सुधारित पैसेवारीवर निम्मे जिल्हा संतप्त
By Admin | Updated: November 18, 2015 01:14 IST2015-11-18T01:14:27+5:302015-11-18T01:14:27+5:30
जिल्ह्यातील सुधारित पैसेवारीत तब्बल तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविण्यात आल्याने या तालुक्यातील जनतेत प्रशासनाप्रति संताप व्यक्त होत आहे.

सुधारित पैसेवारीवर निम्मे जिल्हा संतप्त
नंदुरबार : जिल्ह्यातील सुधारित पैसेवारीत तब्बल तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविण्यात आल्याने या तालुक्यातील जनतेत प्रशासनाप्रति संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पैसेवारी जाहीर केल्यानंतर ग्रामस्थांच्या हरकती मागविण्याबाबत प्रक्रियाच राबविली गेली नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी असून याबाबत आता फेरसव्रेक्षण करून वास्तव स्थिती मांडण्याची गरज आहे. पावसात अनियमिता जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अनियमित व कमी पाऊस होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व धडगाव हे तीन तालुके दुष्काळी होते. या वर्षीदेखील पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, उडीद, मूग या सर्वच पिकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे. शेतक:यांना लागवडीसाठी केलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे शेतक:यांमध्ये चिंतेचे सावट असून शासनाकडून मदतीची अपेक्षा लावून असतानाच सुधारित पैसेवारीत केवळ तीनच तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिका:यांनी महसूल आयुक्तांकडे पाठविल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पाऊस लांबला नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या पैसेवारी सव्रेक्षणात जिल्ह्यातील सर्व 885 गावांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिका:यांनी महसूल आयुक्तांना दिला होता. त्या वेळी सरासरी केवळ 66.24 टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस समाधानकारक झाला. परंतु हा पाऊस मुळातच लांबल्याने त्याचा पिकांना कुठलाही फायदा झाला नाही. उलट उत्पादनापेक्षा मका, ज्वारी या पिकांचा किमान चारा उपयोगी ठरेल अशी आस लावून बसलेल्या शेतक:यांचे नुकसान झाले. कारण या पावसाने चाराही सडला होता. त्यामुळे त्याचे उत्पादनही मिळाले नाही. हे वास्तव असताना प्रशासनाने 31 ऑक्टोबरला जाहीर केलेल्या सुधारित पैसेवारीत शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविली. या पैसेवारीसंदर्भात विविध गावातील सरपंच व ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी ही पैसेवारीच चुकीची काढल्याचे सांगितले. पैसेवारी काढणा:या एका महसूल विभागातील कर्मचा:याशी संपर्क साधला असता त्यांनी विविध गावातील सरपंचांनीही आता त्याबाबत रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांच्या हरकती घ्याव्यात व त्यानुसार अंतिम पैसेवारी जाहीर करावी, अशी अपेक्षा लागून आहे.