शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोन्याचे दर घसरले; खरेदीची संधी वाढली, पितृ पंधरवाड्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 09:08 IST

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली होती. किरकोळ चढ-उतार वगळता ते सातत्याने ५१ ते ५२ हजारांवर राहिले.

जळगाव/नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून ५१ ते ५२ हजार रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात पितृ पक्ष सुरू झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. सोमवारी ते ५० हजार ४५० रुपये प्रति तोळ्यावर आले. यापूर्वी २१ जुलै रोजी सोन्याचे भाव ५० हजार ७०० रुपयांवर होते. दुसरीकडे गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या भावात वाढ झाली आहे. 

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली होती. किरकोळ चढ-उतार वगळता ते सातत्याने ५१ ते ५२ हजारांवर राहिले. मात्र, गेल्या आठवड्यापासून त्यात घसरण सुरू झाली. तसेच पितृ पक्षात अनेकजण खरेदी टाळत असतात. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मागणी कमी असल्याने सोन्याचे भाव कमी होत आहेत. १३ सप्टेंबर रोजी ५१ हजार २०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १४ रोजी ४०० रुपयांची घसरण होऊन ते ५० हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. सोमवारी त्यात १५० रुपयांची घसरण होऊन ते ५० हजार ४५० रुपयांवर आले. 

चांदीच्या दरात प्रचंड अस्थिरतादुसरीकडे चांदीचे भाव वाढत आहे. १२ सप्टेंबर रोजी ५६ हजार ८०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १३ रोजी एकाच दिवसात एक हजार रुपयांची वाढ झाली व ती ५७ हजार ८०० रुपयांवर पोहोचली. सोमवारी ती ५७ हजार ५०० रुपयांवर आली.दिल्लीत सोने ५० हजारांखालीदिल्लीत सोमवारी सोन्याच्या दरात ३०३ रुपयांची घसरण झाल्यामुळे ते प्रति १० ग्रॅम ४९,५७१ रुपयांवर आले आहे. मागणी कमी आणि रुपयातील घसरणीमुळे दर उतरले, असे तज्ज्ञांनी सांगितले. चांदीच्या दरातही १९७ रुपयांनी घसरण होत ती ५७,२८७ रुपये प्रति किलोवर आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावGoldसोनं