शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

फळे पिकवण्यासाठी होतोय घातक रसायनांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

ऋतूनिहाय उपलब्ध फळांचे महत्त्व मानवी आरोग्य आणि पोषणासाठी अनन्यसाधारण आहे. जीवरक्षक आणि पुष्टी प्रदान करणारी ही फळे आता अत्यंत ...

ऋतूनिहाय उपलब्ध फळांचे महत्त्व मानवी आरोग्य आणि पोषणासाठी अनन्यसाधारण आहे. जीवरक्षक आणि पुष्टी प्रदान करणारी ही फळे आता अत्यंत घातक रसायनांच्या साहाय्याने पिकवली जात आहेत. त्यामुळे ती फळे जीवघेणी ठरू लागली आहेत. त्यात प्रामुख्याने केळी, चिकू, आंबे आणि पपईचा समावेश आहे. ज्या रसायनांच्या साहाय्याने ही फळे पिकवली जातात ती खूप शक्तिशाली आहेत. ज्या फळांना नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी किमान चार दिवस ते एक आठवडा लागू शकतो, ती फळे या रसायनांच्या साहाय्याने अवघ्या काही तासांत पिकवली जातात. काही फळांमध्ये कागदात गुंडाळलेल्या कॅल्शियम कार्बाइडच्या पुड्या ठेवल्या जातात. त्यामुळे अनैसर्गिक पद्धतीने प्रचंड उष्मा तयार होऊन फळे पिकतात. या रसायनाला ‘बम’ हा सांकेतिक शब्द आहे. काही फळांवर विशिष्ट रसायनांचा स्प्रे मारून ती पिकवली जातात तर केळी विशिष्ट रसायनयुक्त पाण्यात भिजवून पिकवली जातात. आता तर केळी पिकवण्यासाठी देशी रसायनांऐवजी अतिघातक चायनीज रसायनेही उपलब्ध झाली आहेत.

दुधासाठी ऑक्सिटोसिनचा वापर

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीतही अशीच भयावह स्थिती आहे. अगदी आपल्या डोळ्यादेखत जेथे म्हशीचे दूध मिळते, तेही अनेक रोगांना घरबसल्या आमंत्रण देऊ शकते. अनेक दूध विक्रेते म्हशीचे दूध काढण्यापूर्वी त्यांना ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन देतात. त्यामुळे म्हैस जास्त दूध देते. या इंजेक्शनमुळे कालांतराने म्हशींनाही खूप शारीरिक समस्या निर्माण होतात. मानवी जीवनावरही त्यातही बालके, मुली व महिलांच्या आरोग्यावर याचा खूप वाईट परिणाम होतो. या इंजेक्शनवर महाराष्ट्रात बंदी आहे. मात्र गुजरात व सौराष्ट्रातील गुरे विक्री करणारे व्यापारी खान्देशात व्यवसाय करण्यासाठी नियमित येतात तेव्हा ते लपून-छपून याची विक्री करतात.

कोट

हल्ली अनेक जण हृदयरोगासह श्वसन संस्था, पचनसंस्था, यकृत, स्वादुपिंड तसेच मूत्रपिंडाच्या संसर्गासह विविध रोगांनी बाधित झाले आहेत. नवनवीन प्रकारचे रोग व आजार उद्भवत आहेत. काही तर वैद्यकशास्त्रालाही अनाकलनीय व आव्हानात्मक आहेत. यापैकी अनेक रोग फळे पिकवणाऱ्या घातक रसायनांमुळे तथा भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांशी निगडित आहेत.

- डॉ. प्रशांत शिंदे,

अमळनेर