शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जळगावात आषाढच्या पहिल्यास दिवशी पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:41 IST

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या दमदार पावसाचे आषाढ मासाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी संध्याकाळी जोरदार आगमन झाल्याने बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजळगावात पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणीतब्बल २२ दिवसानंतर झाला दमदार पाऊससकाळपासून अधूम-मधून पावसाची हजेरी

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या दमदार पावसाचे आषाढ मासाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी संध्याकाळी जोरदार आगमन झाल्याने बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. तब्बल २२ दिवसानंतर झालेल्या दमदार पावसाने शहराला संध्याकाळी अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील विविध भागात पाण्याचे तळे साचल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला.यंदा मान्सूनपूर्वीच २ जून रोजी शहरात दमदार पाऊस झाला होता. ७ जून पूर्वीच आलेल्या या दमदार पावसाने सर्वांच्या आशा पल्लवीत होऊन यंदा चांगला पावसाळा चांगला राहणार असण्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र मध्येच पावसाने दडी मारल्याने सर्वच चिंतातूर झाले. त्यात पेरणी तर झाली मात्र २२ जूनपासून जोरदार पाऊसच नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.गेल्या आठवड्यातही आभाळ दाटून आले तरी पाऊस हुलकावणी देत होता. शनिवारीदेखील सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर अधून-मधून रिपरिप होत होती. दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. मात्र अर्धा तास पडल्यानंतर तो पुन्हा गायब झाला. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होऊन तब्बल तासभर तो सुरूच राहिला. त्यानंतर त्याचा वेग कमी झाला तरी रात्रीपर्यंत पाऊस सुरूच होता. यात अधून-मधून जोरदार सरी कोसळत होत्या.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस