शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जळगावात आषाढच्या पहिल्यास दिवशी पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:41 IST

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या दमदार पावसाचे आषाढ मासाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी संध्याकाळी जोरदार आगमन झाल्याने बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजळगावात पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणीतब्बल २२ दिवसानंतर झाला दमदार पाऊससकाळपासून अधूम-मधून पावसाची हजेरी

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या दमदार पावसाचे आषाढ मासाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी संध्याकाळी जोरदार आगमन झाल्याने बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. तब्बल २२ दिवसानंतर झालेल्या दमदार पावसाने शहराला संध्याकाळी अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील विविध भागात पाण्याचे तळे साचल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला.यंदा मान्सूनपूर्वीच २ जून रोजी शहरात दमदार पाऊस झाला होता. ७ जून पूर्वीच आलेल्या या दमदार पावसाने सर्वांच्या आशा पल्लवीत होऊन यंदा चांगला पावसाळा चांगला राहणार असण्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र मध्येच पावसाने दडी मारल्याने सर्वच चिंतातूर झाले. त्यात पेरणी तर झाली मात्र २२ जूनपासून जोरदार पाऊसच नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.गेल्या आठवड्यातही आभाळ दाटून आले तरी पाऊस हुलकावणी देत होता. शनिवारीदेखील सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर अधून-मधून रिपरिप होत होती. दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. मात्र अर्धा तास पडल्यानंतर तो पुन्हा गायब झाला. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होऊन तब्बल तासभर तो सुरूच राहिला. त्यानंतर त्याचा वेग कमी झाला तरी रात्रीपर्यंत पाऊस सुरूच होता. यात अधून-मधून जोरदार सरी कोसळत होत्या.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस