शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

जवखेडावासियांचे गुरुमाऊली विसावले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 18:43 IST

श्री दत्त गादीपीठाचे आचार्य श्री संतोषपुरी गुरू बाळपुरी महाराज यांचे बुधवारी दुपारी ३ वाजता नाशिक येथील दवाखान्यात निधन झाले.

ठळक मुद्देवयाच्या ९२व्या वर्षी पंचत्वात विलीन...

लोकमत न्यूज नेटवर्क

जवखेडा, ता. अमळनेर : जवखेडा येथील श्री दत्त गादीपीठाचे आचार्य श्री संतोषपुरी गुरू बाळपुरी महाराज यांचे बुधवारी दुपारी ३ वाजता नाशिक येथील दवाखान्यात वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले.

जवखेडा आणि आनोरे दरम्यान शेतशिवारातील टेकडीवर असलेले दत्त मंदिर... याच जागेवर स्व. आचार्य तुळशीपुरी महाराजांनी १९१३ला झोपडीवजा कुटीयारुपी मंदिराची स्थापना केली. त्यांच्याआधी स्व. आचार्य सैलापुरी महाराजांनी याच जागेवर पादुका पूजन करुन कुटीया उभारली होती, अशी आख्यायिका आहे. जंगलातील याच टेकडीवरून तुळशीपुरी महाराजांनी जवखेडावासियांना अध्यात्माचे धडे दिले. पुढे स्व. बाळपुरी महाराजांनी १९६१मध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातच मंदिराची स्थापना करुन आचार्य संतोषपुरी महाराजांनी १९६९ला दीक्षा घेतली अन् तेथूनच गावात दररोज सकाळी प्रभातफेरी व अभंगांचे सूर घुमू लागले.

दरपौर्णिमेला रात्री पुजापाठही होऊ लागला. दत्त जयंतीला मोठा उत्सव होऊ लागला. अख्खे गाव दत्तमार्गीमय झाले. परिणामी दारु, मांसाहार गावातून हद्दपार झाले. पुढे आचार्य संतोषपुरी महाराजांच्या मार्गदर्शनाने व गावकऱ्यांच्या सहकार्याने १९९५ला बसस्थानक परिसरातच भव्यदिव्य श्री गुरुदेव दत्त गादीपीठ मंदिर उभारण्यात आले. नित्यनेमाने अध्यात्मिक शिकवण देता देता पूर्ण गाव त्यांनी दत्तमार्गी केले. ‘‘ना दारू, ना मांस जवखेडाकरांचा असाही ध्यास’’ ही संकल्पना अंमलात आणली. मांस विक्री, मद्य प्राशन या गोष्टी त्यांनी गावातून त्यांच्या अध्यात्मिकतेच्या शिकवणीतून हद्दपार केल्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये अध्यात्मिकतेची गोडी रुजवली. पूर्वी असलेल्या टेकडीवरील मंदिराच्या जागेवर जीर्णोद्धार करून मंदिर उभारण्याचा संकल्प संतोषपुरी महाराजांनी जवखेडावासियांजवळ मांडला अन् तो गावकऱ्यांच्या सहकार्याने व तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व दानशूर भाविकांच्या देणगीरूपी मदतीतून २००३ला या जागेवर जीर्णोद्धार करून टुमदार मंदिर उभारले अन् तेथेही पुन्हा पुजाविधी होऊ लागले. दर पौर्णिमेला पूजा होऊ लागली.

गेल्या ७ वर्षांपूर्वी बालबह्मचारी सनंदनपुरी महाराजांनी गावातील मंदिरावर दीक्षा घेतलीय... तेच सध्या महाराजांची काळजी घेत आजच्या तरुणाईला अध्यात्मिकतेचे धडे देत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरDeathमृत्यू