शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अतीवृष्टी, कोरोनाने शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:15 IST

अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -आतापर्यंत शेतकऱ्यांनी अस्मानी व सुल्तानी संकटांनाच तोंड दिले होते. मात्र,२०२० या वर्षात शेतकऱ्यांना ...

अजय पाटील,

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -आतापर्यंत शेतकऱ्यांनी अस्मानी व सुल्तानी संकटांनाच तोंड दिले होते. मात्र,२०२० या वर्षात शेतकऱ्यांना अस्मानी, सुल्तानी या

संकटासोबतच ‘कोरोना’ नामक विषाणूंचाही सामना करावा लागला. कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामाला भाव मिळू शकला

नाही. तसेच खरेदीही होवू शकली नाही. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरण्या केल्या. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही

अतीवृष्टीचा फटका खरीप हंगामाला बसून, उडीद, मूग व सोयाबीनचे उत्पन्न शेतकऱ्यांचा हाती देखील लागले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा

दृष्टीने हे वर्ष एका दृष्ट स्वप्नांप्रमाणेच राहिले.

अवकाळीने रब्बी हिरावला

मार्च २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे चोपडा, जळगाव, यावल तालुक्यातील रब्बी हंगामाचे चांगलेच नुकसान झाले.

यासह वादळामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. वर्षअखेरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम न मिळाल्याने शेतकरी

हवालदिल.

‘निसर्गा’ची दिशा भरकटल्याने केळी वाचली

जून महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणात धुमाकुळ घातला. या वादळाने जळगाव जिल्ह्यात

पोहचण्याच्या वेळीच दिशा बदलण्याने सुदैवाने जिल्ह्यातील केळीच्या बागांना काही फटका बसला नाही. तरी चोपडा तालुक्यात काही

प्रमाणात केळीचे नुकसान झाले.

खतांची साठेबाजी, शेतकऱ्यांची वणवण

खरीप हंगामात खतांची कमतरता पडणार नाही असे दावे शासनाकडून करण्यात आले. मात्र, साठेबाजी करणाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर ऐन

पेरणीच्या वेळेस खतांसाठी वणवण करावी लागली. साठेबाजीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या दरात खते खरेदी करावी लागली. शासनाचा बांदावर

खते देण्याचा उपक्रम सपशेल अपयशी ठरला.

पीक विम्याचे जाचक नियम

हवामान आधारित फळपीक विम्याचा निकषात यंदा राज्य शासनाने बदल केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. केळी

उत्पादक शेतकऱ्यांनी केळी पीक विम्यावर बहिष्कार घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणामही दिसून आला. शेतकऱ्यांचा विरोधानंतरही

शासनाने पीक विम्याचा निकषात बदल केले नाहीत. तसेच खासदार व पालकमंत्र्यांमध्ये या मुद्द्यावरून चांगलेच आरोप-प्रत्यारोप रंगले.

मात्र, शेतकऱ्यांची अडचण कोणाही सोडविता आला नाही.

कृषी विधेयकावरुन शेतकऱ्यांची नाराजी

केंद्र शासनाने बहुप्रतिक्षीत कृषी विधेयक मंजूर केले. मात्र, या कायद्यातील अनेक तरतुदी शेतकऱ्यांविरोधात व व्यापाऱ्यांचा समर्थनार्थ

असल्याचे सांगत शेतकरी संघटनांकडून या विधेयकाला विरोध करण्यात आला. तसेच दिल्ली येथे याविधेयकाविरोधात पुकारण्यात

आलेल्या किसान आंदोलनात जिल्ह्यातूनही अनेक शेतकरी संघटनांकडून पाठींबा देण्यात आला. भारत बंद मध्ये जिल्ह्यातील सर्वच कृषी

उत्पन्न बाजार समित्यांनी सहभाग घेतला.

पीक विम्याचा रक्कमेसाठी प्रतीक्षा

कोरोनाचा प्रादुर्भावाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला. रब्बीचा पिकांना भाव नाही त्यातच खरीप हंगाम देखील वाया गेल्याने

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहिले. त्यातच राज्य शासनाने खरीप व फळपीक विम्याच्या रक्कमेतील आपला हिस्सा न भरल्याने

विम्याची रक्कम शेतकऱ्यांना चार-चार महिने उशीराने मिळाला.