शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

राष्टÑीयत्वाच्या कसोटीवर देशातील हिंदू अनुत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:13 IST

जळगावातील सभेत संभाजी भिडे गुरूजी यांची टीका

ठळक मुद्दे हिंदूंना स्वार्थापलिकडे काही कळत नाही शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे व्रत जगलेहिंदूंचे नेतृत्व करणारा महाराष्टÑ उभा करणार

जळगाव: देशातील हिंदू स्त्री-पुरूष राष्टÑीयत्वाच्या कसोटीवर अनुत्तीर्ण आहेत. आपली धरती, परंपरा, संस्कृती, भाषा, धर्म याबाबत टोकाची क्रियाशिलता हिंदूंच्या रक्तात आढळत नाही. हिंदूना स्वार्थापलिकडे काही कळत नाही. ही उणीव काढल्याशिवाय आपण राष्टÑ म्हणून उभे राहू शकणार नाही, अशी घणाघाती टीका श्री शिवप्रतिष्ठान ंिहंदुस्थानचे संभाजी भिडे गुरूजी यांनी रविवार, २७ रोजी सायंकाळी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे आयोजित ‘३२ मण सिंहासन व खडा पहारा’ या विषयावरील व्याख्यानप्रसंगी केली.भारत जगातील सर्वात संपन्न देशभारत हा जगातील सर्वात संपन्न देश आहे. जपान, चीन, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, तुर्कस्थान, नेपाळ, इराण, इराक, अफगाणिस्तान, अरबस्थान हा सर्व भाग भारतखंडाचा भाग होता. त्यातील बराच भाग गळाला. तरीही भारत जगात लक्षावधी एकर सुपीक जमीन असलेला, मोठ्या संख्येने नद्या असलेला, पशुधन, जलसंपदा असलेला तसेच बुद्धीसंपन्न लोकांचा असा एकमेव देश आहे. जगातील सर्व शास्त्रांचा जन्म भारतात झाला आहे. मात्र आपणच करंटे आहोत. मातृभूमीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव आपल्याला नाही. परदेशाचे आकर्षण वाटते. मात्र ‘नासा’ सारख्या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेच्या ११ जणांच्या संचालक मंडळात १० भारतीय हिंदू आहेत. जिनीव्हातील सर्वोच्च ताकत असलेल्या अणुभट्टीचे संचालन करणाºया शास्त्रज्ञांमध्ये ५३ टक्के हिंदू भारतीय आहेत. संगणक क्षेत्रातील ३७ टक्के शास्त्रज्ञ भारतीय आहेत. मात्र बंगालच्या उपसागरातून (गंगासागर) युनेनियम, थोरीयम असलेल्या भागातून वाळू उपसण्याचा करार अमेरिकेशी केला. १८६२ ते १९८२ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून हे दुर्मिळ मुलद्रव्य नेले. आणि आपण त्यांच्याकडे युनेनियम, थोरीयमची भिक मागतो.७६ राष्टÑांचे आक्रमणजगातील १८७ राष्टÑांमध्ये आपले व्यवहारस्थान काय? शेकडो हजारो वर्ष परकीयांच्या आक्रमणात असलेला देश. ७६ राष्टÑांनी आक्रमण केले, असा आपला देश जगातील एकमेव आहे. असे का झाले? कारण हिंदूंच्या रक्तात आपण कोण आहोत? कशासाठी जगायचे? कशासाठी मरायचे? आपला शत्रू कोण? आपला मित्र कोण? याची जाणीवच नाही. असेल तरी स्वार्थापलिकडे जाणीव होतच नाही. हिंदूच्या रक्तात राष्टÑीयत्वाच्या जाणीवा पेटत्या नसतात, अशी टीका भिडे गुरूजींनी केली.शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे व्रत जगलेचीन आपला शत्रू आहे. १९६५च्या युद्धात १ लाख ८४ हजार चौरस मैल भूभाग चीनने बळकावला. आजही रोजच आपल्याला आव्हान देत असतो. मात्र आपण ना पुरूष ना स्त्री असे जीवन जगतो. पाकिस्तान रोज आपले सैनिक मारत असताना आपण मैत्रीचा हात पुढे करतो. १४ आॅगस्टला वाघा सीमेवर काही लोक मिठाई वाटायला जातात. हिंदूना स्वार्थापलिकडे काही कळत नाही. ही उणीव काढल्याशिवाय आपण राष्टÑ म्हणून उभे राहू शकणार नाही. अशा या देशात ३५० वर्षांपूर्वी शहाजीराजे व जिजामाता यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी विडा उचलला. शहाजी राजे अत्यंत प्रखर होते. मात्र एकाकी लढत देऊनही त्यांना अपयश आल्याने शिवाजी महाराजांवर त्यांनी ही जबाबदारी सोपविली.स्वार्थासाठी भांडण्यात समाज गुंग असताना शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्वराज्याची स्थापना केली. सिंहासन स्थापन केले. शिवाजी महाराज जीवन जगले नाहीत तर अंगिकारलेले हिंदवी स्वराज्याचे व्रत जगले. वय वर्ष १४ ते ५० या ३६ वर्षांच्या कालखंडात सर्व शत्रुंना आव्हान देत २८९ लढाया केल्या. त्यापैकी केवळ ७ वेळा ते पराभूत झाले. तर संभाजी महाराज ‘बाप से बेटा सवाई’ असे होते. त्यांनी शिवाजी महाराजांनंतर अवघ्या पावणे नऊ वर्षात १३४ लढाया लढल्या. त्यापैकी एकही लढाई ते हरले नाहीत. शिवाजी महाराजांचे सप्तगंगा, सप्त सिंधू मुक्त करण्याचे, काशी विश्वेश्वराचे मंदिर मुक्त करण्याचे स्वप्न होते. त्यांच्यानंतर संभाजी महाराजांनी राज्य दुप्पट वाढविले. तर त्यांच्यानंतर मराठा सरदारांनी नेतृत्व नसातनाही धडक मारत दिल्लीवर झेंडा फडकविला.हिंदूंचे नेतृत्व करणारा महाराष्टÑ उभा करणारसंभाजी महाराज मोगलांच्या ताब्यात सापडल्यावर रायगडावरील सिंहासनाचे तुकडे केले. ते सुवर्ण सिंहासन पुर्नसंस्थापित करण्याचा संकल्प श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकºयांनी ४ जून २०१७ रोजी केला आहे. त्यानुसार ज्या दिवशी सिंहासन संस्थापित होईल, त्या क्षणापासून दर दिवशी राज्यातील ३८ जिल्ह्यातील ३९४ तालुक्यातून किमान २ हजार धारकरी रायगडावर महाराजांच्या दर्शनाला मावळ्यांच्या वेशात पायात वहाण न घालता जातील. यातून शिवरायांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी जगणारा खडा पहारा निर्माण करणार आहे. हिंदूंचे नेतृत्व करणारा महाराष्टÑ उभा करणार असल्याचे भिडे गुरूजी यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातूनही यात सहभागाचे आवाहन त्यांनी केले.पोलिसांचा चोख बंदोबस्तभिमा-कोरेगाव दंगलप्रकरणी भिडे गुरूजींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या सभेला विरोध होण्याची तसेच विरोधकांकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आंबेडकर मार्केट परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.