शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

खोपडीचे देव उठले आता बळीराज्याची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 19:55 IST

गुरुवारी कार्तिकी एकादशीला परंपरेप्रमाणे खोपडी पूजनाने देव उठवण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

संजय हिरे खेडगाव, ता.भडगाव :  गुरुवारी कार्तिकी एकादशीला परंपरेप्रमाणे खोपडी पूजनाने देव उठवण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक उत्कंठा संपली. येथून  पुढे शेतकरी रब्बीच्या पेरणीबरोबरच घरातील उपवर मुलामुलीच्या वधु-वर संशोधनासाठी  एकच लगीनघाई सुरू होईल.हंगाम व धार्मिक पंरपंरेची सांगडआषाढी एकादशीला खरिपातील पेरण्या झालेल्या असतात, तर कार्तिकी एकादशीला खरिप हंगाम हाती आलेला असतो. नवीन धान्याच्या राशी, कापसाच्या रुपात घरात आलेले पांढरे सोने आदी शेतक-यांसाठी लक्ष्मी व एकूणच वैभव असते. नवीन अन्नधान्य, शेतात पिकलेला भाजीपाला, बोर, ऊस याचे सेवन आजच्या एकादशीला पूजा-अर्चा करुन मगच करण्याचा विधी आजही जोपासला जातो. ऊस किंवा ज्वारीच्या ताठ्याची झोपडीवजा खोपडी करुन तिला नवीन वस्र अलंकार घालत यात हे शेतातील वैभव ठेवून पूजा होते. मगच नवीन हंगामात निघालेल्या अन्नधान्याचे ग्रहण केले जाते.   खोपडीचे देव उठलेकार्तिकी एकादशीनिमित्ताने गुरुवारी सकाळी खेडोपाडी घराघरांचे उंबरठे, अंगण दिव्यांनी उजळून  निघाले. संध्याकाळी गल्लोगल्ली, चौक, समाज, भाऊबंदकी मिळून  खोपडीतले देव उठवण्यात आले. श्रावण ते कार्तिक असे चातुर्मासातील चार महिने देव निद्रा घेतात, ही धार्मिक भावना आहे. या योगे खोपडीत सर्व देवादिकांना बसवत पूजाअर्चा असा विधी व खंडेरायाची तळी भरुन, पूजेसाठी आणलेला ताट, तांब्या हाती घेत ते टाळ वाजावेत तसे वाजवत, श्रीकृष्ण सावळा..! बोर, भाजी, आवळा असे म्हणत पाच प्रदक्षिणा घालून देवांना उठविण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर लहान मुलाला खोपडीत बसवून शेतमालाचे भाव कसे राहतील? याची विचारणा झाली. ऊस, बोरे, गुळ, खोबरे आदी प्रसाद वाटण्यात आला. एकच लगीनघाई  खरीप हंगामातील कपाशी आदी शेतं खाली झाली आहेत. खोपडी एकादशीला रब्बी गहू, हरभरा पेरण्याचा मुहुर्त साधला जातो. यावर्षी एकाच वेळी सर्व शिवार खाली होत असल्याने मशागतीसाठी, ट्रॅक्टरला वेंटीग लिस्ट आहे. अशात घरातील उपवर मुलीमुलांसाठी स्थळ शोधमोहीम, विवाह जुळवणे आदी एकच धावपळ शेतक-यांची होणार आहे. आमुच्या अंगणी तुळस, देव झालेत जावईपंरपंरेनुसार आज काही समाज व चौकातील खोपडी पूजेनंतर तुळशी विवाहांना आरंभ होईल. पुराणानुसार वृंदा अर्थात तुळशीचा विवाह  श्रीकृष्णाशी लावून दिला जातो व मगच घरातील विवाहयोग्य मुलगा, मुलगी यांच्यासाठी स्थळ शोध मोहीम सुरू होते. अंगणातील तुळशीला कन्या समजले जाते  ज्याले नाही लेक त्येनी तुळस लावावी आपुल्या अंगणात  देव करावे जावई...यानुसारच तुळशीचा विवाह होतो. काही गावातून खोपडी पूजनानंतर लगेच तुळशी विवाह लावला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमेपर्यत तुळशीविवाह   चालतात. तुळशीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळेच व्रत करू एकादशी, दारी लावली तुळशी ही भावना या गीतातून व्यक्त होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhadgaon भडगाव