शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अगरबत्ती व सुगंधीत वस्तूंच्या आयातीवर सरकारने घातले निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 12:34 IST

चीन व व्हिएतनामधून होणारी आयात १० वर्षात १५ पटीने वाढली

- विजयकुमार सैतवाल

जळगाव : विदेशातून मोठ्या प्रमाणात अगरबत्ती व सुगंधीत घटक पदार्थांची आवक वाढून स्थानिक रोजगारावर त्याचा परिणाम होऊ लागल्याने या आयातीला आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने अगरबत्ती व सुगंधीत घटक पदार्थांच्या आयातीवर निर्बंध घातले आहे. चीन व व्हिएतन या देशामधून होणारी ही आयात गेल्या १० वर्षांत १५ पटीने वाढल्याने या दोन्ही देशांमधून होणाऱ्या आयातीवर सरकारची करडी नजर राहणार आहे.घर, मंदिर किंवा दर्गा असो की कोणच्याही धार्मिक विधीसाठी भक्तीभावाने लावल्या जाण्याºया तसेच कोणतेही कार्यालय, दुकान या ठिकाणी वातावरण प्रसन्न करणाºया अगरबत्तीला धार्मिकता जपणाºया आपल्या भारत देशात मोठी मागणी आहे. त्यामुळेच देशात सुरुवातीपासून अगरबत्तीद्वारे कुटीर उद्योग आकाराला आले. त्यानंतर मोठ्या कंपन्या उदयास येण्यासह विदेशातूनही अगरबत्तीची आयात होऊ लागली.१० वर्षात आयात १५ पटीने वाढलीभारतात अगरबत्तीची मागणी पाहता दक्षिण भारतातील बंगलुरू पाठोपोठ अहमदाबाद, इंदूर, महाराष्ट्रात पुणे, नागपूर येथे मोठ्या कंपन्या सुरु झाल्या. साधारण २००८पर्यंत विदेशातून अगरबत्तीची जास्त आयात होत नव्हती. मात्र भारतात अगरबत्तीची मागणी वाढतच जात असल्याने इतर देशातून आयात होऊ लागली. यामध्ये चीन व व्हिएतनाम या देशांमधून सर्वाधिक आयात होऊ लागली. यामध्ये २००८मध्ये चीन व व्हिएतनाममधून अनुक्रमे २५५ व ११४ किलो, २००९मध्ये १२९ व ७४, २०१०मध्ये १११ व ९१८, २०११मध्ये २४० व १८४९, २०१२मध्ये ८२७ व ४५४४, २०१३मध्ये १४१३ व ७०७१, २०१४मध्ये ५०७३ व १० हजार ४१९, २०१५मध्ये १२ हजार ५१६ व १० हजार ८०९, २०१६मध्ये १८ हजार ५१७ व १० हजार ५८२, २०१७मध्ये २७ हजार ९ व १५६० आणि २०१८मध्ये ३० हजार १०६ व ४९६ किलो अगरबत्तीची आयात झाली.बेरोजगारी वाढलीविदेशातून अगरबत्तीच्या वाढत्या आयातीमुळे देशातील स्थानिक रोजगारावर परिणाम होऊ लागली. अगरबत्तीचे कुटीर उद्योगांची तर बिकट स्थिती झाली. त्यामुळे ही वाढती बेरोजगारी पाहता विदेशातून येणाºया अगरबत्तीवर निर्बंध घालण्याचा निर्णय सरकारने घेतला.परवाना घेण्यासह आयात मालाची द्यावी लागणार माहितीकेंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार अगरबत्ती आणि इतर सुगंधित पदार्थांच्या आयाती संदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. यात मुक्त आयात धोरण संपविले असून या पदार्थांच्या आयातीसाठी संबंधितांना चीन आणि व्हिएतनामसहीत इतरही देशांमधून वेगळा परवाना घ्यावा लागणार आहे. इतकेच नव्हे या नवीन कायद्यानुसार धूप, ‘रूम फ्रेशनर’ आणि सुगंधित उत्पादनांसाठीही हे नियम लागू राहणार आहे. सोबतच उत्पादक अथवा विक्रेत्यांना विदेशातून किती माल आयात केला याची माहिती संबंधित मंत्रालयाला सादर करावी लागणार आहे.सध्या चीनमधून फॅन्सी अगरबत्तीची जास्त आयात होऊ लागल्याने स्थानिक अगरबत्तींची मागणी घटल्याचेही उत्पादकांनी सांगितले.रोजगारवाढीस चालणा मिळणारसरकारच्या या निर्णयाने देशातील अगरबत्ती उत्पादकांना आपले उत्पादन वाढीस आता वाव मिळणार आहे. जे कुटीर उद्योग लयास गेले होते, त्यांना पुनरुज्जीवन मिळू शकले व अगरबत्ती उत्पादक कंपन्याही रोजगार देऊ शकले, असे अगरबत्ती उत्पादकांनी सांगितले.दोन टक्क्याने भाव वाढ वाढणारअगरबत्ती व कच्च्या मालाची आयात बंद झाल्याने मागणी व पुरवठ्याची गणित पाहता अगरबत्तीचे भाव वाढणार आहे. मात्र ही वाढ जास्त राहणार नाही तर ती केवळ २ टक्के वाढीपर्यंतच जाऊ शकतात, असे उत्पादकांनी सांगितले. यात भाववाढीपेक्षा आज रोजगार वाढीला अधिक प्राधान्य असल्याने सरकारने हे पाऊल उचलले असल्याचेही सांगितले जात आहे.स्थानिक अगरबत्ती उत्पादन घटून बेरोजगारीही वाढत असल्याने सरकारने अगरबत्ती व सुगंधित पदार्थांच्या आयातीवर निर्बंध घातले आहे. सरकारच्या या निर्णयाने स्थानिक उत्पादन वाढून रोजगारवाढीसही चालणा मिळणार आहे.- राकेश पटेल, अगरबत्ती उत्पादक, अहमदाबाद.अगरबत्ती व सुगंधित पदार्थांच्या आयातीवर निर्बंध घातल्याने आता सर्वांना परवाना घ्यावा लागणार आहे. या निर्णयाने भाववाढ होणार असली तरी जास्त राहणार नाही. मात्र यामुळे स्थानिक माल विक्रीस वाव मिळणार आहे.- ललित बरडिया, अगरबत्ती विक्रेते, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव