शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

गहाणवटीचा ऐवज डोके : बसंती, उस कुत्ते के सामने मत नाचना बसंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:33 PM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्रा.अनिल सोनार.

ज्याने ‘शोले’ चित्रपट पाहिलेला नाही, असा माणूस भारतवर्षाच्या इतिहासात, वर्तमानात आणि भूगोलावर शोधूनही सापडणार नाही. एकवेळ रामायण, महाभारत, बायबल, कुराण इत्यादी ग्रंथ माहीत नसलेली व्यक्ती सापडेल, पण ‘शोले’ न पाहिलेली व्यक्ती सापडणे म्हणजे ‘गुल बकावलीचं फूल’ सापडण्यासारखं आहे. (आता, गुलबकावली म्हणजे काय? असा प्रश्न जर, आजीच्या तोंडून गोष्टी न ऐकताच लहानाचा मोठे झालेल्या मानवाने मला विचारला, तर मला, आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली, मी त्याच्यावर खटला भरीन.)चाळीस, पंचेचाळीस वर्षे होत आलीत तरी लोक न थकता शोले बघताय आणि त्याच्याबद्दल न थकता बोलताय अशी ‘शोले’ ही देदीप्यमान, अजरामर कलाकृती. ती बघा २०-२५ झोपड्या आणि एक ठाकूरची गढी, उर्फ दुमजली वाडा असलेली रामगढ नावाची वस्ती. नायकाला दारू पिऊन वर चढून आत्महत्येचं नाटक करता येण्यासाठी उभारलेली उंचावरची पाण्याची टाकी. तिच्या साक्षीने समोरच्याच विहिरीवरून, मातीच्या घागरींमधून, पाणी भरून नेणाऱ्या स्त्रिया. ‘मातीच्या’ घागरीतूनच अशासाठी, की जर घोड्यावरून खदडक खदडक करत डाकू आलेत, तर त्यांना एखाद्या गोरीच्या डोक्यावरील घड्याला नेम धरून गोळी मारता यायला हवी. घड्याला छानसं कलात्मक गोल भोक पडून, त्यातून पाण्याची धार लागणार. डाकूंना उगीचच गोळ्या खर्ची घालाव्या लागू नयेत म्हणून पनघटवरच्या उरलेल्या पनीहारीनी डोक्यावरच्या मातीच्या घागरी स्वत:च किंचाळत फोडून टाकत सैरावैरा पळणार. हजार घरांच्या वस्तीला पुरून उरेल एवढी मोठी पाण्याची टाकी उशाशी असताना, २०-२५ झोपड्या असलेल्या रामगढवासी स्त्रिया विहिरीवरून पाणी का भरतात? काय करणार बिच्चाºया, त्या पाण्याच्या टाकीला नळच जोडलेले नाहीत. बरं, नळ असते तरी काय उपयोग, पाणी खालून वर टाकीत चढवायला विजेची मोटार नको का? पण गावात वीजच नाही. वीज असती तर सगळ्यात आधी श्रीमंत ‘ठाकूर की हवेली’ उजळून निघाली नसती का? पण गावातच वीज नाही म्हणून हवेलीतही वीज नाही. वीज असती तर ठाकूरची वीजवंचित विधवा सून बिचारी उगाचंच संध्याकाळी गॅसबत्तीची ज्योत मोठी करून पेटवण्याच्या आणि सकाळ झाली, की ज्योत लहान करत विझवण्याच्या कामावर नेमल्यासारखी दिसली असती का? ‘गब्बरसिंग’ हा वेडसर दाखवला आहे. ते योग्यच आहे. गावात वीज नाही, चक्की नाही, आणि हे बाळ विचारतं, ‘ये रामगढ वाले कौनसी चक्कीका पिसा आटा खाते है रे’. वेडा कुठला! वेडा नाही तर काय, ज्या घरात विधवा सून आणि तिचा म्हातारा सासरा, असे फक्त दोनच व्यक्ती आहेत. अशा घरातल्या सासºयाचे दोन्ही हात छाटून टाकायचे, म्हणजे सगळीच कल्पनातीत पंचाईत की! नाही म्हणायला एक उत्तम केले आहे. विरू आणि बसंती ह्यांचे प्रेम तडीस जाऊ दिले आहे. पण ठाकूराच्या विधवेचं प्रेम काही सफल होऊ दिलेलं नाही. तिथे जय ह्या नायकाचा मृत्यू अचूकपणे मदतीला धाऊन आलाय. कल्पना करा ना राव, खानदानी ठाकूरच्या घरातील ‘विधवेचा पुनर्विवाह’ दाखवला असता, तर समस्त भारतातील ठाकूरांनी ‘शोले’लाच आग लावून नसती का टाकली. गहाणवटीतली डोकीसुद्धा जपावी लागतात राव ! (अपूर्ण)