शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

सखी-सखीतलं हितगूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 5:39 PM

नंदुरबार येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक प्रा.सविता पटेल यांनी अक्षय तृतीयेनिमित्त सखी-सखीतले हितगूूज मांडण्याचा केलेला प्रयत्न...

अक्षय तृतीयेसंदर्भात अनेक लोककथा, लोकसमज, आख्यायिका आपणास लोकसाहित्यातून तसेच धार्मिक ग्रंथातून वाचावयास मिळतात. कुणबी लोक या सणास ‘आखाजी’ म्हणतात तर गुजर लोक या सणास ‘आखात्री’ या नावाने संबोधतात.अक्षय तृतीयेच्या दिवशी नांगराच्या फाळाला किंवा वखराच्या पासला सोन्याची अंगठी घासून सकाळी औताला बैल जोडून अंगणात उभे करतात. घरधनीण त्यांची पूजा करते. गूळ व धन्याचा प्रसाद देऊन औत शेतात किमान पाच फेऱ्या लावण्यासाठी नेतात. शेतीकामाला मंगल प्रार्थना करून आराधना करण्यात शेतकरी समाज धन्यता मानतो. फळांचा राजा आंबा असल्याने आमरस पुरणाची पोळी जेवणाचे महत्त्व या दिवशी आहे. गुजर समाजात यासाठी ‘सवाष्ण’ (गोळन्यो) जेवू घालण्याचीदेखील पद्धत आहे. बºयाच समाजात कलश व डांगर पूजनाचे महत्त्वदेखील अबाधित आहे. चार मातीचे ठोकळे ठेवून त्यावर माठाची स्थापना करून डेरगं भरण्याची प्रथा आहे. जमलेले सर्व घरातील मंडळी बोटाचा स्पर्श करतात आणि माठाच्या हालचाली पाहून या वर्षी किती पाऊस येईल याचा अंदाज लावतात. गुजर समाजात ५० वर्षांपूर्वी अक्षय तृतीयेला कोणीही पाहुणा कोणत्याही नातेवाइकाकडे मुक्कामी जायचा नाही, अशी पद्धत होती. आज मात्र तसे मानले जात नाही. एक-दोन तासात महत्त्वाचे काम असल्यास पाहुणा म्हणून जाऊ शकतात. याचे दुसरे कारण असे की ‘गजरानू’ परिसरातील गावे ही तासाभराच्या अंतरावर आहेत. त्यामुळे आपले काम आटोपल्यावर सायंकाळपर्यंत आपल्या घरी परत येऊ शकतात. पूर्वी वाहनांची कमतरता असल्याने ही पद्धत रूढ होती व म्हणून सणासुदीला कोणाकडे जात नसत. आखाजीला सखी-सखीतलं हितगुज मांडायचे. हमखास खात्रीचे (खातरी) श्रद्धास्थान म्हणजे कडुनिंबाला हेलकावणाºया आखाजीच्या झोक्यासोबत स्त्री मन मोकळे होते हे एका गुजरी लोकगीतातून स्पष्ट होते.मारा पियरणो वाडो वाडानो लिंबडो लिंबडानो हिचको सखीनो गराडो पछि सु गावानो संसारणो पवाडो आखात्री आखात्री आय आखात्रीणी वात।गयी आखात्री कणतीन हू देखी रहती वाट।याप्रमाणे स्त्री मन हलके होते तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. नव्याने शेती करायचे तो हाच सुदिन मानून पूज्य मानला जातो. या सणाचे जसे सामाजिक महत्त्व आहे तसेच धार्मिक महत्त्वही तेवढेच आहे.-प्रा.सविता पटेल, नंदुरबार

टॅग्स :literatureसाहित्यnandurbar-pcनंदुरबार