शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

मदत वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:16 IST

जळगाव : 'ब्रेक द चेन'मुळे अनेक व्यवसाय बंद झालेले आहेत. हातावर पोट असलेल्या लोकांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण ...

जळगाव : 'ब्रेक द चेन'मुळे अनेक व्यवसाय बंद झालेले आहेत. हातावर पोट असलेल्या लोकांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अशा घटकांना मदत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यात परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. हा निर्णय घेऊन एक महिना पूर्ण होत आलेला आहे, मात्र अद्यापपर्यंत एकाही रिक्षाचालकाला ही मदत मिळालेली नाही.

कोरोनामुळे रिक्षा चालकांचा रोजगार बंद झाला. बॅंकेचे हप्ते थकित झालेले आहे, त्यामुळे संसार चालविणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा मालकांना दीड हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केलेली आहे. जिल्ह्यात अनुदानास पात्र ठरणारे साधारण आठ हजार रिक्षा चालक, मालक आहेत. या रिक्षांचे रेकॉर्ड ऑनलाइन करण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. जे रिक्षा धारक पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे.

ज्या रिक्षा चालकाकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना बॅच आहे व त्याचा परवाना ३० मार्चपर्यंत मुदत आहे, अशाच रिक्षाचालकांना शासनाच्या अनुदानाचा लाभ होणार आहेत.जिल्ह्यात १५ हजाराच्यावर रिक्षा आहेत, मात्र परवानाधारक व ३० मार्चपर्यंत मुदत असलेल्या रिक्षांची संख्या आठ हजार आहे.

परवानाधारक रिक्षाची संख्या : ७९७०

एकूण रिक्षांची संख्या : १५७४२

कोट....

विहित परवानाधारक रिक्षाची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाकडून आदेश येताच ती माहिती पाठविली जाईल.

- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया

१) गेल्या वर्षी आणि यंदादेखील कोरोनाचे संकट आहे. बँकांचे हप्ते मोठ्या प्रमाणात थकले आहेत. व्यवसाय पूर्णतः ठप्प झालेला आहे. शासनाकडून लवकर मदत मिळावी ही मदत दर महिन्याला मिळायला हवी.

- सुभाष पाटील, रिक्षाचालक.

२) कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या लोकांचे प्रचंड नुकसान होत आहे. रिक्षा व्यवसाय डबघाईस आलेला आहे. त्यात पेट्रोलचे दर कमालीचे वाढले आहेत. शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

- संतोष नेटके, रिक्षा चालक

३) जळगाव शहरात रिक्षांना फारसा व्यवसाय नाही. त्यात पेट्रोलची दरवाढ, त्यामुळे दिवसाला जेमतेम तीनशे रुपये कमावले जातात. त्यात बँकेचे हप्ते व घर चालवणे अवघड होत आहे. शासनाने लवकर मदत द्यावी.

- मुरलीधर सदाशिव घुले, रिक्षा चालक