शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

परमात्माच सर्वव्यापी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 6:55 PM

अध्यात्म

अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मा या विषयाचे शास्त्र. अध्यात्म या शब्दात अधि अणि आत्मा हे दोन शब्द आहेत. अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीज्ञान होय. ‘अंतिम सत्य शोधून काढण्याच्या दृष्टीने केलेले अनुभवाचे मंथन’ अशीही अध्यात्मशास्त्राची व्याख्या आढळते. आपल्या अनुभवात येणारे जेवढे पदार्थ आहे, त्यातील नित्य काय व अनित्य काय हे शोधून काढण्याच्या दृष्टीने जे शास्त्र त्याकडे बघते ते अध्यात्म शास्त्र होय.अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मज्ञानाचे शास्त्र आणि अध्यात्म दर्शन म्हणजे आत्म्याविषयी दर्शन होय. या दृष्य जगाला आधारभूत असलेल्या आत्मस्वरुपाचे तर्काचे आणि नंतर त्याचा साक्षात अनुभव घेणे याला अध्यात्म दर्र्शन म्हटले जाते.अध्यात्मशास्त्राला पराविद्या असेही म्हणतात. हे तत्वज्ञान वेदामध्ये निर्माण होते व उपनिषदामध्ये पूर्ण होते. अध्यात्मशास्त्राच्या भांडारसाठी उपनिषदांना समजून घ्यायला हवे.या नश्वर जगात अमृत कुठे आहे तर याचा शोध घेता घेता वैदिक ऋषींना एकंसत्चा साक्षात्कार झाला. एकच परमात्मा सर्वव्यापी आहे. वारकरी सांप्रदायात सांगायचे झाले तर ‘विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला म्हणजेच ‘सभूमिंवृरत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम्’ याचा साक्षात अनुभव घेणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. या अनुभवाप्रत ऋषी पोहोचले.प्राचीन व अर्वाचीन ब्रह्मज्ञानी पुरुषांनी अध्यात्मशास्त्राची परंपरा आजतगायत टिकवून ठेवलेली आहे. थोर संतांची त्यावरील अढळ निष्ठा यामुळेच ही परंपरा अखंडपणे टिकली आहे.संपूर्ण जगाला गवसणी घालणारे ज्याचे वर्णन करता येत नाही, ज्याचा कधीही विनाश होत अशा गोष्टीचा विचार करणे आणि त्या व्यक्त न होणाऱ्या गोष्टीतून निर्माण होणाºया व त्यातच पुन्हा लय पावणाºया या चराचर जगाचे ज्ञान करून घेणे यालाच वेदांतामध्ये अध्यात्मशास्त्र असे म्हणतात.- दादा महाराज जोशी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव