शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

प्रश्नपत्रिका हाताने लिहिण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 13:27 IST

सागर दुबेउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड नेशनच्या पेपरला चक्क चुकीची प्रश्नपत्रिका दिल्यामुळे उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे निघाले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने काही वेळातच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या़ मात्र प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्य चकीत झाले. चक्क हाताने लिहीलेली ...

सागर दुबेउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड नेशनच्या पेपरला चक्क चुकीची प्रश्नपत्रिका दिल्यामुळे उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे निघाले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने काही वेळातच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या़ मात्र प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्य चकीत झाले. चक्क हाताने लिहीलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाली़ हाताने प्रश्नपत्रिका लिहिण्याची वेळ येणे हे उमविकडून अपेक्षीत नाही़ दरम्यान, चुकीची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कारवाईची अभाविपने मागणी केली होती़ त्यावर देखील काही हालचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत़ विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने लक्ष देण्याची गरज आहे़प्रश्नपत्रिका चुकीची असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसाय झाली़ निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे पाचोरा, जामनेर तसेच जवळपास गावातील होती़ त्यामुळे रात्री साडेसात वाजता पेपर सुटल्यावर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी गाडी मिळणे मुश्किल झाले होते़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती़ आता अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू होणार आहेत़ त्यासाठी विद्यापीठ प्रशासन कसे नियोजन आखणार याकडे सर्वांचे लक्ष आहे़ सूर्य आग ओकत असताना काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना उकाड्यात बसून पेपर सोडवावे लागत आहे़ विद्यार्थी हितासाठी विद्यापीठाने महाविद्यालांमधील सुविधांची पाहणी सुध्दा करण्याची गरज आहे़दुसरीकडे विद्यापीठ आवारातील मुला-मुलींच्या वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर समस्या सिनेट सदस्यांकडे विद्यार्थ्यांनी मांडल्या़ त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना पाणी व विजेची समस्या असल्याचे समोर आले़ याबाबत सिनेट सदस्य कुलगुरूंची चर्चा करणार आहे़ मात्र, विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरविण्यात कमी पडत असल्याचे चित्र यातून दिसून येते़ आता यावर विद्यापीठ काय दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी चांगले अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यात येत असतात़ परंतू, किरकोळ चुकांमुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते़

टॅग्स :educationशैक्षणिकJalgaonजळगाव