शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Gulabrao Patil: ... तर 9 व्या दिवशी मंत्रिपद सोडेन, ५० खोकेवरुन गुलाबराव पाटलांचं थेट चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 22:47 IST

आमदार बच्चू कडू यांनी ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणेवरुन विरोधकांना नार्मदासारख न वागण्याचे बजावले. तसेच, तुमच्याकडे पुरावे असतील तर तक्रार द्या, असे आव्हानही त्यांनी दिले होते.

मुंबई- शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. त्यातच, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी या युतीची घोषणा केली. त्यामुळे, शिंदे गटाकडून शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले. तर, ५० खोके, एकदम ओके म्हणटल्यामुळे विधानसभेच्या पायऱ्यावर झालेला राडा महाराष्ट्राने पाहिला. या घोषणेवरुन शिंदे गटातील नेते चांगलेच संतापले आहेत. बच्चू कडूंनी तर इशाराच दिला होता. आता, गुलाबराव पाटील यांनीही चॅलेंज दिलं आहे. 

आमदार बच्चू कडू यांनी ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणेवरुन विरोधकांना नार्मदासारख न वागण्याचे बजावले. तसेच, तुमच्याकडे पुरावे असतील तर तक्रार द्या, असे आव्हानही त्यांनी दिले होते. आता, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या घोषणेवरुन विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच, मंत्री होणे सोपी गोष्ट नसल्याचंही ते म्हणाले. 

मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र, आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्‍यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके, अशा नव-नवीन घोषणा निघाल्या. पण, ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ, असं थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. दरम्यान, विरोधकांकडून सातत्याने ५० खोके घेतल्याचा आरोप शिंदे गटातील आमदारांवर करण्यात येत आहे.

घोडा मैदान जवळच आहे

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामध्ये कोणाचं नुकसान होईल, कोणाला फायदा होईल हे आज सांगता येत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचं काम सुरु केलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील बैठका घेतायत, आमचीही कामे सुरु आहेत. भाजपाही तयारी करतेय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये त्यांची लोक कामे करताय, पण शेवटी घोडामैदान दूर नाहीय. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५-६ महिन्यात होती. त्यामध्ये 'दूध का दूध, पानी का पानी' दिसेल, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. 

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBachhu Kaduबच्चू कडू