हातच्या हंगामाला गारांनी पिटाळले!
By Admin | Updated: February 12, 2015 13:30 IST2015-02-12T13:30:18+5:302015-02-12T13:30:18+5:30
सातपुड्यात गारा व पावसामुळे आंबेमोहर गळून पडला असून जळगाव जिल्ह्यात सात ते आठ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

हातच्या हंगामाला गारांनी पिटाळले!
विशाल गांगुर्डे
पिंपळनेर जळगाव/नंदुरबार/धुळे : खान्देशात मंगळवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रचंड नुकसान झाले आहे. सातपुड्यात गारा व पावसामुळे आंबेमोहर गळून पडला असून जळगाव जिल्ह्यात सात ते आठ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्रात पिकांना फटका बसला आहे.
खान्देशात मंगळवारी रात्री अनेक भागात गारपिटीचा तडाखा बसला. साक्री तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
जळगाव जिल्हा : बेमोसमी पावसाने गहू, हरभरा, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले व आंब्यांचा मोहर गळून पडला आहे. महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गिरणा परिसरात गहू, मका, लिंबू, शेवगा, हरभरा आदी पिकांचेही मोठे नुकसान झाले. फळबागांनाही याचा फटका बसला आहे.
नंदुरबार जिल्हा : नवापूर तालुक्यातील काही भागात गारपीट झाली. गारांमुळे भातासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आंबे मोहराचे नुकसान झाले आहे.
धुळे जिल्हा : साक्री व पिंपळनेरच्या काही क्षेत्रात दुसर्या दिवशी बुधवारीसुद्धा शेतात गारांचा थर साचलेला होता. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
------
हंगामाला 'मार'पीट' शेतकर्यांचे चोपडा तालुक्यात १८२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. शेतकर्यांच्या (९३ गावांतील) पिकांना तडाखा बसला आहे. हेक्टर क्षेत्र फक्त रावेर तालुक्यातच बाधित झाले. मिनिटांच्या गारपिटीने रावेर, यावल, चोपडा तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील रोहाणे येथे दुसर्या दिवशी बुधवारीसुद्धा शेतात गारांचा थर साचलेला होता.