्ष होतं १९८४. बसस्थानकात ओरडून वर्तमानपत्र विकण्याचं काम सुरू केलं. पुढे घरोघरी वर्तमानपत्रं टाकण्याचं काम मिळालं. यातूनच पहाटे रेल्वे स्थानकावर जाऊन वर्तमानपत्रांचे गठ्ठे उतरवणं, पुरवण्या टाकणं अशी कामंही सुरू झाली. वर्तमानपत्रांचं आकर्षण निर्माण झालं. वाचनाचा छंदही जडला.कधी-कधी वर्तमानपत्रांच्या दोन-चार पुरवण्या जादा येत. त्या घरी आणून त्यांचं वाचन करू लागलो. शाळा आणि वर्तमानपत्र वाटण्याचं काम. माझ्या आयुष्याची सायकल अशा दोन चाकांवर सुखेनैव फिरत होती. याच दरम्यान चाळीसगावातील शेठ ना.बं. वाचनालयाशी परिचय झाला. महाविद्यालयात गेल्यावर ग्रंथालयाचं मोठं दालन पाहून हरखून गेलो. पुस्तके खुणावू लागली. पूर्ण रविवार 'वाचू आनंदे' असा सत्कारणी लागायचा. कालौघात शिक्षकी पेशात रुजलो. दरदिवशी दोन तास वाचनाचं वेळापत्रकच तयार केलं. हा शिरस्ता आजही कायम आहे. राज्यभरातील आघाडीची वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आणि नियतकालिकांमधून कविता व लेखातून व्यक्त होऊ लागलो. नामवंत दिवाळी अंकांमधून साहित्याची हजेरी लागली. पत्रकारिता क्षेत्राबद्दल आकर्षण होतं. मेहनतीनं आणि सरावानं यातही प्रवेश केला. पत्रकारितेत उमविमध्ये एम.ए. पूर्ण केले. चार काव्यसंग्रहांचं प्रकाशन झालं. मान्यवरांसाठी दिडशेहून अधिक मानपत्रंही लिहिली आहेत. स्मरणिका, गौरवग्रंथांचं संपादन करण्याची संधी मिळाली. पत्रकारितेमुळे लेखनाला आटोपशीर करण्याचा संस्कार मिळाला. लेखन वारी सुरुच असली तरी त्याचं रिंगणही पूर्ण व्हावं, हे ध्येय घेऊनच आयुष्य पादाक्रांत करतोय. आयुष्यात हे ध्येय पूर्ण होईल, अशी आशा आहे.- जिजाबराव वाघ