शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अतीवृष्टी, कोरोनाने शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:15 IST

अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -आतापर्यंत शेतकऱ्यांनी अस्मानी व सुल्तानी संकटांनाच तोंड दिले होते. मात्र,२०२० या वर्षात शेतकऱ्यांना ...

अजय पाटील,

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -आतापर्यंत शेतकऱ्यांनी अस्मानी व सुल्तानी संकटांनाच तोंड दिले होते. मात्र,२०२० या वर्षात शेतकऱ्यांना अस्मानी, सुल्तानी या

संकटासोबतच ‘कोरोना’ नामक विषाणूंचाही सामना करावा लागला. कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामाला भाव मिळू शकला

नाही. तसेच खरेदीही होवू शकली नाही. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरण्या केल्या. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही

अतीवृष्टीचा फटका खरीप हंगामाला बसून, उडीद, मूग व सोयाबीनचे उत्पन्न शेतकऱ्यांचा हाती देखील लागले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा

दृष्टीने हे वर्ष एका दृष्ट स्वप्नांप्रमाणेच राहिले.

अवकाळीने रब्बी हिरावला

मार्च २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे चोपडा, जळगाव, यावल तालुक्यातील रब्बी हंगामाचे चांगलेच नुकसान झाले.

यासह वादळामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. वर्षअखेरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम न मिळाल्याने शेतकरी

हवालदिल.

‘निसर्गा’ची दिशा भरकटल्याने केळी वाचली

जून महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणात धुमाकुळ घातला. या वादळाने जळगाव जिल्ह्यात

पोहचण्याच्या वेळीच दिशा बदलण्याने सुदैवाने जिल्ह्यातील केळीच्या बागांना काही फटका बसला नाही. तरी चोपडा तालुक्यात काही

प्रमाणात केळीचे नुकसान झाले.

खतांची साठेबाजी, शेतकऱ्यांची वणवण

खरीप हंगामात खतांची कमतरता पडणार नाही असे दावे शासनाकडून करण्यात आले. मात्र, साठेबाजी करणाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर ऐन

पेरणीच्या वेळेस खतांसाठी वणवण करावी लागली. साठेबाजीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या दरात खते खरेदी करावी लागली. शासनाचा बांदावर

खते देण्याचा उपक्रम सपशेल अपयशी ठरला.

पीक विम्याचे जाचक नियम

हवामान आधारित फळपीक विम्याचा निकषात यंदा राज्य शासनाने बदल केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. केळी

उत्पादक शेतकऱ्यांनी केळी पीक विम्यावर बहिष्कार घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणामही दिसून आला. शेतकऱ्यांचा विरोधानंतरही

शासनाने पीक विम्याचा निकषात बदल केले नाहीत. तसेच खासदार व पालकमंत्र्यांमध्ये या मुद्द्यावरून चांगलेच आरोप-प्रत्यारोप रंगले.

मात्र, शेतकऱ्यांची अडचण कोणाही सोडविता आला नाही.

कृषी विधेयकावरुन शेतकऱ्यांची नाराजी

केंद्र शासनाने बहुप्रतिक्षीत कृषी विधेयक मंजूर केले. मात्र, या कायद्यातील अनेक तरतुदी शेतकऱ्यांविरोधात व व्यापाऱ्यांचा समर्थनार्थ

असल्याचे सांगत शेतकरी संघटनांकडून या विधेयकाला विरोध करण्यात आला. तसेच दिल्ली येथे याविधेयकाविरोधात पुकारण्यात

आलेल्या किसान आंदोलनात जिल्ह्यातूनही अनेक शेतकरी संघटनांकडून पाठींबा देण्यात आला. भारत बंद मध्ये जिल्ह्यातील सर्वच कृषी

उत्पन्न बाजार समित्यांनी सहभाग घेतला.

पीक विम्याचा रक्कमेसाठी प्रतीक्षा

कोरोनाचा प्रादुर्भावाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला. रब्बीचा पिकांना भाव नाही त्यातच खरीप हंगाम देखील वाया गेल्याने

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहिले. त्यातच राज्य शासनाने खरीप व फळपीक विम्याच्या रक्कमेतील आपला हिस्सा न भरल्याने

विम्याची रक्कम शेतकऱ्यांना चार-चार महिने उशीराने मिळाला.