शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

अतीवृष्टी, कोरोनाने शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:15 IST

अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -आतापर्यंत शेतकऱ्यांनी अस्मानी व सुल्तानी संकटांनाच तोंड दिले होते. मात्र,२०२० या वर्षात शेतकऱ्यांना ...

अजय पाटील,

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -आतापर्यंत शेतकऱ्यांनी अस्मानी व सुल्तानी संकटांनाच तोंड दिले होते. मात्र,२०२० या वर्षात शेतकऱ्यांना अस्मानी, सुल्तानी या

संकटासोबतच ‘कोरोना’ नामक विषाणूंचाही सामना करावा लागला. कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामाला भाव मिळू शकला

नाही. तसेच खरेदीही होवू शकली नाही. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरण्या केल्या. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही

अतीवृष्टीचा फटका खरीप हंगामाला बसून, उडीद, मूग व सोयाबीनचे उत्पन्न शेतकऱ्यांचा हाती देखील लागले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा

दृष्टीने हे वर्ष एका दृष्ट स्वप्नांप्रमाणेच राहिले.

अवकाळीने रब्बी हिरावला

मार्च २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे चोपडा, जळगाव, यावल तालुक्यातील रब्बी हंगामाचे चांगलेच नुकसान झाले.

यासह वादळामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. वर्षअखेरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम न मिळाल्याने शेतकरी

हवालदिल.

‘निसर्गा’ची दिशा भरकटल्याने केळी वाचली

जून महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणात धुमाकुळ घातला. या वादळाने जळगाव जिल्ह्यात

पोहचण्याच्या वेळीच दिशा बदलण्याने सुदैवाने जिल्ह्यातील केळीच्या बागांना काही फटका बसला नाही. तरी चोपडा तालुक्यात काही

प्रमाणात केळीचे नुकसान झाले.

खतांची साठेबाजी, शेतकऱ्यांची वणवण

खरीप हंगामात खतांची कमतरता पडणार नाही असे दावे शासनाकडून करण्यात आले. मात्र, साठेबाजी करणाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर ऐन

पेरणीच्या वेळेस खतांसाठी वणवण करावी लागली. साठेबाजीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या दरात खते खरेदी करावी लागली. शासनाचा बांदावर

खते देण्याचा उपक्रम सपशेल अपयशी ठरला.

पीक विम्याचे जाचक नियम

हवामान आधारित फळपीक विम्याचा निकषात यंदा राज्य शासनाने बदल केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. केळी

उत्पादक शेतकऱ्यांनी केळी पीक विम्यावर बहिष्कार घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणामही दिसून आला. शेतकऱ्यांचा विरोधानंतरही

शासनाने पीक विम्याचा निकषात बदल केले नाहीत. तसेच खासदार व पालकमंत्र्यांमध्ये या मुद्द्यावरून चांगलेच आरोप-प्रत्यारोप रंगले.

मात्र, शेतकऱ्यांची अडचण कोणाही सोडविता आला नाही.

कृषी विधेयकावरुन शेतकऱ्यांची नाराजी

केंद्र शासनाने बहुप्रतिक्षीत कृषी विधेयक मंजूर केले. मात्र, या कायद्यातील अनेक तरतुदी शेतकऱ्यांविरोधात व व्यापाऱ्यांचा समर्थनार्थ

असल्याचे सांगत शेतकरी संघटनांकडून या विधेयकाला विरोध करण्यात आला. तसेच दिल्ली येथे याविधेयकाविरोधात पुकारण्यात

आलेल्या किसान आंदोलनात जिल्ह्यातूनही अनेक शेतकरी संघटनांकडून पाठींबा देण्यात आला. भारत बंद मध्ये जिल्ह्यातील सर्वच कृषी

उत्पन्न बाजार समित्यांनी सहभाग घेतला.

पीक विम्याचा रक्कमेसाठी प्रतीक्षा

कोरोनाचा प्रादुर्भावाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला. रब्बीचा पिकांना भाव नाही त्यातच खरीप हंगाम देखील वाया गेल्याने

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहिले. त्यातच राज्य शासनाने खरीप व फळपीक विम्याच्या रक्कमेतील आपला हिस्सा न भरल्याने

विम्याची रक्कम शेतकऱ्यांना चार-चार महिने उशीराने मिळाला.