शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फळे पिकवण्यासाठी होतोय घातक रसायनांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

ऋतूनिहाय उपलब्ध फळांचे महत्त्व मानवी आरोग्य आणि पोषणासाठी अनन्यसाधारण आहे. जीवरक्षक आणि पुष्टी प्रदान करणारी ही फळे आता अत्यंत ...

ऋतूनिहाय उपलब्ध फळांचे महत्त्व मानवी आरोग्य आणि पोषणासाठी अनन्यसाधारण आहे. जीवरक्षक आणि पुष्टी प्रदान करणारी ही फळे आता अत्यंत घातक रसायनांच्या साहाय्याने पिकवली जात आहेत. त्यामुळे ती फळे जीवघेणी ठरू लागली आहेत. त्यात प्रामुख्याने केळी, चिकू, आंबे आणि पपईचा समावेश आहे. ज्या रसायनांच्या साहाय्याने ही फळे पिकवली जातात ती खूप शक्तिशाली आहेत. ज्या फळांना नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी किमान चार दिवस ते एक आठवडा लागू शकतो, ती फळे या रसायनांच्या साहाय्याने अवघ्या काही तासांत पिकवली जातात. काही फळांमध्ये कागदात गुंडाळलेल्या कॅल्शियम कार्बाइडच्या पुड्या ठेवल्या जातात. त्यामुळे अनैसर्गिक पद्धतीने प्रचंड उष्मा तयार होऊन फळे पिकतात. या रसायनाला ‘बम’ हा सांकेतिक शब्द आहे. काही फळांवर विशिष्ट रसायनांचा स्प्रे मारून ती पिकवली जातात तर केळी विशिष्ट रसायनयुक्त पाण्यात भिजवून पिकवली जातात. आता तर केळी पिकवण्यासाठी देशी रसायनांऐवजी अतिघातक चायनीज रसायनेही उपलब्ध झाली आहेत.

दुधासाठी ऑक्सिटोसिनचा वापर

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीतही अशीच भयावह स्थिती आहे. अगदी आपल्या डोळ्यादेखत जेथे म्हशीचे दूध मिळते, तेही अनेक रोगांना घरबसल्या आमंत्रण देऊ शकते. अनेक दूध विक्रेते म्हशीचे दूध काढण्यापूर्वी त्यांना ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन देतात. त्यामुळे म्हैस जास्त दूध देते. या इंजेक्शनमुळे कालांतराने म्हशींनाही खूप शारीरिक समस्या निर्माण होतात. मानवी जीवनावरही त्यातही बालके, मुली व महिलांच्या आरोग्यावर याचा खूप वाईट परिणाम होतो. या इंजेक्शनवर महाराष्ट्रात बंदी आहे. मात्र गुजरात व सौराष्ट्रातील गुरे विक्री करणारे व्यापारी खान्देशात व्यवसाय करण्यासाठी नियमित येतात तेव्हा ते लपून-छपून याची विक्री करतात.

कोट

हल्ली अनेक जण हृदयरोगासह श्वसन संस्था, पचनसंस्था, यकृत, स्वादुपिंड तसेच मूत्रपिंडाच्या संसर्गासह विविध रोगांनी बाधित झाले आहेत. नवनवीन प्रकारचे रोग व आजार उद्भवत आहेत. काही तर वैद्यकशास्त्रालाही अनाकलनीय व आव्हानात्मक आहेत. यापैकी अनेक रोग फळे पिकवणाऱ्या घातक रसायनांमुळे तथा भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांशी निगडित आहेत.

- डॉ. प्रशांत शिंदे,

अमळनेर