शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मुस्लिमांना नागरिकत्व द्या, अन्यथा विधेयक रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:43 PM

प्रतिक्रिया : विधेयक भारतीय संविधानाला धरुन योग्य नाही; सर्वत्र अन्यायाच्या भावना

जळगाव : भाजपा सरकार संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडून भारतात वास्तव्यास आलेल्या बांगलादेश, अफगणिस्थान येथील खिश्चन व बौद्ध समुदायाला भारतीय नागरिकत्व देणार आहे. मात्र, या समुदायासोबत मुस्लिम समाजदेखील भारतात आला आहे. त्यामुळे भारताने मुस्लिम समाजालाही भारतीय नागरिकत्व द्यावे, अन्यथा हे विधेयक रद्द करावे, असा सूर मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला आहे.सोमवारी संसदेत नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. मुस्लिम समुदायाला भारतीय नागरिकत्व देण्यात येत नसेल, तर हे विधेयक संविधानाला धरुन नसल्याचेही या पदाधिकाऱ्यांनीम्हटले आहे.ही तर फसवणूकहे विधेयक लजास्पद व दु:खद आहे़ ते लोकसभा व राज्यसभेत सादर करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मान खाली जाणे होय़ हिंदू-मुस्लीम भाई- भाई ही जी आपली संकल्पना आहे, जी परंपरा आहे यामुळे मलिन होणार आहे़ धर्म पाहून नागरिकत्व देणे म्हणजे बोलायचे काही व करायचे काही असा हा प्रकार आहे़ एका समाजाला सोडून तुम्ही देशविकासाची स्वप्ने कशी बघू शकतात़ हे विधेयक म्हणजे केवळ वोट बँक व राजकीय हेतूतून आलेले आहे़ आपली अर्थव्यवस्था सातत्याने ढासळत आहे़ जीडीपी खाली जात आहे़ लाखो युवक बेरोजगार आहे़, कंपन्यां बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अशा स्थितीत माणसाच्या आयुष्याशी निगडीत मूळ विषयांना डावलून नको त्या दिशेने भरकटवले जात आहे़-मुश्ताक करीमी,मुख्याध्यापक तथा उर्दू साहित्यिकसंसदेत मांडण्यात आलेला नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा संविधानाच्या विरूध्द आहे़ यामुळे मुस्लिम बांधवांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो़ बाहेरील व्यक्तींना प्रवेश व आतील व्यक्तींना रहिवास दाखवावा लागेल तर नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशाचे हिताचे नाही़-जाकीर सैय्यद,शिक्षक, डी़वाय़शाह उर्दु हायस्कूलसंसदेमध्ये जे विधेयक मांडले गेले, ते संविधानाला धरुन नाही. संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार सांगितला आहे. त्यामुळे दुसºया देशातुन आलेल्या नागरिकांना ज्या प्रमाणे भारतीय नागरिकत्व दिले जात आहे. त्याच प्रमाणे इतर देशाातून भारतात आलेल्या मुस्लिम समाज बांधवांनांही भारतीय नागरिकत्व द्यावे. त्यांच्यावर या सरकारने अन्याय करायला नको. त्यानांही भारतीय नागरिकत्व द्यावे, अन्यथा हे विधेयक रद्द करावे.-अकबर काकर,प्रदेश उपाध्यक्ष, काकर समाज महामंच, जळगाव.या विधेयकाला आमचा विरोध नाही. मात्र, दुसºया देशातून भारतात आलेल्या खिश्चन, बौद्ध व इतर समाज बांधवांना हे सरकार भारतीय नागरिकत्व देत असेल तर त्यांच्या सोबत बाहेरील देशातून मुस्लिम समाज बांधवही भारतात आले आहे. त्यानांही भारतीय नागरिकत्व देऊन, त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. जर या मुस्लिम बांधवांना भारतीय नागरिकत्व देण्यात येत नसेल, तर हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायचं आहे. त्यामुळे सर्वांना समान न्याया द्यावा, अन्यथा कुणालाही भारतीय नागरिकत्व देऊ नये.-जहाँगीर ए. खान.प्रदेशाध्यक्ष, अल्पसंख्याक सेवा संघटना, जळगाव.नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे आम्ही विरोध करतो़ ही सुधारणा संविधानाच्या विरूध्द तर आहेच, परंतु देशाला तोडणारी सुध्दा आहे़ या विधेयकामुळे मुस्लिम बांधवांना हक्काच्या न्यायापासून वंचित राहण्याची वेळ येईल़-प्रा़ काझी मुजम्मिल नदवी,एच़जे़थीम महाविद्यालय

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव