शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

खान्देशातून दररोज १५० ट्रक कापूस गुजरातकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 6:23 PM

कापसाला रास्त भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच गुजरात शासनाने कापसावर५०० रुपयाचा बोनस जाहीर केल्यामुळे खान्देशातून दररोज सुमारे १५० ट्रक कापूस गुजरातकडे रवानाहोतआहेत. मात्र यामुळे शेतकºयांना कवडीमात्र फायदा होत असून, व्यापारीच ‘गब्बर’ होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे कापसावर बोनस दिल्याने शेतकºयांचा कल गुजरातकडे व्यापारीच होताहेत ‘गब्बर’ खासगीत ३ लाख गाठींची खरेदी तर ‘पणन’मध्ये ठणठणाट

आॅनलाईन लोकमत

अजय पाटील

जळगाव,दि.१४-कापसाला रास्त भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच गुजरात शासनाने कापसावर५०० रुपयाचा बोनस जाहीर केल्यामुळे  खान्देशातून दररोज सुमारे १५० ट्रक कापूस गुजरातकडे रवानाहोतआहेत. मात्र यामुळे शेतकºयांना कवडीमात्र फायदा होत  असून,  व्यापारीच ‘गब्बर’ होत असल्याचे चित्र आहे.

खान्देशात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. यंदादेखील खान्देशात सुमारे ६ लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासूनचा कापसाचा बाजार यंदा तेजी येण्याची शक्यता होती. त्यामुळे हमीभावचे दर देखील वाढण्याची अपेक्षा होती. मात्र सर्व अपेक्षा फोल ठरल्या असून, यंदाही कापूस उत्पादक शेतकºयांना फटका बसला आहे.

‘जीएसटी’वर परिणामशेतकºयांना यंदा कापूसच्या बोनसची शक्यता फारच कमी आहे. गुजरात सरकारकडून कापसाला बºयापैकी दर आहे. त्यामुळे खान्देशातून आतापर्यंत १५ हजारकापसाचेट्रक  गुजरातला रवानाझालेआहेत. त्याचा थेट परिणाम जीएसटीवर देखील होत असून, शेतकºयांकडून व्यापाºयांना माल विक्री करताना कुठलाही कर लागत नाही.

महाराष्टत बोनस का नाही?गुजरात सरकारने प्रतिक्ंिवटल ५०० रूपये बोनस जाहीर करून तेथील कापूस उत्पादक शेतकºयांना खूश करण्याचा प्रयत्न केला.त्या ठिकाणचा हमीदर महाराष्टÑाइतकाच  प्रतिक्ंिवटल ४ हजार ३२० रुपये इतकाच आहे. मात्र  बोनस ५०० रूपये मिळतअसल्याने ४ हजार ८२० रूपये भावशेतकºयांना मिळत आहेत. राज्यात मात्र हमीदर कमी असताना शेतकºयांकडून प्रतवारीचे निकष लावले जावून मालाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्त व्यापाºयांना कापूस विक्रीकरावा लागत आहे. त्यामुळे राज्यशासनाने देखील कापसावर बोनस जाहीर करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

लोकप्रतिनीधींची चुप्पीराज्यातील कापूस गुजरातकडे जात असताना, लोकप्रतिनीधी मात्र याबाबत  एक शब्दही बोलायला तयार नाहीत. कापसाच्या हमीभावासाठी आंदोलन करणारे तत्कालीन आमदार व विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजनहीयाबाबतबोलायलातयारनाही.

 खासगीत ३ लाख गाठींची खरेदी तर ‘पणन’मध्ये ठणठणाट१. खान्देशातील खासगी जिनींगमध्ये आतापर्यंत ३ लाख गाठींची खरेदी झाली असून, खासगी जिनींगमध्ये शेतकºयांना प्रतीक्विंटल४,४०० ते ४,५०० पर्यंत दर दिला जात आहे.२. शासनाच्या पणन महासंघाच्या कापूस  खरेदी केंद्रावर एकाही शेतकºयानेअद्याप कापूस विक्री केलेला नाही. सीसीआयच्या १३ केंद्रावर देखील पणन महासंघासारखीच स्थिती आहे.३. शेतकºयांकडून हा माल थेट गुजरातमध्ये जात नसून, खान्देशातील शेतकरी स्थानिक व्यापाºयांना आपला माल विक्री करतात व व्यापाºयांकडून हा माल गुजरातमध्ये विक्री केला जात असल्याने व्यापारीच ‘गब्बर’ होत असल्याचे चित्र आहे.

कोट..गुजरात सरकारने बोनस दिल्याने शेतकºयांचा कल गुजरातकडे अधिक आहे. दिवसभरात दीडशे ट्रक भरुन कापूस गुजरातकडे जात आहेत. बोनस जाहीर न झाल्यास शेतकºयांकडून हे पाऊल उचलले जात आहे.-प्रदिप जैन, अध्यक्ष खान्देश जिनींग असोसिएशन

राज्यशासनाने कापसावर बोनस जाहीर करण्याची गरज आहे. शेतकरी आत्महत्याकरीत असताना स्थानिक लोकप्रतिनीधी देखील काहीही बोलायला तयार नाही.-संजय पवार, संचालक,पणन महासंघ