शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

प्रश्नपत्रिका हाताने लिहिण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 13:27 IST

सागर दुबेउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड नेशनच्या पेपरला चक्क चुकीची प्रश्नपत्रिका दिल्यामुळे उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे निघाले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने काही वेळातच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या़ मात्र प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्य चकीत झाले. चक्क हाताने लिहीलेली ...

सागर दुबेउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड नेशनच्या पेपरला चक्क चुकीची प्रश्नपत्रिका दिल्यामुळे उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे निघाले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने काही वेळातच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या़ मात्र प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्य चकीत झाले. चक्क हाताने लिहीलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाली़ हाताने प्रश्नपत्रिका लिहिण्याची वेळ येणे हे उमविकडून अपेक्षीत नाही़ दरम्यान, चुकीची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कारवाईची अभाविपने मागणी केली होती़ त्यावर देखील काही हालचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत़ विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने लक्ष देण्याची गरज आहे़प्रश्नपत्रिका चुकीची असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसाय झाली़ निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे पाचोरा, जामनेर तसेच जवळपास गावातील होती़ त्यामुळे रात्री साडेसात वाजता पेपर सुटल्यावर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी गाडी मिळणे मुश्किल झाले होते़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती़ आता अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू होणार आहेत़ त्यासाठी विद्यापीठ प्रशासन कसे नियोजन आखणार याकडे सर्वांचे लक्ष आहे़ सूर्य आग ओकत असताना काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना उकाड्यात बसून पेपर सोडवावे लागत आहे़ विद्यार्थी हितासाठी विद्यापीठाने महाविद्यालांमधील सुविधांची पाहणी सुध्दा करण्याची गरज आहे़दुसरीकडे विद्यापीठ आवारातील मुला-मुलींच्या वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर समस्या सिनेट सदस्यांकडे विद्यार्थ्यांनी मांडल्या़ त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना पाणी व विजेची समस्या असल्याचे समोर आले़ याबाबत सिनेट सदस्य कुलगुरूंची चर्चा करणार आहे़ मात्र, विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरविण्यात कमी पडत असल्याचे चित्र यातून दिसून येते़ आता यावर विद्यापीठ काय दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी चांगले अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यात येत असतात़ परंतू, किरकोळ चुकांमुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते़

टॅग्स :educationशैक्षणिकJalgaonजळगाव