शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

चिमुरड्यांसह गृहिणी खूश्श...संस्थाचालक मात्र नाखूश; दुसरीपर्यंतच्या शाळा भरणार सकाळी ९ वाजता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2023 17:53 IST

वर्गखोल्यांचा ताळमेळ घालण्यासाठी करावी लागणार कसरत

- कुंदन पाटील

जळगाव : बालवाडी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेपासून भरवण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर चिमुरड्या विद्यार्थ्यांसह गृहिणींनी आनंदल्या असून संस्थाचालक आणि शाळा व्यवस्थापन मात्र या निर्णयामुळे नाखूश असल्याचे दिसून आले आहे.

राज्यापाल रमेश बैस यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना केली होती. त्यानुसार शालेय शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा सोमवारी केली. या निर्णयानंतर दुसऱ्यादिवशी विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापनात पडसाद उमटले.

शाळांची कोंडीबहुतांशी शाळा दोन सत्रात भरविल्या जातात. पहिली ते ७ आणि आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या सत्रात भरविले जातात. वर्गखोल्यांची उपलब्धता पाहून काहींनी हा पर्याय निवडला आहे. आता दुसरीपर्यंतचे वर्ग़ सकाळी ९ वाजेपासून भरणार असल्याने शाळाखोल्यांची उपलब्ध करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

मी काय म्हणते...सकाळी पोरं उठत नाहीत. त्यातच त्यांच्या डब्यासाठी स्वयंपाक करताना कसरत होते. तशातच शाळेत न्यायला रिक्षा दारात धडकते.त्यामुळे अनेकदा कोंडी होते. मात्र आता सकाळी ९ वाजेची वेळ झाल्याने सर्वच अडचणी दूर होणार आहे.-शुभांगी बारी, गृहिणी.

खरं आहे पण...या निर्णयाला विरोध नाही.मात्र दोन सत्रात शाळा भरविणाऱ्यांची अडचण होणार आहे. नऊऐवजी आठ वाजेची वेळ केली असती तर योग्य राहिले असते. या वेळेत कायमस्वरुपीपेक्षा ऋतूमानानुसार बदल करायला हवा होता.-मनोज पाटील, संस्थाचालक.

ऐका ना...मुलांच्यादृष्टीने निर्णय योग्य आहे. शाळेत पुरेशी सोय नसते म्हणून त्यांचे सकाळचे विधी घरीच पूर्ण करावे लागतात. म्हणून साडेसात किंवा आठवाजेपासून शाळेची वेळ निश्चीत केली असते तर चांगले राहिले असते. कारण सकाळच्या नऊ वाजेच्या वेळेमुळे दोन सत्रातील श्येड्यूल आता विस्कळीत होणार आहे.-चंद्रकांत भंडारी, शिक्षण अभ्यासक.

खरं सांगू?...अतिशय उत्तम निर्णय आहे.बालवयातल्या मानसिकतेच्यादृष्टीने हा निर्णय स्तुत्य आहे. पालक सकाळी सहा वाजेपासून त्यांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही मुलं रडतात. इच्छा नसताना रिक्षात बसतात. त्यामुळे घरातील शांतताही बाधीत होते.-डॉ.प्रदीप जोशी, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगाव