शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाच्या भीतीने ओशाळली माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:04 IST

पिंप्राळा परिसरातील घटना : मृत महिलेस खांदा द्यायलाही कुणी सरसावले नाही

जळगाव : सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने जगात सर्वत्र थैमान घातले आहे. या आजारामुळे माणूसच माणसापासून दूर जायला लागला आहे. एकीकडे सरकार म्हणते रोगाशी लढा, रोग्याशी नाही तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णाला सहानुभूती ऐवजी त्याचा तिरस्कारच जास्त केला जात आहे. यानिमित्ताने माणसाची खरी ओळख कळू लागली आहे. असाच प्रकार मंगळवारी पिंप्राळ्यातील वाणी गल्लीत घडला. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या महिलेला कोरोनाच्या धाकाने खांदा द्यायलाही कोणी पुढे आले नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन या महिलेला खांदा देऊन विधीवत अंत्यसंस्कार करुन माणुसकी धर्म जोपासला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळ्यातील वाणी गल्लीतील लिनाबाई सोनार (६१) या महिलेला मंगळवारी सकाळी चहा घेताना घरातच हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. या महिलेचा पती बडोदा येथे वास्तव्याला असून दोघंही विभक्त झालेले आहेत. एक भाऊ शहरात तर दुसरा भाऊ वरणगाव येथे वास्तव्याला आहे. त्यामुळे महिलेजवळ कोणीच नव्हते. त्यांच्या मृत्यूची माहिती दोघं भावांना देण्यात आली, त्यानुसार ते आले. मात्र खांदा देण्यासाठी चार जण लागणार असल्याने कोणीही पुढे आले नाही. हा प्रकार शेजारीच राहणाऱ्या भाजप महिला आघाडीच्या मंडळ अध्यक्षा निता परदेशी यांच्या लक्षात आला. त्यांनी महानगर मंडळ पाचचे अध्यक्ष शक्ती महाजन व उपाध्यक्ष राहूल लोखंडे यांच्या कानावर हा प्रकार घातला. महाजन व लोखंडे यांनी स्वत: पुढाकार घेऊन महिलेला खांदा देऊन अंत्यविधीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडून समाजात एक आदर्श निर्माण केला. महिलेचे दोन भाऊ, भाजपचे महाजन, लोखंडे, नितू परदेशी, सरचिटणीस उमेश सूर्यवंशी, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महेश ठाकूर यांनीही या कामात सहकार्य केले. या लोकांच्या व्यतिरिक्त गल्लीतील कोणीही अंत्ययात्रेत सहभागी झालेले नव्हते. कोरोना बाधित नसतानाही या महिलेच्या अंत्यसंस्काराला कोणी येऊ नये यावरुन समाजातील माणुसकी दिसून आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव