शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

गुडबाय २०१९ : विधानसभा निवडणुकीत भाजप का राहिले ‘मायनस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:21 IST

सहा जागांवरुन चारवर

सहा जागांवरुन चारवरयंदाची विधानसभा निवडणूक गाजली ती भाजपच्या बंडखोरीमुळे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती नसताना भाजपने जिल्ह्यातील ११ पैकी सहा जागा मिळविल्या होत्या. २०१९मध्ये युती झाली मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या चार ठिकाणी बंडखोरी केली. यात शिवसेनेला मात देण्याचा एकप्रकारे प्रयत्न झाला. मात्र याचा फटका उलट भाजपलाच बसून त्यांच्या जागा सहावरून चारवर आल्या. विशेष म्हणजे एकही बंडखोर निवडून आला नाही.शिवसेना जिल्हा प्रमुखांचीही बंडखोरीभाजपकडून बंडखोरी होत असताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे स्वत: मुक्ताईनगर या भाजपचा उमेदवार असलेल्या मतदार संघातून अपक्ष म्हणून उभे राहिले व निवडूनही आले.पंतप्रधानांच्या सभेतच वादविधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीवरून जिल्ह्यात शिवसेना-भाजपमध्ये चांगलेच खटके उडत राहिले. जळगाव ग्रामीण मतदार संघातील सेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी बंडखोरीवरून जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यानच गिरीश महाजन यांना जाब विचारला व दोघांमध्ये चांगलाच वाद झाला.खडसेंना उमेदवारी नाकारलीभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे रास्ता रोके, जाळपोळ असे मोठे पडसाद जिल्ह्यात त्या वेळी उमटले. अखेर खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली.‘लोकसभे’त बरोबरीलोकसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातील दोन जागा कायम राखण्यात यश मिळविले. यात रावेर मतदार संघातून रक्षा खडसे या विजयी झाल्या तर जळगावातून उन्मेष पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला.उमेदवारी बदलावरून वादंगलोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन खासदार ए.टी. पाटील यांची उमेदवारी नाकारुन विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना भाजपने जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र नंतर त्यांचीही उमेदवारी बदलली. त्याचे पडसाद अमळनेरात उमटले व माजी आमदार बी.एस. पाटील यांना मारहाण करण्यात आली.काँग्रेसने खाते उघडले२०१४च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ११ पैकी एकही जागा मिळवू न शकलेल्या काँग्रेसने या वेळी यावल मतदारसंघात विजय मिळवित आपले खाते उघडले.विजयाचे एकमेकांना आव्हानविधानसभा निलडणुकीपूर्वीच तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी एकमेकांना विजयी होऊन दाखविण्याचे आव्हान चर्चेचा विषय ठरला.एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चाअगोदर मंत्रीमंडळातून बाहेर काढणे, विधानसभेची उमेदवारी नाकारणे, नंतर निवडणुकीत कन्येचा झालेला पराभव यामुळे पक्षातील मंडळींवर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले. आपल्या मुलीच्या पराभवास पक्षातील काही मंडळी कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.संकलन- विजयकुमार सैतवाल

टॅग्स :Jalgaonजळगाव