शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

शासनाची भरड धान्य खरेदी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 21:27 IST

शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला तरी खरेदी सुरू न झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे.

ठळक मुद्देनिम्म्या भावात ज्वारी विकताय शेतकरी, पावसाळ्यात धान्य खराब होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला तरी खरेदी सुरू न झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे तर काहींना कमी भावात खुल्या बाजारत धान्य विक्री करावे लागत असल्याने शेतकरी तोट्यात जात आहेत.

राज्य शासनाने भरड धान्य खरेदी योजनेत ज्वारी, मका ,गहु खरेदी योजना सुरू करून १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नावे नोंदणी सुरू केली होती. नावे नोंदणीस मुदत वाढ मिळणार नाही, असे सक्त ताकीदीचे पत्र ही जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी दिले होते. शासनाने हायब्रीड ज्वारीसाठी २६२० रुपये, माल दांडी ज्वारी साठी २६४० रुपये, मका १८५० रुपये, गहू १९७५ रुपये हमी भाव जाहीर केला आहे. अमळनेर तालुक्यात ५८९ शेतकऱ्यांनी मका साठी नोंदणी तर १०७६ शेतकऱयांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत संपून २५ दिवस उलटले तरी शासनाने खरेदी सुरू झाली नाही. योग्य भाव मिळेल नोंदणी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल घरात साठवून ठेवला आहे. दरम्यानच्या काळात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी तथा शेती मशागत, बी बियाणे खरेदीसाठी पैसे लागणार असल्याने काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात आपला माल विक्री सुरू केला असून व्यापारी या संधीचा फायदा घेत मका फक्त १४०० रुपये क्विंटल तर ज्वारी निम्मे भावाने म्हणजे १३०० रुपये क्विंटल भावाने खरेदी करत आहेत.

शासनाची भरड धान्य योजना फसवी असून शेतकऱ्यांना निम्मे भावात ज्वारी विकावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

-स्मिता वाघ, माजी आमदार, भाजप

रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी यंत्रणा तयार आहे. गोदाम उपलब्ध असून २० हजार क्विंटल धान्य खरेदी करण्याची क्षमता असून ज्वारी मका नोंदणी झाली आहे. गहूची नोंदणी झाली नाही. वरिष्ठांचे आदेश येताच खरेदी सुरू होईल.

-संजय पाटील, व्यवस्थापक शेतकी संघ, अमळनेर

ज्वारी मका इत्यादी रब्बी पिकांची हमीभावाने खरेदी करण्यासंदर्भात शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा सर्व माल शेतकऱ्याकडे पडून आहे. पावसाळा जवळ आल्याने त्यात अळ्या, किडे पडून खराब होईल. तसेच खरीप हंगामात शेतकरीवर्गाला आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर शासनाने खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-धनंजय एकनाथ पाटील, शेतकरी , दहिवद, ता. अमळनेर.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरagricultureशेतीFarmerशेतकरी