शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची भरड धान्य खरेदी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 21:27 IST

शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला तरी खरेदी सुरू न झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे.

ठळक मुद्देनिम्म्या भावात ज्वारी विकताय शेतकरी, पावसाळ्यात धान्य खराब होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला तरी खरेदी सुरू न झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे तर काहींना कमी भावात खुल्या बाजारत धान्य विक्री करावे लागत असल्याने शेतकरी तोट्यात जात आहेत.

राज्य शासनाने भरड धान्य खरेदी योजनेत ज्वारी, मका ,गहु खरेदी योजना सुरू करून १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नावे नोंदणी सुरू केली होती. नावे नोंदणीस मुदत वाढ मिळणार नाही, असे सक्त ताकीदीचे पत्र ही जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी दिले होते. शासनाने हायब्रीड ज्वारीसाठी २६२० रुपये, माल दांडी ज्वारी साठी २६४० रुपये, मका १८५० रुपये, गहू १९७५ रुपये हमी भाव जाहीर केला आहे. अमळनेर तालुक्यात ५८९ शेतकऱ्यांनी मका साठी नोंदणी तर १०७६ शेतकऱयांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत संपून २५ दिवस उलटले तरी शासनाने खरेदी सुरू झाली नाही. योग्य भाव मिळेल नोंदणी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल घरात साठवून ठेवला आहे. दरम्यानच्या काळात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी तथा शेती मशागत, बी बियाणे खरेदीसाठी पैसे लागणार असल्याने काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात आपला माल विक्री सुरू केला असून व्यापारी या संधीचा फायदा घेत मका फक्त १४०० रुपये क्विंटल तर ज्वारी निम्मे भावाने म्हणजे १३०० रुपये क्विंटल भावाने खरेदी करत आहेत.

शासनाची भरड धान्य योजना फसवी असून शेतकऱ्यांना निम्मे भावात ज्वारी विकावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

-स्मिता वाघ, माजी आमदार, भाजप

रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी यंत्रणा तयार आहे. गोदाम उपलब्ध असून २० हजार क्विंटल धान्य खरेदी करण्याची क्षमता असून ज्वारी मका नोंदणी झाली आहे. गहूची नोंदणी झाली नाही. वरिष्ठांचे आदेश येताच खरेदी सुरू होईल.

-संजय पाटील, व्यवस्थापक शेतकी संघ, अमळनेर

ज्वारी मका इत्यादी रब्बी पिकांची हमीभावाने खरेदी करण्यासंदर्भात शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा सर्व माल शेतकऱ्याकडे पडून आहे. पावसाळा जवळ आल्याने त्यात अळ्या, किडे पडून खराब होईल. तसेच खरीप हंगामात शेतकरीवर्गाला आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर शासनाने खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-धनंजय एकनाथ पाटील, शेतकरी , दहिवद, ता. अमळनेर.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरagricultureशेतीFarmerशेतकरी