शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आणखी किती दिवस प्रतीक्षा...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 4:06 PM

विश्लेषण

 सुशील देवकर

शासनाकडून सहकार कायद्यात सुधारणा करून प्रभावी वसुली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रभावी वसुली करण्यावर शासनाचा भर असून, यामुळे सहकारक्षेत्र अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे असे सांगत चुकीचे काम करणाऱ्यांचा संपत्तीवर येणार टाच आणली जाईल, असा इशाराही, राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी जळगाव दौºयावर आलेले असताना दिला. मात्र राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार येऊन साडेचार वर्ष झाली. सहकार राज्यमंत्री जिल्ह्याचेच असताना सर्वाधिक पतपेढ्यांमधील ठेवींचा प्रश्न जिल्ह्यातच आहे. तो सोडविण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झाले नाहीत. केवळ चर्चा झाली. कागदावरच कृती कार्यक्रम झाले. मात्र अधिकाºयांनी त्याची अंमलबजावणीच केली नाही. आणि वरिष्ठ अधिकारी व शासनाने त्याचा आढावा घेत अंमलबजावणी न करणाºया अधिकाºयांना जाबही विचारला नाही. त्यामुळेच सहकार विभागातील अधिकारी पतसंस्था चालकांशी हातमिळवणी करून स्वत:च्या पोळीवर तूप ओढून घेण्यात मग्न असल्याचेच या साडेचार वर्षात दिसून आले. ठेवीदार मात्र आस लावून आहेत. बहुतांश ठेवीदार हे वयोवृद्ध असून त्यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे या पतपेढ्यांमध्ये जादा व्याज मिळेल, या आशेने ठेवले. त्यांची आयुष्याची जमापुंजी आता त्यांच्या म्हातारपणात आजारांवर उपचारासाठी अथवा मुलींचे लग्न, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा अन्य गरजांसाठी कामाला येईल, अशी अपेक्षा असताना पतपेढ्यांनी हात वर केल्याने त्यांना शासनाकडे निवेदने देण्यापलिकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. दुसरीकडे शासनातील ज्यांच्याकडे अधिकार आहेत, असे मंत्री असोत की अधिकारी त्यांनी साडेचार वर्षात ही समस्या निकाली काढण्यासाठी अपेक्षेएवढ्या गांभीर्याने प्रयत्नच केलेले नाहीत. आता विधानसभेच्या निवडणुका अवघ्या सात-आठ महिन्यांवर आहेत. त्याआधी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी किमान तीन महिने सुरू राहील. त्यामुळे उरलेल्या कालावधीत सहकार कायदा कडक क रून ठेवीदारांना न्याय मिळेल, याची शाश्वती ठेवीदारांनाही वाटत नाही.