शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वरणगाव येथे वृक्षतोडीमुळे बगळ्यांच्या दीडशे पिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 1:57 AM

शरंंगगार जातीच्या वृक्षाची कत्तल केल्यामुळे या वृक्षावर वस्ती केलेल्या गायबगळे आणि पाणकावळ्यांच्या दिडशे पिलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पक्षीप्रेमी चातक टिम आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोनशेच्यावर पक्षी वाचवण्यात आले.

ठळक मुद्देजखमी पिलांवर केले पक्षीप्रेमींनी उपचारवृक्षतोडीच्या चौकशीची पालिकेकडे मागणी

खिर्डी, ता रावेर जि. जळगाव : वरणगाव येथील रावजी बुवा समाधी परिसरातील शारंगगार जातीच्या झाडाची अज्ञात इसमाने शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास कत्तल केल्याने झाडावरील असलेले गायबगळे व पाणकावळ्यांची दिडशे छोटी पिल्ले व त्यांची अंडी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. दरम्यान, चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या पक्षीमित्रांना माहिती मिळताच सदर ठिकाणी धाव घेवून त्यांनी दोनशेवर छोटया पिलांना वाचविण्यात यश मिळविले.परिसरातील नागरिकांना पक्षांचा त्रास होत होता, या हेतुने हे कृत्य केल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र याबाबत पक्षीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर पक्षी वाचविण्यासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखालीव मदतकायार्साठी लक्ष्मीकांत नेवे, अपर्णा नेवे, सत्यपालसिंग राजपूत, अतुल वाणी, सुरेश ठाकूर, प्रशांत पाटील यांनी सहकार्य केले. तसेच मुक्ताईनगर वनविभागाचे अधिकारी एन.एम.वानखेड़े, सुनिल पाटील, देवचंद तायडे यांनीदेखील सहकार्य केले . दरम्यान, सदर घटनेची वनविभागाने चौकशी करुन वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करावी व पालिका प्रशासनाने वृक्षतोड़ीबाबत कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, याबाबत वरणगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता तो झाला नाही. 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य