शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

हेल्मेट सक्ती योग्यच;पण अतिरेक नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 10:26 IST

रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी महामार्गावर हेल्मेट सक्ती लागू केली आहे. रस्त्यावरची सुरक्षा लक्षात घेता कारला सीट बेल्ट व दुचाकीस्वाराजवळ हेल्मेट असणे आवश्यकच आहे. महामार्गावर झालेल्या अपघाताच्या घटनांमध्ये बहुतांश अपघातात सीटबेल्ट व हेल्मेटमुळेच प्राण वाचले आहेत.

ठळक मुद्दे विश्लेषणवाहनधारकाच्या तक्रारी वाढल्या

सुनील पाटीलजळगाव : रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी महामार्गावर हेल्मेट सक्ती लागू केली आहे. रस्त्यावरची सुरक्षा लक्षात घेता कारला सीट बेल्ट व दुचाकीस्वाराजवळ हेल्मेट असणे आवश्यकच आहे. महामार्गावर झालेल्या अपघाताच्या घटनांमध्ये बहुतांश अपघातात सीटबेल्ट व हेल्मेटमुळेच प्राण वाचले आहेत. अपघात रोखणे शक्य झाले नाही, मात्र कार व दुचाकीस्वाराने ही काळजी घेतल्यामुळे प्राण वाचल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही घटनांमध्ये हेल्मेट असतानाही दुचाकीस्वाराचा बळी गेलेला आहे. हेल्मेट घेताना कारवाईपासून बचाव व्हावा याच हेतून तकलादू हेल्मेट घेतले गेल्याने त्यात हे हेल्मेटही निष्फळ ठरले आहे. त्यामुळे हेल्मेट घेतानाही त्याचा दर्जा चांगला असावा, अपघातात जीव वाचू शकेल अशाच दर्जाचे हेल्मेट असावे.सध्या महामार्गावर असलेल्या हेल्मेट सक्तीमुळे काही पोलिसांकडून जरा जास्तच अतिरेक होत असल्याच्या तक्रार येवू लागल्या आहेत. महामार्गाला जोडणाºया रस्त्यावर देखील हेल्मेटचा धाक दाखवून कारवाया केल्या जात आहे. प्रत्येक कर्मचाºयांना कारवाईचे उद्दीष्टे दिलेले आहे. हे उद्दीष्ट पुर्ण झाले कि कर्मचारी आपले उद्दीष्ट पूर्ण करताना दिसत आहे. त्यामुळे हा अतिरेकच होत आहे. एखाद्या दुचाकीस्वाराकडे वाहन परवाना असला तरी त्याला अन्य कागदपत्रांची सक्ती केली जाते. निव्वळ दुचाकीस्वार टार्गेट करणेही चुकीचेच असल्याचा मतप्रवाह आहे. अवैध प्रवाशी वाहतूक करणारे तसेच क्षमतेपेक्षा जास्त भार असलेली वाहने पोलीस व आरटीओ यांच्या डोळ्यादेखत वावरत असताना त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते अन् दुचाकीस्वाराला टार्गेट केले जाते. हा पक्षपातीपणा नाही तर काय? शहरातील चौकाचौकात दुचाकीस्वारांना घोळक्याने अडविले जाते. जणू त्याने काही मोठा गुन्हाच केला आहे, या पध्दतीची वागणूक दुचाकीस्वाराला दिली जाते. एखादी दुचाकीस्वार अरेरावी करीत असेल, भरधाव वेगाने वाहन चालवून स्वत: तसेच दुस-याच्या जीवाशीही खेळत असेल तर अशा दुचाकीस्वाराच्याबाबतीत समजू शकेल, मात्र सर्वांनाच एका रांगेत बसविणेही योग्य नाही.काही वाहतूक कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावताना दिसतात. महिला पोलिसांच्या बाबतीत अजून तरी तक्रारी नाहीत. त्यामुळे एका विभागात असलेल्या कर्मचा-यांची काम करण्याच्या वेगवेगळ्या पध्दतीने दुचाकीस्वारधारक वैतागले आहेत. वरिष्ठ अधिकाºयांनीच हा विषय गांभीर्याने घेऊन होणारा अतिरेक रोखावा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव