शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडापाठोपाठ रेखाकलेचे गुण गेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन न करण्‍यासह सवलतीचे गुण यावर्षी देऊ नयेत, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन न करण्‍यासह सवलतीचे गुण यावर्षी देऊ नयेत, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा रेखाकला परीक्षेच्या अतिरिक्त गुणांना कोरोनामुळे मुकावे लागणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया कला शिक्षकांनी दिली.

शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट या विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आहेत. कला क्षेत्रामध्‍ये करिअर करण्‍यासाठी ही परीक्षा पहिली पायरी असते. परीक्षेतून मिळणाऱ्या गुणांमुळे विद्यार्थ्यांची दहावीची टक्केवारी वाढते. या संकट कालावधीत या परीक्षांची विद्यार्थ्यांसाठी गरज वाढलेली आहे. हजारो विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात. एलिमेंटरी व इंटरमिजिएट पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्‍ये वाढीव गुण मिळत असतात. मागील वर्षी या परीक्षेमुळे मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला. पण, आता परीक्षाच नाही तर नुकसान होणार आहे. आधीच कोरोनामुळे बहुतांश मुलांना शिक्षण मिळालेले नाही. त्यामुळे ही परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

==================

विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत सवलतीच्या गुणांचा फायदा होत असतो. मात्र, यावर्षी सवलतीचे गुण मिळणार की नाहीत, यावरच प्रश्न उपस्थित झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची शासकीय रेखाकला परीक्षा होणार नसल्यामुळे (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा दिली असेल, त्याला त्या आधारावर गुण द्यावे.

-सुनील दाभाडे, कला शिक्षक

=====================

विद्यार्थ्यांवर शासनाने अन्याय केलेला आहे. कोरोनाच्या महामारीत वाढीव गुण मिळतात म्हणून कलाशिक्षकांनी घेतलेले कष्ट वाया गेले. जेईई, सीईटीसारख्या तत्सम परीक्षा घेतल्या गेल्या. किमान जे विद्यार्थी गेल्या दोन वर्षांत एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण आहेत आणि त्यांचे प्रस्ताव संपूर्ण महाराष्ट्रातून आपापल्या बोर्डाकडे विहीत वेळेत पाठवले गेले. त्यांचे गुण तरी या वर्षांच्या एस. एस. सी. गुणपत्रकात देण्यात यावेत, असा आग्रह आहे.

राजेंद्र महाजन, ललित कला केंद्र, चोपडा

======================

उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जो तुघलकी निर्णय घेतलेला आहे. तो विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही. शासकीय रेखाकला परीक्षा रद्द करून दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येऊ नयेत, या निर्णयाने महाराष्ट्रातील जवळजवळ लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येणार आहे. ही खेदजनक बाब महाराष्ट्रातील एका कलावंत प्रेमी मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत व्हावी, हे फार चिंताजनक आहे. चोपडा तालुका कलाध्यापक संघाच्यावतीने शासनाच्या अन्यायकारक निर्णयाची आम्ही होळी करून आक्षेप नोंदवत आहोत.

- सुनील पाटील, अध्‍यक्ष, कलाध्‍यापक संघ

======================

कला क्षेत्रात चांगले करिअर करण्‍यासाठी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. पण, तीच परीक्षा घेतली गेली नाही तर कलाप्रेमी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. इतर परीक्षा होतात. मग ही परीक्षा का होत नाही. त्यामुळे शासनाने याचा विचार करून परीक्षा घ्‍यावी.

- दीपक पाटील, विद्यार्थी