शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

खोपडीचे देव उठले आता बळीराज्याची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 19:55 IST

गुरुवारी कार्तिकी एकादशीला परंपरेप्रमाणे खोपडी पूजनाने देव उठवण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

संजय हिरे खेडगाव, ता.भडगाव :  गुरुवारी कार्तिकी एकादशीला परंपरेप्रमाणे खोपडी पूजनाने देव उठवण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक उत्कंठा संपली. येथून  पुढे शेतकरी रब्बीच्या पेरणीबरोबरच घरातील उपवर मुलामुलीच्या वधु-वर संशोधनासाठी  एकच लगीनघाई सुरू होईल.हंगाम व धार्मिक पंरपंरेची सांगडआषाढी एकादशीला खरिपातील पेरण्या झालेल्या असतात, तर कार्तिकी एकादशीला खरिप हंगाम हाती आलेला असतो. नवीन धान्याच्या राशी, कापसाच्या रुपात घरात आलेले पांढरे सोने आदी शेतक-यांसाठी लक्ष्मी व एकूणच वैभव असते. नवीन अन्नधान्य, शेतात पिकलेला भाजीपाला, बोर, ऊस याचे सेवन आजच्या एकादशीला पूजा-अर्चा करुन मगच करण्याचा विधी आजही जोपासला जातो. ऊस किंवा ज्वारीच्या ताठ्याची झोपडीवजा खोपडी करुन तिला नवीन वस्र अलंकार घालत यात हे शेतातील वैभव ठेवून पूजा होते. मगच नवीन हंगामात निघालेल्या अन्नधान्याचे ग्रहण केले जाते.   खोपडीचे देव उठलेकार्तिकी एकादशीनिमित्ताने गुरुवारी सकाळी खेडोपाडी घराघरांचे उंबरठे, अंगण दिव्यांनी उजळून  निघाले. संध्याकाळी गल्लोगल्ली, चौक, समाज, भाऊबंदकी मिळून  खोपडीतले देव उठवण्यात आले. श्रावण ते कार्तिक असे चातुर्मासातील चार महिने देव निद्रा घेतात, ही धार्मिक भावना आहे. या योगे खोपडीत सर्व देवादिकांना बसवत पूजाअर्चा असा विधी व खंडेरायाची तळी भरुन, पूजेसाठी आणलेला ताट, तांब्या हाती घेत ते टाळ वाजावेत तसे वाजवत, श्रीकृष्ण सावळा..! बोर, भाजी, आवळा असे म्हणत पाच प्रदक्षिणा घालून देवांना उठविण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर लहान मुलाला खोपडीत बसवून शेतमालाचे भाव कसे राहतील? याची विचारणा झाली. ऊस, बोरे, गुळ, खोबरे आदी प्रसाद वाटण्यात आला. एकच लगीनघाई  खरीप हंगामातील कपाशी आदी शेतं खाली झाली आहेत. खोपडी एकादशीला रब्बी गहू, हरभरा पेरण्याचा मुहुर्त साधला जातो. यावर्षी एकाच वेळी सर्व शिवार खाली होत असल्याने मशागतीसाठी, ट्रॅक्टरला वेंटीग लिस्ट आहे. अशात घरातील उपवर मुलीमुलांसाठी स्थळ शोधमोहीम, विवाह जुळवणे आदी एकच धावपळ शेतक-यांची होणार आहे. आमुच्या अंगणी तुळस, देव झालेत जावईपंरपंरेनुसार आज काही समाज व चौकातील खोपडी पूजेनंतर तुळशी विवाहांना आरंभ होईल. पुराणानुसार वृंदा अर्थात तुळशीचा विवाह  श्रीकृष्णाशी लावून दिला जातो व मगच घरातील विवाहयोग्य मुलगा, मुलगी यांच्यासाठी स्थळ शोध मोहीम सुरू होते. अंगणातील तुळशीला कन्या समजले जाते  ज्याले नाही लेक त्येनी तुळस लावावी आपुल्या अंगणात  देव करावे जावई...यानुसारच तुळशीचा विवाह होतो. काही गावातून खोपडी पूजनानंतर लगेच तुळशी विवाह लावला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमेपर्यत तुळशीविवाह   चालतात. तुळशीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळेच व्रत करू एकादशी, दारी लावली तुळशी ही भावना या गीतातून व्यक्त होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhadgaon भडगाव