शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

फळे पिकवण्यासाठी होतोय घातक रसायनांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

ऋतूनिहाय उपलब्ध फळांचे महत्त्व मानवी आरोग्य आणि पोषणासाठी अनन्यसाधारण आहे. जीवरक्षक आणि पुष्टी प्रदान करणारी ही फळे आता अत्यंत ...

ऋतूनिहाय उपलब्ध फळांचे महत्त्व मानवी आरोग्य आणि पोषणासाठी अनन्यसाधारण आहे. जीवरक्षक आणि पुष्टी प्रदान करणारी ही फळे आता अत्यंत घातक रसायनांच्या साहाय्याने पिकवली जात आहेत. त्यामुळे ती फळे जीवघेणी ठरू लागली आहेत. त्यात प्रामुख्याने केळी, चिकू, आंबे आणि पपईचा समावेश आहे. ज्या रसायनांच्या साहाय्याने ही फळे पिकवली जातात ती खूप शक्तिशाली आहेत. ज्या फळांना नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी किमान चार दिवस ते एक आठवडा लागू शकतो, ती फळे या रसायनांच्या साहाय्याने अवघ्या काही तासांत पिकवली जातात. काही फळांमध्ये कागदात गुंडाळलेल्या कॅल्शियम कार्बाइडच्या पुड्या ठेवल्या जातात. त्यामुळे अनैसर्गिक पद्धतीने प्रचंड उष्मा तयार होऊन फळे पिकतात. या रसायनाला ‘बम’ हा सांकेतिक शब्द आहे. काही फळांवर विशिष्ट रसायनांचा स्प्रे मारून ती पिकवली जातात तर केळी विशिष्ट रसायनयुक्त पाण्यात भिजवून पिकवली जातात. आता तर केळी पिकवण्यासाठी देशी रसायनांऐवजी अतिघातक चायनीज रसायनेही उपलब्ध झाली आहेत.

दुधासाठी ऑक्सिटोसिनचा वापर

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीतही अशीच भयावह स्थिती आहे. अगदी आपल्या डोळ्यादेखत जेथे म्हशीचे दूध मिळते, तेही अनेक रोगांना घरबसल्या आमंत्रण देऊ शकते. अनेक दूध विक्रेते म्हशीचे दूध काढण्यापूर्वी त्यांना ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन देतात. त्यामुळे म्हैस जास्त दूध देते. या इंजेक्शनमुळे कालांतराने म्हशींनाही खूप शारीरिक समस्या निर्माण होतात. मानवी जीवनावरही त्यातही बालके, मुली व महिलांच्या आरोग्यावर याचा खूप वाईट परिणाम होतो. या इंजेक्शनवर महाराष्ट्रात बंदी आहे. मात्र गुजरात व सौराष्ट्रातील गुरे विक्री करणारे व्यापारी खान्देशात व्यवसाय करण्यासाठी नियमित येतात तेव्हा ते लपून-छपून याची विक्री करतात.

कोट

हल्ली अनेक जण हृदयरोगासह श्वसन संस्था, पचनसंस्था, यकृत, स्वादुपिंड तसेच मूत्रपिंडाच्या संसर्गासह विविध रोगांनी बाधित झाले आहेत. नवनवीन प्रकारचे रोग व आजार उद्भवत आहेत. काही तर वैद्यकशास्त्रालाही अनाकलनीय व आव्हानात्मक आहेत. यापैकी अनेक रोग फळे पिकवणाऱ्या घातक रसायनांमुळे तथा भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांशी निगडित आहेत.

- डॉ. प्रशांत शिंदे,

अमळनेर