शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

भाजप मंत्र्यांच्या चौकशीचे अहवाल महाविकास आघाडी सरकार उघड करणार - गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:12 IST

नारायण राणे यांना टीकेशिवाय काय येते?

जळगाव : येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप मंत्र्यांच्या चौकशीचे अहवाल महाविकास आघाडी सरकार उघड करणार असल्याच्या वृत्ताला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात दुजोरा दिला असून ‘मागील काळात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, त्या उघड होतीलच’, अशा शब्दात त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपला घेरण्यासाठी आखल्या जाणाऱ्या रणनितीचे संकेत दिले.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौºयाच्या पार्श्वभूमीवर नाणार प्रकल्पावरून त्यांच्यावर टीका करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही पाटील यांनी समाचार घेत राणे यांना टीका करण्याशिवाय काय येते व टीकेशिवाय त्यांचे अस्तित्व कसे टिकू शकेल, असा चिमटाही त्यांनी राणे यांना काढला.शिवजयंती निमित्त जळगावात बुधवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीला हजेरी लावल्यानंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी हे संकेत दिले.येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार भाजप मंत्र्यांच्या चौकशीचे अहवाल उघड करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, ‘मागील काळात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, त्या उघड होतीलच. त्यात कुणी भीती बाळगण्याचे कारण नाही. जे चांगले असेल ते चांगलेच असेल. मात्र जे उघड करण्यासारखे असेल ते उघड करावेच लागेल. ज्या गोष्टी खºया आहेत, त्या जनतेसमोर आणाव्याच लागतात, असे स्पष्टपणे सांगितले.टीका केली नाही तर राणेंचे अस्तित्व कसे टिकेल?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौºयावर आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘नाणार’ प्रकल्पाबाबत वक्तव्य करीत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे कोकणच्या विकासात काय योगदान आहे? असा प्रश्न नारायण राणे यांनी केला होता. तसेच हे राज्य अधोगतीकडे जात आहे, सरकार चालत नसून भ्रष्टाचाराची दुकाने सुरु आहेत आणि यात मुख्यमंत्री कार्यालयाचाही समावेश आहे, अशीही टीका राणे यांनी केली होती. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत टीका करणे हेच नारायण राणे यांचे काम आहे. त्याशिवाय दुसरे त्यांना येत नाही, असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. टीका केली नाही तर त्यांचे अस्तित्त्वच राहू शकत नाही, असे सांगत पाटील यांनी राणे यांना चिमटा काढला.

टॅग्स :Jalgaonजळगाव