शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा सुखावला : जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 12:42 IST

तब्बल बावीस दिवससांच्या दडी नंतर चांगला पाऊस

ठळक मुद्देकोमेजलेल्या पिकांना तरारीदडीमुळे ३० टक्के नुकसान

जळगाव : स्वातंत्रदिन साजरा होताच सुरू झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशी १६ आॅगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात पहाटेपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. यामुळे कोमेजलेल्या पिवळट शेतशिवाराने पुन्हा हिरवा शालू परीधान करण्यास मदत होण्यासह दुष्काळाच्या शक्यतेत सापडलेला बळीराजा आनंदाने सुखावला आहे. तब्बल बावीस दिवसांच्या दडीनंतर आलेल्या या पाऊसामुळे शेतकºयांना मोठा आधार झाला. त्यामुळेच आनंदलेला बळीराजा या पावसाला संजिवनी देणारा आधार पाऊस असे म्हणत आहेत.जळगाव शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत सूर्यदर्शनही झालेले नव्हते.जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेल्या कपाशी पिकांचे बोंडे पक्वतेकडे, मक्का फुलोºयात, उडीद, मूग, चवळी,भरणी व तोडणीवर असतानाच पावसाने गेल्या २३ जुलै पासून दडी मारली होती. सततच्या धुक्कट व दमट वातावरणाने पिके पिंगट पडत होते व रोगराई वाढत होती. फुलोºयातील मका कोमेजून वाकत होता. शेतीजन्य खर्चाची मशागत कामे निंदनी, कोळपणी, फवारणी, नियमीत करावीच लागत होती. दुष्काळाचे सावट व खर्चाचा बोजा यामुळे शेतकरी हतबल झाला होता. या गंभीर स्थितीत धाऊन आलेला हा पाऊस शेतकरींसाठी संजिवणीच ठरला असून एक मोठा आधार व हंगामाची आशा पल्लवीत झाली आहे.रावेर तालुक्यातील पाल परिसरताली सुकी नदीला पूर आला. यावल तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. पाचोरा येथे अर्धा तास पाऊस झाला. या शिवाय जामनेर तालुक्यातही सर्वत्र पाऊस आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव