शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

जामनेरातील ‘त्या’ संकुलाची शासनाकडून होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST

जळगाव : जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या बीओटी तत्त्वावरील व्यापारी व्यापारी संकुलाबाबत जळगावच्या अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील ...

जळगाव : जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या बीओटी तत्त्वावरील व्यापारी व्यापारी संकुलाबाबत जळगावच्या अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील यांनी शासनाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत शासनाने त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. दोन महिन्यांत चौकशी करून समितीने अहवाल शासनास सादर करावयाचा आहे. दरम्यान, या संकुलनाच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांचा गैरप्रकार झाला असल्याचा आरोप अ‍ॅड. विजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

जामनेर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर मराठी शाळा, ऊर्दू शाळा व पंचायत समिती कार्यालय इमारती बांधकाम करण्यासह उर्वरित जागेवर वाणिज्य प्रयोजनासाठी बांधकामास शासनाने सन २०११ मध्ये मान्यता दिली होती. जागेच्या भूमिपूजनाआधी प्रीमियमची रक्कम अदा करणे बंधनकारक केले होते. मात्र, ठेकेदार आर. के. शर्मा व त्यांचे भागीदार असलेले श्रीराम खटोड तसेच श्रीकांत खटोड यांनी ती रक्कम भरली नाही़ तर आजही प्रीमियम, अनुज्ञाप्ती व भाडेपट्ट्याची एकूण रक्कम ६ कोटी ९८ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेला अदा केलेली नसल्याची तक्रार अ‍ॅड. विजय पाटील शासनाकडे केली होती़ सोबत संकुलात ऊर्दु शाळा न बांधता ती संकुलाच्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बोदवड रस्त्यावर बांधण्यात आली असून ती देखील नियमांप्रमाणे नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. संकुलाचा तिसरा मजला बेकायदेशीर असून बेसमेंटमध्येसुद्धा दुकाने बांधण्यात येऊन ती विक्री केल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यांचा आहे समितीत समावेश

शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. चौकशी समिती नियुक्तीचा आदेश मंगळवारी उपसचिव प्रवीण जैन यांनी काढला. या समितीचे अध्यक्ष नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त मनीष सांगळे असून राजन पाटील व सहाय्यक लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांचा समावेश आहे.

शासनाने टाळाटाळ केल्यास स्वत: फिर्यादी होणार

समितीचा चौकशी अहवाल हा दोन महिन्यांच्या आत शासनाला सादर करावयाचा आहे. चौकशीअंती दोषी आढळून आल्यानंतर शासनाकडून गुन्हा दाखल करण्यास जर टाळाटाळ झाली तर आपण स्वत: फिर्यादी होऊन जळगावात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती अ‍ॅड. विजय पाटील यांनी दिली. दरम्यान, या संपूर्ण गैरप्रकारामागे आमदार गिरीश महाजन यांचासुद्धा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर सन २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते त्या संकुलाचे उद्घाटन पार पडले होते. त्याची चौकशी होण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.

१८०० पानांचा गठ्ठा

या संपूर्ण प्रकरणाची माहिती माहिती अधिकारात मिळाली असून सुमारे १ हजार ८०० पानांचा गठ्ठा असल्याची माहिती पाटील यांनी दिली. त्यातील महत्त्वाची शंभर पाने आपण काढून ठेवली आहेत. चौकशी समिती आल्यानंतर आपण स्वत:चे म्हणणे मांडण्याची व कागदपत्रे सादर करण्याची विनंती करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जि. प. सदस्यसुद्धा येऊ शकतात अडचणीत

घरकुल प्रकरणात सह्याजीराव नगसेवक ज्या प्रकारे अडचणीत सापडले होते. त्याप्रमाणे या संकुलाच्या प्रकरणातसुद्धा सह्याजीराव जिल्हा परिषद सदस्य अडचणीत सापडणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.