शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

गोवी भ्रमरा सुमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 15:50 IST

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘रविवार विशेष’मध्ये ‘गाव पांढरी’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक रवींद्र पांढरे...

कुटुंब व समाज व्यवस्थेच्या घट्ट विणीच्या वस्त्राची विण काहीशी सैल... विरळ होत चाललीय. त्यामुळेच माणसं सामाजिक दृष्ट्या विमनस्क होता आहेत का? हा संशोधनाचा विषय ठरावा.पूर्वीच्या काळी सणाउत्सवाच्या, लग्न समारंभाच्या निमित्ताने समाजबांधव एकत्र आले म्हणजे वधू-वर संशोधन ही पार पडत असे. समाजात अशा काही ठराविक व्यक्ती वधू-वर संशोधनात अग्रेसर असत. समाजातील बहुतेक विवाह त्यांच्या माध्यमातूनच जळून येत असत. अशा वल्ली समाजामध्ये अजून ही आहेतच नाही असे नाही. पण आताशा वधू-वर संशोधन मंडळे, वधू-वर परिचय मेळावे व्हायला लागल्यामुळे अशा व्यक्ती वल्लीचं काम काहीसं हलंक झालं आहे. नाही तर या वल्ली घरी कमी अन् समाजात गावोगावी फिरतानाच अधिक दिसायच्या. वर्तमानपत्रात येणाऱ्या वधू-वर संशोधनाच्या जाहिराती पाहिल्या तर वधू अथवा वर समाजातलाच (जातीतलाच) पाहिजे असा आग्रह आता फारसा दिसत नाही. पण हे देखील तेवढेच खरे की अशा जाहिरातीमधील वधू-वरांचे वय बहुधा अठ्ठावीस-तीस वर्षाच्याच घरातले असते. वय जास्त वाढल्यामुळेच या वधू-वरांची आंतरजातीय विवाह करण्याची मानसिकता तयार झालेली असते, असे म्हणता येईल का?पूर्वीच्या काळी मुलीसाठी वर शोधणं हे मुलीच्या बापासाठी मोठं जिकरीचं असायचं. मुलीसाठी वर शोधून शोधून मुलीच्या बापाचे जोडे झिजायचे म्हणे. मुुलगी १५-१६ वर्षाची झाली म्हणजे ही उपवर मुलगी मुलीच्या आई-बापाला जोखिम वाटायची. अशा उपवर मुलीच्या आई-बापाला रात्रीची झोप लागायची नाही. केव्हा एकदा मुलीचं लग्न लावून देतो, लग्न लाऊन देऊ तिला सासरी वाटी लावतो आणि सामाजिक जबाबदारीतून मुक्त होतो असं त्यांना होऊन जायचं. आता मुलगी २५-३० वर्षाची झाली तरी योग्य स्थळाची वाट पाहण्याइतके मुलीचे आई-बाप संयमी झाले आहेत. एक काळ असा होता की ‘वर’ संशोधनात मुलीच्या बापाचे जोडे झिजायचे आता ‘वधू’ शोधायची तर मुलाच्या बापाचे जोडे झिजायला लागले आहेत. वर बापापेक्षा वधू पित्याचा भाव आता वधारलाय. मुलीला मागणी घालायला आलेल्या वरबापाला आता वधू पिता सहज विचारतो, ‘मुलगा नोकरीला आहे का?’ नोकरी सरकारी आहे का? खाजगी? शेती किती आहे? घरी संडास आहे की नाही? बहुतेक वधू पित्यांचा कल सरकारी नोकरी असलेल्या मुलालाच जावई करून घेण्याकडे असतो.केवळ शेतीत राबणाºया, श्रमणाºया व केवळ शेती उत्पादनावर अवलंबून असणाºया वराला तर आताच्या काळात वधू मिळणं फारच अवघड झालयं. वधू पित्याची अग्रक्रमाने पसंती सरकारी नोकरी असणाºया मुलांना असल्याने समाजात खूप सारी मुलं २५-३० वर्षाची झाल्यावर ही अविवाहितच असल्याचं दिसतंय. याच प्रमुख कारण अर्थातच मुलींचा घटलेला जन्मदर.मुलींचा जन्मदर का घटला, तर बहुतेक जोडप्यांना आता दोन पेक्षा जास्त अपत्य नको आहेत. मग वंश परंपरा चालवायची तर दोन अपत्यापैकी एक तरी मुलगा हवाचं. त्यामुळे जर पहिलं अपत्य मुलगी असेल तर नंतरचे मुलींचे गर्भ सर्रास पाडून टाकले जातात. मुली नकोशा झाल्या म्हणून मुलींचे गर्भ पाडले जातात हे पूर्ण सत्य नाही. असे असले तरी काही ही कारणाने का होईना मुलींचा जन्मदर घटला आहे हे आजचे वास्तव आहे. मुलींचा जन्मदर घटल्यामुळेच सामाजिक लग्न व्यवस्था काहीशी अडचणीत आली आहे.लग्नाचं वय उलटून गेल्यावरही वधू मिळत नाही म्हणून किंवा खूप-खूप शोध घेऊन ही समाजातंर्गत अनुरुप वधू किंवा वर मिळत नाही म्हणून समाज मन अलिकडे आंतरजातीय विवाहाकडे वळताना दिसते आहे. जात, धर्म, पंथ याचा विचार न करता लग्नाळू वयाची खूप मुलं-मुली परस्पर लग्न करत असल्याचे प्रकार ही वाढले आहे. लिव्ह इन रिलेशनशीप हा नवीनच लग्न प्रकार ही समाज मान्य होताना दिसतोयं. याला वय हेच एक कारण आहे असे नाही तर बदलते सामाजिक पर्यावरण ही तेवढेच जबाबदार आहे.विशेषत्वाने नोंद घ्यावी अशी बाब म्हणजे नैतिकता व घराण्याची प्रतिष्ठा याची धार आता पूर्वी इतकी तिक्ष्ण राहिली नाही ती बरीचशी बोथट झाली आहे. शेवटी माणूस हा समुहात वावरणारा, समूह करून राहणारा समाजप्रिय प्राणी आहे. कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्था माणसाला मानसिक आधार देते. संकट काळात, दु:खात कोलमडून न पडता धीराने उभं राहण्याच, संकटाला, दु:खाला सामोरं जाण्याचं बळ देते. जाती अंताच्या संघर्षास आंतरजातीय विवाह पूरक असले तरी त्यामुळे समाज व्यवस्था विस्कळीत होतेयं हे देखील नाकरून चालणार नाही. अर्थात कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतातच एक डावी आणि दुसरी उजवी. नाही तरी आपण म्हणतच असतो, ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ आपण काय कमावतोय आणि काय गमावतोय हे पुढे येणारा काळच ठरवेल. कालचक्र नाही तरी पुढे नेऊनच फिरत राहणार.-रवींद्र पांढरे, पहूर पेठ, ता.जामनेर

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर