शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचे जळगाव जिल्ह्यात पडसाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:16 IST

सुनील पाटील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात पोलीस आयुक्त पदावरून ...

सुनील पाटील

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात पोलीस आयुक्त पदावरून हटविल्यानंतर परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप आणि त्यानंतर तपासी यंत्रणेला मिळून आलेले काही पुरावे खास करून ‘ती’ डायरी. यामुळे महाराष्ट्रातील पोलीस दल हादरले असून त्याचे पडसाद जळगाव पोलीस दलातही उमटले आहेत. ज्या दिवशी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला, त्याच दिवशी जिल्ह्यातील संपूर्ण अवैध धंदे बंद ठेवण्याचे फर्मान निघाले. त्यानंतर हे धंदेही बंदही झाले. येत्या काही दिवसात पोलीस दलात मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. आपल्याला कोणीच हरवू शकणार नाही अशी वल्गना करणारे राज्यातील अनेक अधिकारी आता हादरलेले आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर हे देखील निवृत्तीच्या वाटेवर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनही काही सूचना वजा आदेश जिल्हा पोलीस दलाला मिळालेले आहे. त्याची अंमलबजावणी युद्धपातळीवर केली जात असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय नवीन महानिरीक्षकांबाबतही आतापासूनच फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा नाशिक परिक्षेत्रातील पोलीस दलात सुरू आहे. सचिन वाझे प्रकरण मुंबईत घडले असले तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पोलीस दलावर झालेला आहे. जिल्हा पोलीस दलात बदलून आलेले अधिकारी नवीनच आहेत. कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातून बदलून गेलेले आहेत, त्यामुळे अंतर्गत बदल्या होण्याची शक्यता कमीच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बदल्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे प्रशासकीय बदल्यांची शक्यता नाही. बदल झालाच तर महासंचालक किंवा गृह खात्यातूनच होईल, असेही पोलीस दलात बोलले जात आहे.