शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

परिस्थितीनं लिहितं केलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:06 IST

माझी लेखन प्रेरणा

स्वप्नरंजनात कल्पनांच्या भराऱ्या अधिक असतात. मात्र स्वानुभावाच्या भट्टीत जे तावून-सुलाखून येतं; त्या लेखनाचा बाज वेगळा आणि जोरकस असतो. घरात लेखनाची परंपरा नसली तरी, परिस्थितीनं संघर्ष करण्याबरोबरच मन:पटलावर गोंधलेलं कागदावर उतरवण्याचं वळण लावलं. मी लिहित गेलो. समृद्ध होणं मात्र अजूनही सुरुच आहे.चौथीची परीक्षा पास झालो. त्याच वर्षी वडिलांनी चाळीसगाव येथील कापड गिरणीतील कामगाराच्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली. वर्ष होतं १९८४. बसस्थानकात ओरडून वर्तमानपत्र विकण्याचं काम सुरू केलं. पुढे घरोघरी वर्तमानपत्रं टाकण्याचं काम मिळालं. यातूनच पहाटे रेल्वे स्थानकावर जाऊन वर्तमानपत्रांचे गठ्ठे उतरवणं, पुरवण्या टाकणं अशी कामंही सुरू झाली. वर्तमानपत्रांचं आकर्षण निर्माण झालं. वाचनाचा छंदही जडला.कधी-कधी वर्तमानपत्रांच्या दोन-चार पुरवण्या जादा येत. त्या घरी आणून त्यांचं वाचन करू लागलो. शाळा आणि वर्तमानपत्र वाटण्याचं काम. माझ्या आयुष्याची सायकल अशा दोन चाकांवर सुखेनैव फिरत होती. याच दरम्यान चाळीसगावातील शेठ ना.बं. वाचनालयाशी परिचय झाला. महाविद्यालयात गेल्यावर ग्रंथालयाचं मोठं दालन पाहून हरखून गेलो. पुस्तके खुणावू लागली. पूर्ण रविवार 'वाचू आनंदे' असा सत्कारणी लागायचा. कालौघात शिक्षकी पेशात रुजलो. दरदिवशी दोन तास वाचनाचं वेळापत्रकच तयार केलं. हा शिरस्ता आजही कायम आहे. राज्यभरातील आघाडीची वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आणि नियतकालिकांमधून कविता व लेखातून व्यक्त होऊ लागलो. नामवंत दिवाळी अंकांमधून साहित्याची हजेरी लागली. पत्रकारिता क्षेत्राबद्दल आकर्षण होतं. मेहनतीनं आणि सरावानं यातही प्रवेश केला. पत्रकारितेत उमविमध्ये एम.ए. पूर्ण केले. चार काव्यसंग्रहांचं प्रकाशन झालं. मान्यवरांसाठी दिडशेहून अधिक मानपत्रंही लिहिली आहेत. स्मरणिका, गौरवग्रंथांचं संपादन करण्याची संधी मिळाली. पत्रकारितेमुळे लेखनाला आटोपशीर करण्याचा संस्कार मिळाला. लेखन वारी सुरुच असली तरी त्याचं रिंगणही पूर्ण व्हावं, हे ध्येय घेऊनच आयुष्य पादाक्रांत करतोय. आयुष्यात हे ध्येय पूर्ण होईल, अशी आशा आहे.- जिजाबराव वाघ